शहरं
Join us  
Trending Stories
1
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
2
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
3
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
4
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
5
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
6
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
7
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
8
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण
9
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
10
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
11
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
12
बाजार सपाट पातळीवर बंद; रिलायन्सचा शेअर पुन्हा आला धावून, 'या' सेक्टरवर दबाव
13
ATM मधून वारंवार पैसे काढायची सवय असेल तर ती बदला, नाहीतर १ मे पासून होईल नुकसान
14
अण्वस्त्रांची धमकी देणाऱ्या पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांचे तोंड भारताने केले बंद; एक्स अकाउंटवर घातली बंदी
15
Viral Video: बिबट्या थेट पोलीस ठाण्यातच आला! पोलिसाने पाहिलं, पण नंतर काय घडलं?
16
इलेक्ट्रिक व्हेईकल घेणाऱ्यांसाठी CM फडणवीसांची मोठी घोषणा; टोलमाफी देण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
17
...म्हणून मुलाचं नाव बॉबी ठेवलं! किशोरी शहाणेंनी सांगितलं कारण, म्हणाल्या- "मी मराठी, नवरा पंजाबी आणि सासू..."
18
Mumbai Accident: ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न अंगलट; दुचाकीवर पाठी बसलेल्या तरुणीचा ट्रकखाली चिरडून मृत्यू
19
पाकिस्तानने कुठे लपवलाय अण्वस्त्रांचा साठा? 'या' अहवालाने केली पाकची पोलखोल...
20
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?

विकासकामांवर अव्वाच्या सवा खर्च

By admin | Updated: May 30, 2017 02:40 IST

महापालिकेने केलेल्या विविध विकासकामात अनियमितता झाली आहे. ठराविक ठेकेदारांवरच मेहेरबानी झाली असून अनेक कामांसाठी

लोकमत न्यूज नेटवर्कपिंपरी : महापालिकेने केलेल्या विविध विकासकामात अनियमितता झाली आहे. ठराविक ठेकेदारांवरच मेहेरबानी झाली असून अनेक कामांसाठी मूळ किमतीपेक्षा अधिक खर्च झाला आहे, असा सनसनाटी आरोप शिवसेना खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी केला आहे. या कामांचे ठेकेदार कोण, कागदपत्रांची पूर्तता झाली होती का, किती ठेकेदारांनी निविदा भरल्या होत्या, हे निणर्य कोणी व का घेतले, याबाबतची सविस्तर माहिती त्यांनी महापालिका आयुक्तांकडे मागितली आहे. खासदार आढळराव पाटील यांनी आयुक्त श्रावण हर्डीकर आणि सहशहर अभियंता राजन पाटील यांना पत्र पाठविले आहे. महापालिकेने शहराच्या विविध भागांत अनेक विकासकामे केली आहेत. तर काही ठिकाणी कामे सुरू आहेत. या कामांमध्ये अनियमितता असून अनेक कामांमध्ये मूळ निविदा किमतीपेक्षा अधिक खर्च झाला आहे. मूळ डिझाईनमध्ये बदल करण्याच्या नावाखाली प्रकल्पाच्या मूळ अर्थसंकल्पीय रकमेत प्रचंड वाढ केली आहे. या शिवाय ठराविक ठेकेदाराने ही कामे केल्याचे दिसून येते. भोसरी येथे पुणे-नाशिक महामार्गावर शीतलबाग येथे लोखंडी पादचारी पूल बांधला आहे. देहू - आळंदी रस्त्यावरील मोशी चौकात विकास आराखड्यातील रस्त्यावर सीडी करण्याचे काम केले आहे. आळंदी ते दिघीतील बोपखेल फाट्यापर्यंत रस्त्याचे काम केले आहे. चिंचवड येथे बास्केट ब्रीज उभारला आहे. तर, निगडीतील भक्ती- शक्ती चौकात पुणे - मुंबई महामार्गावर नवीन उड्डाणपूल आणि ग्रेडसेपरेटरचे कामालाही नुकतीच मंजुरी दिली आहे. या कामांबाबत नागरिक प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत. या विविध कामांचे डिझाईन करणाऱ्या कन्सल्टन्सींचे नाव आणि त्यांच्या पात्रतेची माहिती द्यावी. ठेकेदाराने अटींची पूर्तता करताना सर्व कागदपत्रांची पूर्तता केली होती का, याची सविस्तर माहिती द्यावी, अशी मागणी आढळराव पाटील यांनी केली.९० कोटींचा बोजा महापालिकेवर का?देहू-आळंदी-पंढरपूर तीर्थक्षेत्र विकास निधीतून रक्कम मिळू शकत असताना महापालिकेने या रस्त्यासाठी स्वत:चा निधी वापरण्याचे काय कारण, असा सवाल करत खासदार आढळराव पाटील म्हणाले, महापालिकेला हा निधी अन्य विकासकामांसाठी वापरता येऊ शकला असता. निगडीतील भक्ती- शक्ती चौक हासुद्धा पालखी मार्गावरील चौक असल्याने तेथील पुलाचे कामही तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातून करता येणे शक्य होते. त्यामुळे महापालिकेला ९० कोटींतून इतर प्रकल्प हाती घेता आले असते.’’