शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
3
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
4
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
5
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
6
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
7
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
8
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
9
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
10
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
11
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
12
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
13
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
14
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
15
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
16
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
17
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
18
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
19
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
20
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई

उपनगर विकासाकडे हवे लक्ष

By admin | Updated: March 30, 2017 02:17 IST

गाव ते महानगर, मेट्रोसिटी आणि आता स्मार्ट सिटी अशी पिंपरी-चिंचवड शहराची वाटचाल सुरू झाली आहे.

गाव ते महानगर, मेट्रोसिटी आणि आता स्मार्ट सिटी अशी पिंपरी-चिंचवड शहराची वाटचाल सुरू झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शहराचा समावेश स्मार्ट सिटीत केला आहे. पिंपरी-चिंचवडला स्मार्ट करीत असताना आजुबाजूची हिंजवडी, चाकण, तळेगाव ही उपनगरेही स्मार्ट करण्याच्या दृष्टीने प्रयत्न व्हायला हवेत. प्रयत्न होतातहेत, त्यास गती मिळायला हवी. पिंपरी-चिंचवड या शहराची वाटचाल स्मार्टसिटीच्या ऐकेकाळी शिक्षणाचे माहेर समजले जाणाऱ्या शहरातील शिवारालगतचा पिंपरी-चिंचवड हा गावांचा भाग आता आयटी, औद्योगिक शहर म्हणून नावारूपाला येत आहे. यामुळे तळेगाव, चाकण, हिंजवडी या आजूबाजूच्या परिसराचाही नियोजनबद्ध विकास करणे गरजेचे आहे. पिंपरीच्या सर्वांगिण विकासासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री गिरीश बापट, खासदार श्रीरंग बारणे, अमर साबळे, आमदार लक्ष्मण जगताप, महेश लांडगे, गौतम चाबुकस्वार, संजय भेगडे आणि पीएमआरडीएचे प्रमुख महेश झगडे, आयुक्त दिनेश वाघमारे यांच्याकडून शहर स्मार्ट करण्याच्या दृष्टीने शहरास मोठ्या अपेक्षा आहे.नुकतीच पीएमआरडीए चीही स्थापना झाली आहे. त्यामुळे पुणे आणि पुण्यालगत असलेल्या उपनगरांचा नियोजनबद्ध विकास करण्याच्या दृष्टीने हे सूचक आणि परिणामकारक असे पाऊल आहे. त्यामुळे पीएमआरडीएच्या माध्यमातून कालबद्ध असा कार्यक्रम आखणे गरजेचे आहे. नुसता कार्यक्रम न आखता त्यांची प्रभावीपणे अंमलबजावणी कशी होईल, यादृष्टीने पावले टाकण्याची गरज आहे. त्याचबरोबर त्यासाठी आवश्यक असणाऱ्या पायाभूत सुविधांचाही विचार करण्याची गरज आहे.शहराचे सौंदर्य वाढविण्याचे काम जसे महापालिकेने केले, तसेच येथील विविध बांधकाम व्यावसायिकांनीही केले आहे. मोठे-मोठे आकाशाला गवसणी घालणारे, आणि अगदी स्वप्नवत वाटणारे गृहप्रकल्प निर्माण होत आहेत. पिंपरी-चिंचवड उद्योगनगरी लगत असणाऱ्या हिंंजवडी, रावेत वाकड परिसराचाही विकास वेगाने होत आहे. विविध परिसरात व्यावसायिक बाजारपेठा, मॉल, मल्टिप्लेक्स, पंच तारांकित हॉटेल, शैक्षणिक संकुले, डोळे दीपविणाऱ्या बागा, उद्याने, सभागृहे, नाट्यगृहे विकसित झाल्याने नवा लुक आला आहे. विकास होत असला तरी वाढती लोकसंख्या लक्षात घेता या शहरांचे पुढील पंचवीस ते पन्नास वर्षांचा कालखंड लक्षात घेता नियोजन करणे गरजेचे आहे. मेट्रोला गती मिळाली आहे. आता रिंग रेल्वे, स्काय बस हे प्रकल्प लवकरात लवकर राबविण्याची गरज आहे. लोकसंख्या लक्षात घेता रस्ते हे प्रशस्त तर हवेच त्याचबरोबर, पादचारी मार्ग, सायकल ट्रॅक, हलकी वाहने, जड वाहने यासाठी स्वतंत्र लेन असायला हव्यात. हिंजवडी ते लोहगाव विमान तळ हा मेट्रो मार्गही लवकर व्हावा.

कृष्णकुमार गोयल(लेखक प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक व कोहिनूर समूहाचे प्रमुख आहेत)