शहरं
Join us  
Trending Stories
1
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
2
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
3
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
4
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
5
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण
6
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
7
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
8
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
9
बाजार सपाट पातळीवर बंद; रिलायन्सचा शेअर पुन्हा आला धावून, 'या' सेक्टरवर दबाव
10
ATM मधून वारंवार पैसे काढायची सवय असेल तर ती बदला, नाहीतर १ मे पासून होईल नुकसान
11
अण्वस्त्रांची धमकी देणाऱ्या पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांचे तोंड भारताने केले बंद; एक्स अकाउंटवर घातली बंदी
12
Viral Video: बिबट्या थेट पोलीस ठाण्यातच आला! पोलिसाने पाहिलं, पण नंतर काय घडलं?
13
इलेक्ट्रिक व्हेईकल घेणाऱ्यांसाठी CM फडणवीसांची मोठी घोषणा; टोलमाफी देण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
14
...म्हणून मुलाचं नाव बॉबी ठेवलं! किशोरी शहाणेंनी सांगितलं कारण, म्हणाल्या- "मी मराठी, नवरा पंजाबी आणि सासू..."
15
Mumbai Accident: ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न अंगलट; दुचाकीवर पाठी बसलेल्या तरुणीचा ट्रकखाली चिरडून मृत्यू
16
पाकिस्तानने कुठे लपवलाय अण्वस्त्रांचा साठा? 'या' अहवालाने केली पाकची पोलखोल...
17
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?
18
डॉलरच्या तुलनेत रुपयाची जोरदार कामगिरी; आशियातील सर्वात मजबूत चलन, ही आहेत ५ कारणे
19
टक्केवारीच्या आरोपानंतर परभणीचे जिल्हा नियोजन अधिकारी कार्यमुक्त; अधिकाऱ्यांमध्ये खळबळ
20
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  

उपनगर विकासाकडे हवे लक्ष

By admin | Updated: March 30, 2017 02:17 IST

गाव ते महानगर, मेट्रोसिटी आणि आता स्मार्ट सिटी अशी पिंपरी-चिंचवड शहराची वाटचाल सुरू झाली आहे.

गाव ते महानगर, मेट्रोसिटी आणि आता स्मार्ट सिटी अशी पिंपरी-चिंचवड शहराची वाटचाल सुरू झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शहराचा समावेश स्मार्ट सिटीत केला आहे. पिंपरी-चिंचवडला स्मार्ट करीत असताना आजुबाजूची हिंजवडी, चाकण, तळेगाव ही उपनगरेही स्मार्ट करण्याच्या दृष्टीने प्रयत्न व्हायला हवेत. प्रयत्न होतातहेत, त्यास गती मिळायला हवी. पिंपरी-चिंचवड या शहराची वाटचाल स्मार्टसिटीच्या ऐकेकाळी शिक्षणाचे माहेर समजले जाणाऱ्या शहरातील शिवारालगतचा पिंपरी-चिंचवड हा गावांचा भाग आता आयटी, औद्योगिक शहर म्हणून नावारूपाला येत आहे. यामुळे तळेगाव, चाकण, हिंजवडी या आजूबाजूच्या परिसराचाही नियोजनबद्ध विकास करणे गरजेचे आहे. पिंपरीच्या सर्वांगिण विकासासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री गिरीश बापट, खासदार श्रीरंग बारणे, अमर साबळे, आमदार लक्ष्मण जगताप, महेश लांडगे, गौतम चाबुकस्वार, संजय भेगडे आणि पीएमआरडीएचे प्रमुख महेश झगडे, आयुक्त दिनेश वाघमारे यांच्याकडून शहर स्मार्ट करण्याच्या दृष्टीने शहरास मोठ्या अपेक्षा आहे.नुकतीच पीएमआरडीए चीही स्थापना झाली आहे. त्यामुळे पुणे आणि पुण्यालगत असलेल्या उपनगरांचा नियोजनबद्ध विकास करण्याच्या दृष्टीने हे सूचक आणि परिणामकारक असे पाऊल आहे. त्यामुळे पीएमआरडीएच्या माध्यमातून कालबद्ध असा कार्यक्रम आखणे गरजेचे आहे. नुसता कार्यक्रम न आखता त्यांची प्रभावीपणे अंमलबजावणी कशी होईल, यादृष्टीने पावले टाकण्याची गरज आहे. त्याचबरोबर त्यासाठी आवश्यक असणाऱ्या पायाभूत सुविधांचाही विचार करण्याची गरज आहे.शहराचे सौंदर्य वाढविण्याचे काम जसे महापालिकेने केले, तसेच येथील विविध बांधकाम व्यावसायिकांनीही केले आहे. मोठे-मोठे आकाशाला गवसणी घालणारे, आणि अगदी स्वप्नवत वाटणारे गृहप्रकल्प निर्माण होत आहेत. पिंपरी-चिंचवड उद्योगनगरी लगत असणाऱ्या हिंंजवडी, रावेत वाकड परिसराचाही विकास वेगाने होत आहे. विविध परिसरात व्यावसायिक बाजारपेठा, मॉल, मल्टिप्लेक्स, पंच तारांकित हॉटेल, शैक्षणिक संकुले, डोळे दीपविणाऱ्या बागा, उद्याने, सभागृहे, नाट्यगृहे विकसित झाल्याने नवा लुक आला आहे. विकास होत असला तरी वाढती लोकसंख्या लक्षात घेता या शहरांचे पुढील पंचवीस ते पन्नास वर्षांचा कालखंड लक्षात घेता नियोजन करणे गरजेचे आहे. मेट्रोला गती मिळाली आहे. आता रिंग रेल्वे, स्काय बस हे प्रकल्प लवकरात लवकर राबविण्याची गरज आहे. लोकसंख्या लक्षात घेता रस्ते हे प्रशस्त तर हवेच त्याचबरोबर, पादचारी मार्ग, सायकल ट्रॅक, हलकी वाहने, जड वाहने यासाठी स्वतंत्र लेन असायला हव्यात. हिंजवडी ते लोहगाव विमान तळ हा मेट्रो मार्गही लवकर व्हावा.

कृष्णकुमार गोयल(लेखक प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक व कोहिनूर समूहाचे प्रमुख आहेत)