शहरं
Join us  
Trending Stories
1
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
2
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
3
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
4
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
5
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
6
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
7
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
8
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
9
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
10
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
11
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
12
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
13
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...
14
Stock Market Update: १३१ अंकांच्या तेजीसह खुला झाला Sensex; PSU बँकांमध्ये तेजी, IT-FMGC आपटले
15
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
16
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
17
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
18
दहशतवादी हल्लानंतर मृत्यू पावलेल्या पर्यटकांसाठी श्रद्धांजली यात्रा, मकरंद देशपांडे म्हणाले...
19
'मी १५ दिवस स्वतःचीच लघवी प्यायलो', कारण...; परेश रावल यांचा खुलासा, अजय देवगणच्या वडिलांनी दिला होता सल्ला
20
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी

अधिकारीपदासाठी महापालिकेत लिलाव, अर्थकारणाला कंटाळून डॉक्टरांनी स्वेच्छानिवृत्ती घेतल्याची चर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2017 05:08 IST

महापालिकेतील आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल रॉय यांनी सत्ताधारी आणि प्रशासनावर गंभीर आक्षेप घेतला आहे. वैद्यकीय अधिकारीपदासाठी लाखोंची बोली लावल्याची, तसेच बढती-बदलीच्या अर्थकारणाला आणि राजकारणाला कंटाळून स्वेच्छानिवृत्तीसाठी अर्ज दिल्याची चर्चा महापालिका वर्तुळात आहे.

पिंपरी : महापालिकेतील आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल रॉय यांनी सत्ताधारी आणि प्रशासनावर गंभीर आक्षेप घेतला आहे.वैद्यकीय अधिकारीपदासाठी लाखोंची बोली लावल्याची, तसेच बढती-बदलीच्या अर्थकारणाला आणि राजकारणाला कंटाळून स्वेच्छानिवृत्तीसाठी अर्ज दिल्याची चर्चा महापालिका वर्तुळात आहे.महापालिकेत भाजपाची एकहाती सत्ता आहे. त्यामुळे विधी समितीच्या बैठकीत विद्यामान आरोग्य अधिकारी डॉ. अनिल राय यांच्याऐवजी डॉ. पवन साळवे यांची नियुक्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयाविरोधात डॉ. अनिल रॉय यांनी न्यायालयात दाद मागणार असल्याचे सांगितले आहे. साळवे यांच्यावर तत्कालीन सत्ताधाºयांनी अन्याय केल्याच्या आणि त्यांना न्याय देण्याच्या भावनेने साळवे यांना पद देण्याचा निर्णय विधी समितीने घेतला आहे. चार वर्षांनंतर संबंधित पद काढून घेतल्याने महापालिकेतील बदल्याच्या अर्थकारण आणि राजकारणाविरोधात डॉ. रॉय यांनी आवाज उठविला आहे.सोशल मीडियावर व्हायरल...सत्ताधीशांचा आणि प्रशासनाचाही आपल्यावर विश्वास नाही. त्यामुळे विदारक परिस्थितीत आपण आरोग्य अधिकारी पदावर राहणे संयुक्तिक वाटत नसल्याचे डॉ. रॉय यांनी स्वेच्छानिवृत्ती अर्जात म्हटले आहे. विशेष म्हणजे हा अर्ज सोशल मीडियामध्ये फिरत आहे.साडेचार वर्षांनंतर साक्षात्कार१ जून २०१३ पासून मी आरोग्य वैद्यकीय अधिकारी पदावर कार्यरत असून, चार आयुक्तांसमवेत काम केले. या चारही आयुक्तांनी आपणास दिलेली बढती नियमानुसार असल्याचे राज्य शासन, राष्ट्रीय व राज्य अनुसूचित जाती आयोग, खासगी संस्था, नगरसेवकांना लेखी कळविले. त्याबाबतचा पत्रव्यवहार आजही उपलब्ध आहे. आता साडेचार वर्षांनंतर प्रशासनाला मला दिलेली बढती योग्य नसल्याचा साक्षात्कार कसा झाला? या प्रकरणात आर्थिक देवाणघेवाण झाल्याची धारणा आहे. पदावर असताना माझ्याविरुद्ध कोणतीही तक्रार नसून, सर्व आयुक्तांनी मला गोपनीय अहवालात अत्युत्कृष्ट शेरांकन दिले आहे, असे असताना साडेचार वर्षांनंतर पद काढून घेण्याचा निर्णय घेतला आहे, अशी भावना रॉय यांनी प्रशासनास दिलेल्या अर्जात व्यक्त केली.पदासाठी प्रशासनावर दबावडॉ. रॉय यांना पदभार दिल्यानंतर डॉ. साळवे यांनीही आपल्यावर अन्याय झाल्याची भावना व्यक्त करून त्यासाठी लढा दिला होता. प्रशासकीय पातळीवर पत्रव्यवहार केला होता. महापालिकेत राष्टÑवादी काँग्रेसची सत्ता जाऊन भाजपाची सत्ता आल्यानंतर सहा महिन्यांत सत्ताधाºयांनी रॉय यांचा पदभार काढण्याचा निर्णय घेतला आहे. डॉ. साळवे हे खासदार अमर साबळे यांचे निकटवर्तीय असून त्यांच्या नावासाठी भाजपातील एक गट आग्रही होता. तर भाजपातील साबळे विरोधी गटाचा डॉ. रॉय यांच्या नावास पाठिंबा आहे. भाजपातील वरिष्ठ पातळीवरील नेत्यांनी साळवे यांच्या नावाला पसंती दिली.विधी संशयाच्या भोवºयातदोनदा विधी समिती तहकुबीनंतर डॉ. साळवे यांचा विषय मंजूर केला. या पदासाठी अर्थकारण झाल्याचा आरोप रॉय यांनी केल्याने विधी समिती संशयाच्या भोवºयात आली आहे. या पदासाठी लाखोंची बोली लावली असल्याची चर्चा आज महापालिकेत होती. तर विधी समितीलाच एवढी रक्कम कशी? यामुळे भाजपाचे महापालिकेतील पदाधिकारी अस्वस्थ झाले आहे. दरम्यान येत्या महासभेत डॉ. साळवे यांना देण्यात येणाºया पदाला अंतिम मंजुरी देण्याचा विषय येणार आहे.