शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला 'वर्ल्ड कप' पराभवानंतर कर्णधाराकडून खेळाडूंना मारहाण; वरिष्ठ खेळाडूच्या आरोपाने क्रिकेटविश्व हादरले
2
देव दिवाळीच्या मुहुर्तावर सोनं पुन्हा स्वस्त...! पटापट चेक करा तुमच्या शहरातील लेटेस्ट रेट
3
ढाका पोहोचण्याआधीच जाकिर नाईकला मोठा 'झटका'! भारताच्या दबावापुढे बांगलादेश झुकला?
4
राहुल गांधींनी ज्या ब्राझिलियन मॉडेलचा उल्लेख केला तो फोटोग्राफर निघाला; पहा मॅथ्यूज फरेरो नेमके कोण? 
5
राहुल गांधीचा हायड्रोजन बॉम्ब! 'एका महिलेचे 223 वेळा नाव; हरियाणात 25 लाख मतांची चोरी'
6
Health Tips: शरीरावर असलेले लाल चामखीळ कशाचे लक्षण? त्यात काही काळजीचे कारण असते की... 
7
Plane Crash: उड्डाणानंतर काही मिनिटांतच विमान कोसळलं; भयानक घटना कॅमेऱ्यात कैद!
8
१ फोटो, १ मतदारसंघ अन् १०० मते...; राहुल गांधींच्या 'हायड्रोजन बॉम्ब'नं निवडणूक आयोगाची उडाली झोप
9
UPI की Net Banking? पर्सनल लोनचा EMI भरण्यासाठी सर्वात प्रभावी पर्याय कोणता? जाणून घ्या फायदे आणि तोटे
10
सुंदर पिचाईंची मोठी घोषणा; Googleची अंतराळात झेप, सौर उर्जेवर चालणाऱ्या AI डेटा सेंटरची यशस्वी चाचणी
11
न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनलेल्या जोहरान ममदानींचं बॉलिवूडशी खास नातं, आई प्रसिद्ध दिग्दर्शिका
12
Rahul Gandhi : कधी सीमा, कधी स्वीटी, कधी सरस्वती... हरियाणात एका तरुणीची २२ मतं, राहुल गांधींचा मोठा दावा
13
“मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर अनेकांची वक्रदृष्टी, पंचांग काढून राहु-केतु...”; ठाकरेंचा टोला
14
थंडीच्या दिवसांत घरातील फ्रीजचं तापमान नेमकं किती ठेवावं? एका चुकीमुळे भरमसाठ वाढू शकतं बिल!
15
ट्रम्प, थोडा आवाज वाढवा, ज्या न्यूयॉर्क शहराने तुम्हाला जन्माला घातले...; ममदानींचा राष्ट्राध्यक्षांना थेट इशारा
16
Devendra Fadnavis: "विकास सोडून फक्त विधानेच!" उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावर फडणवीसांची तिखट प्रतिक्रिया
17
BSNL Recharge Plan: ५०० रुपयांपेक्षा कमी किंमतीचा रिचार्ज प्लान आहेत बेस्ट; मिळणार जबरदस्त बेनिफिट्स, जाणून घ्या
18
Bilaspur Train Accident : सीटमध्ये पाय अडकलेला, डोळ्यांसमोर मृतदेहांचा खच...; बिलासपूर अपघाताचं भीषण दृश्य!
19
शरद पवारांची यादी मान्य! कोकणवासीयांना मोठा दिलासा; ‘या’ २ ठिकाणी ८ सुपरफास्ट ट्रेनना थांबा
20
एसटी चालक, वाहकाचे प्रसंगावधान; एमएसईबीच्या माजी अधिकाऱ्याची तब्येत बिघडली, वेगाने नातेपुते गाठत वाचविले...

उपनगर विकासाकडे हवे लक्ष

By admin | Updated: March 30, 2017 02:17 IST

गाव ते महानगर, मेट्रोसिटी आणि आता स्मार्ट सिटी अशी पिंपरी-चिंचवड शहराची वाटचाल सुरू झाली आहे.

