शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
3
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
4
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
5
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
6
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
7
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
8
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
9
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
10
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
11
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
12
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
13
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
14
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
15
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
16
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
17
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
18
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
19
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
20
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती

स्वच्छ, सुंदर शहरासाठी पुढे या, महापालिकेकडून आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2017 04:38 IST

शहराची स्वच्छता राखणे हे शहरातील प्रत्येक नागरिकांचे कर्तव्य असून, विशेषत: महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी स्वच्छ भारत अभियानात सक्रिय सहभाग घ्यावा.

पिंपरी : शहराची स्वच्छता राखणे हे शहरातील प्रत्येक नागरिकांचे कर्तव्य असून, विशेषत: महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी स्वच्छ भारत अभियानात सक्रिय सहभाग घ्यावा. केंद्र शासनाने विकसीत केलेल्या स्वच्छता अ‍ॅपचा वापर करून त्याद्वारे शहर स्वच्छ व सुंदर करण्यासाठी पुढे यावे, असे आवाहन सह आयुक्त तथा स्वच्छ शहर संचालक दिलीप गावडे यांनी केले.महापालिकेच्या वतीने व राजमाता जिजाऊ महाविद्यालय, लांडेवाडी यांच्या सहकार्याने स्वच्छ महाराष्ट्र, स्वच्छ भारत अभियानांतर्गत राबविलेल्या स्वच्छता अभियान रॅलीतील विद्यार्थ्यांना संबोधित करताना ते बोलत होते.या वेळी नगरसदस्य विक्रांत लांडे, सहायक आयुक्त अण्णा बोदडे, राजमाता जिजाऊ महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गौतम भोंग, उपप्राचार्य डॉ. अशोक पाटील, प्रा. श्रेया दाणे, सविता वीर, जयश्री आरमणी, मारुती शिंदे, माहिती व जनसंपर्क विभागाचे रमेश भोसले, राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे महाविद्यालयीन विद्यार्थी उपस्थित होते.रॅलीची सुरुवात राजमाता जिजाऊ महाविद्यालयापासून झाली. या रॅलीचा मार्ग लांडेवाडी चौक, सावित्रीबाई फुले शाळा, गव्हाणे वस्ती परिसर व पुन्हा राजमाता जिजाऊ महाविद्यालय असा होता. या रॅलीमध्ये महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा मोठा सहभाग होता. रॅलीमध्ये स्वच्छ पिंपरी-चिंचवड शहराबाबत घोषणा देण्यात आल्या. ही रॅली पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती.काही जण विद्यार्थी देत असलेल्या घोषणांना प्रतिसादही देत होते.महापालिकेचे सहायक आयुक्त बोदडे यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. स्वच्छताविषयक अ‍ॅपची सविस्तर माहिती त्यांनी विद्यार्थ्यांना दिली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जनसंपर्क विभागाचे रमेश भोसले यांनी केले. आभार प्रा. दीपक पावडे यांनी मानले.मंगळवारी सांगवी येथील बाबूराव घोलप महाविद्यालयातील विद्यार्थी, शिक्षक आणि नागरिकांनी महापालिकेच्या सहकार्याने परिसरात रॅली काढत स्वच्छताविषयक जनजागृती केली. ह क्षेत्रीय कार्यालयाच्या क्षेत्रीय अधिकारी आशा राऊत, स्थायी समितीचे माजी सभापती राजेंद्र राजापुरे यांनी मार्गदर्शन केले. प्रभाग अध्यक्ष अंबरनाथ कांबळे, नगरसदस्या माधवी राजापुरे, सीमा चौगुले, सह आयुक्त तथा स्वच्छ शहर संचालक दिलीप गावडे, सहायक आयुक्त अण्णा बोदडे, प्राचार्य डॉ. बाळासाहेब झावरे, उपप्राचार्य डॉ. लतीश निकम, डॉ. शिवाजी ढगे, प्रा. डॉ. नरसिंग गिरी, प्रा़ स्वप्निल जगताप, ज्ञानेश्वर जांभूळकर, विठ्ठल नाईकवडे, विजय घारे, प्रवीण येवले, विद्या पठारे, अमृता इनामदार, कार्यालयीन अधीक्षक अशोक कोंढावळे उपस्थित होते.रॅलीची सुरुवात घोलप महाविद्यालयापासून झाली़ फेमस चौक, शिवाजी चौक, कृष्णा चौक व साई चौकापासून पुन्हा महाविद्यालय असा रॅलीचा मार्ग होता. रॅलीमध्ये विद्यार्थ्यांनी ‘अब ना रहेगी हगणदरी, हमने ली है जिम्मेदारी’, ‘स्वच्छतेची कास धरू, पिंपरी-चिंचवड स्वच्छ करू’, ‘स्वच्छ भारत आमचा नारा, रोगराईला नाही थारा’ अशा स्वच्छतेबाबतच्या जनजागृतीपर घोषणा दिल्या.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड