शहरं
Join us  
Trending Stories
1
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
2
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
3
“सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा”: अजित पवार
4
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
5
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
6
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
7
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
8
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
9
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
10
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
11
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
12
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
13
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
14
Maharashtra Day 2025 Wishes: महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा द्या 'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून, शेअर करा सुंदर शुभेच्छापत्रं!
15
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
16
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
17
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
18
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
19
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)

अधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीबद्दल नाराजी

By admin | Updated: May 9, 2017 03:40 IST

शासनाच्या विविध खात्यांचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित राहत नसल्याबद्दल कामशेतकरांनी सोमवारी ग्रामसभेत नाराजी प्रकट केली.

लोकमत न्यूज नेटवर्ककामशेत : शासनाच्या विविध खात्यांचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित राहत नसल्याबद्दल कामशेतकरांनी सोमवारी ग्रामसभेत नाराजी प्रकट केली. महाराष्ट्र दिनी होणारी ग्रामसभा कोरमअभावी तहकूब करावी लागली होती. ती सोमवारी सकाळी १० वाजता जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रिंकू बालवाडी येथे सरपंच सारिका शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. उपसरपंच गणपत शिंदे, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवक बाळासाहेब मतकर व ग्रामस्थ उपस्थित होते. कामशेतची लोकसंख्या मोठी असूनही ग्रामसभेला १६ सदस्यांपैकी सरपंचांसह सात सदस्य आणि ३४ ग्रामस्थांनी हजेरी लावली होती. ग्रामसभा हे ग्रामस्थांचे हक्काचे व्यासपीठ असूनही स्थानिकांची उदासीनता प्रकर्षांने दिसत आहे. प्रत्येक ग्रामसभेला ठरावीक जागरूक नागरिकच उपस्थित राहत असल्याचे दिसत आहे. मावळात चोऱ्या व दरोड्याचे प्रमाण वाढत असून, धामणेगावातील दरोड्यात तीन जणांचा बळी गेला. गावांच्या सुरक्षेसाठी ग्रामसुरक्षा दल स्थापन करण्याचे ठरविण्यात आले आहे. त्या संदर्भात पोलीस प्रशासनाने दिलेले पत्र ग्रामसेवकांनी वाचून दाखवले. पण, पोलीस ठाण्यातील एकही अधिकारी अथवा कर्मचारी एकाही ग्रामसभेला उपस्थित राहत नाही. ग्रामसुरक्षा दल स्थापन कसे करायचे, दलात किती सदस्य, सदस्यांची कामे काय या विषयी ग्रामस्थांमध्ये संभ्रम आहे. याबाबतची माहिती कोण देणार, हा प्रश्न नागरिकांनी उपस्थित करून पोलिसांच्या उदासीनतेबाबत नाराजी व्यक्त केली. या विषयावर चर्चाही झाली. पोलीस अधिकारी अथवा कर्मचारी पुढील ग्रामसभेला उपस्थित राहिल्यास यावर विचार करावा, अशी मागणी नागरिकांनी केली. ग्रामसेवकांनी अहवालाचे वाचन करून शासनाच्या योजनांची माहिती दिली. कृषी योजना, कृषी औजारे व तांत्रिक उपकरणांची अनुदानासह माहिती वाचून दाखवली. खासगी दवाखान्यांच्या प्रमाणपत्राचा विषय नागरिकांनी पुन्हा उपस्थित करण्यात आला. तालुका व जिल्हा आरोग्य विभाग अवैध डॉक्टर व हॉस्पिटलवर कारवाई करणार आहे, असे त्यांनी सांगितले. नागरिकांच्या लेखी प्रश्नांची उत्तरे या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यातील विशेष ग्रामसभेत देण्यात येतील, असे सांगून ग्रामसभा संपन्न झाली.