गाव ते महानगर, मेट्रोसिटी आणि आता स्मार्ट सिटी अशी पिंपरी-चिंचवड शहराची वाटचाल सुरू झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शहराचा समावेश स्मार्ट सिटीत केला आहे. पिंपरी-चिंचवडला स्मार्ट करीत असताना आजुबाजूची हिंजवडी, चाकण, तळेगाव ही उपनगरेही स्मार्ट करण्याच्या दृष्टीने प्रयत्न व्हायला हवेत. प्रयत्न होतातहेत, त्यास गती मिळायला हवी. पिंपरी-चिंचवड या शहराची वाटचाल स्मार्टसिटीच्या ऐकेकाळी शिक्षणाचे माहेर समजले जाणाऱ्या शहरातील शिवारालगतचा पिंपरी-चिंचवड हा गावांचा भाग आता आयटी, औद्योगिक शहर म्हणून नावारूपाला येत आहे. यामुळे तळेगाव, चाकण, हिंजवडी या आजूबाजूच्या परिसराचाही नियोजनबद्ध विकास करणे गरजेचे आहे. पिंपरीच्या सर्वांगिण विकासासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री गिरीश बापट, खासदार श्रीरंग बारणे, अमर साबळे, आमदार लक्ष्मण जगताप, महेश लांडगे, गौतम चाबुकस्वार, संजय भेगडे आणि पीएमआरडीएचे प्रमुख महेश झगडे, आयुक्त दिनेश वाघमारे यांच्याकडून शहर स्मार्ट करण्याच्या दृष्टीने शहरास मोठ्या अपेक्षा आहे.नुकतीच पीएमआरडीए चीही स्थापना झाली आहे. त्यामुळे पुणे आणि पुण्यालगत असलेल्या उपनगरांचा नियोजनबद्ध विकास करण्याच्या दृष्टीने हे सूचक आणि परिणामकारक असे पाऊल आहे. त्यामुळे पीएमआरडीएच्या माध्यमातून कालबद्ध असा कार्यक्रम आखणे गरजेचे आहे. नुसता कार्यक्रम न आखता त्यांची प्रभावीपणे अंमलबजावणी कशी होईल, यादृष्टीने पावले टाकण्याची गरज आहे. त्याचबरोबर त्यासाठी आवश्यक असणाऱ्या पायाभूत सुविधांचाही विचार करण्याची गरज आहे.शहराचे सौंदर्य वाढविण्याचे काम जसे महापालिकेने केले, तसेच येथील विविध बांधकाम व्यावसायिकांनीही केले आहे. मोठे-मोठे आकाशाला गवसणी घालणारे, आणि अगदी स्वप्नवत वाटणारे गृहप्रकल्प निर्माण होत आहेत. पिंपरी-चिंचवड उद्योगनगरी लगत असणाऱ्या हिंंजवडी, रावेत वाकड परिसराचाही विकास वेगाने होत आहे. विविध परिसरात व्यावसायिक बाजारपेठा, मॉल, मल्टिप्लेक्स, पंच तारांकित हॉटेल, शैक्षणिक संकुले, डोळे दीपविणाऱ्या बागा, उद्याने, सभागृहे, नाट्यगृहे विकसित झाल्याने नवा लुक आला आहे. विकास होत असला तरी वाढती लोकसंख्या लक्षात घेता या शहरांचे पुढील पंचवीस ते पन्नास वर्षांचा कालखंड लक्षात घेता नियोजन करणे गरजेचे आहे. मेट्रोला गती मिळाली आहे. आता रिंग रेल्वे, स्काय बस हे प्रकल्प लवकरात लवकर राबविण्याची गरज आहे. लोकसंख्या लक्षात घेता रस्ते हे प्रशस्त तर हवेच त्याचबरोबर, पादचारी मार्ग, सायकल ट्रॅक, हलकी वाहने, जड वाहने यासाठी स्वतंत्र लेन असायला हव्यात. हिंजवडी ते लोहगाव विमान तळ हा मेट्रो मार्गही लवकर व्हावा.

कृष्णकुमार गोयल(लेखक प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक व कोहिनूर समूहाचे प्रमुख आहेत)