शहरं
Join us  
Trending Stories
1
सोनम वांगचुक यांनीच लोकांना भडकावले; लेहमधील हिंसाचारासाठी गृहमंत्रालयाने धरले जबाबदार
2
'तुमचेही फोटो लावा'; प्रताप सरनाईकांच्या पूरग्रस्तांच्या मदतीच्या किटवरुन अजितदादांनी विरोधकांना सुनावलं
3
"अक्खी दुनिया एक तरफ, मेरा बुमराह एक तरफ"; दुबईत बॉलिवूडकरांसमोर संजनाची डायलॉगबाजी (VIDEO)
4
"मुस्लिमांनी अयोध्या सोडावी, या मंदिरनगरीत मशिदीच्या बांधकामाला परवानगी दिली जाणार नाही..."; भाजप नेते विनय कटियार यांचं विधान
5
Asia Cup 2025: सलग पाचव्या विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल! आता बांगलादेश-पाक यांच्यात रंगणार सेमीफायनल
6
MBBS आणि वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी १० हजार जागा वाढवण्यास मान्यता; प्रत्येक जागोसाठी १.५० कोटींचा खर्च
7
"रशिया कागदी वाघ नाही, तर...!"; डोनाल्ड ट्रम्प म्हणाले होते 'कागदी वाघ', रशियानं केला पलटवार; म्हणाला...
8
Pahalgam Terror Attack : मोठं यश...! पहलगाम हल्ल्यात दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या मोहम्मद कटारियाला अटक; असा पकडला
9
अभिषेकनं साधला मोठा डाव! आधी हिटमॅन रोहितला ओव्हरटेक केलं, मग गुरबाझचा विक्रमही मोडला
10
३ दिवस भारताचे मंत्री, अधिकारी अमेरिकेत तळ ठोकून; ट्रेड डील, ट्रम्प टॅरिफ, H1B व्हिसावर चर्चा
11
पूरग्रस्तांच्या मदतीसाठी भाजपा खासदार, आमदारांचा मोठा निर्णय, एक महिन्याचे वेतन देणार!
12
IND vs BAN : बांगलादेशच्या नव्या कॅप्टननं नशीब काढलं, पण तो गडबडला! सूर्या म्हणाला, आमच्या मनासारखं झालं
13
एकीकडे डोनाल्ड ट्रम्प यांची 'बोंबाबोंब', दुसरीकडे रशियाने मात्र थेट इराणसोबत केला अणू करार
14
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान
15
“शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत, ड्रोनने केलेले पंचनामे मान्य करणार”; CM फडणवीसांची ग्वाही
16
त्याला अजून फाशी का दिली नाही? मुख्यमंत्र्यांची हत्या करणाऱ्या आरोपीच्या याचिकेवर कोर्टाने सरकारला फटकारलं
17
सरकार शेतकऱ्यांचे आहे, चिंता करू नका! एकनाथ शिंदे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिला धीर
18
वायरल 'बाल्कनी' हिमनगाचे केवळ टोक? ९९८ कोटींचा इंडोरा–दिगोरी उड्डाणपूलामुळे प्रभावित मालमत्तांची यादी तयार करण्याचे आदेश
19
“पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला १० किलो गहू-तांदूळ, केंद्राची मदत १०० टक्के येईल”: छगन भुजबळ
20
"प्रत्येकाला स्वाभिमान असतो, त्याने..."; शाहीन शाह आफ्रिदीकडून हॅरिस रौफच्या कृतीचे समर्थन

विकासकामांवर अव्वाच्या सवा खर्च

By admin | Updated: May 30, 2017 02:40 IST

महापालिकेने केलेल्या विविध विकासकामात अनियमितता झाली आहे. ठराविक ठेकेदारांवरच मेहेरबानी झाली असून अनेक कामांसाठी

लोकमत न्यूज नेटवर्कपिंपरी : महापालिकेने केलेल्या विविध विकासकामात अनियमितता झाली आहे. ठराविक ठेकेदारांवरच मेहेरबानी झाली असून अनेक कामांसाठी मूळ किमतीपेक्षा अधिक खर्च झाला आहे, असा सनसनाटी आरोप शिवसेना खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी केला आहे. या कामांचे ठेकेदार कोण, कागदपत्रांची पूर्तता झाली होती का, किती ठेकेदारांनी निविदा भरल्या होत्या, हे निणर्य कोणी व का घेतले, याबाबतची सविस्तर माहिती त्यांनी महापालिका आयुक्तांकडे मागितली आहे. खासदार आढळराव पाटील यांनी आयुक्त श्रावण हर्डीकर आणि सहशहर अभियंता राजन पाटील यांना पत्र पाठविले आहे. महापालिकेने शहराच्या विविध भागांत अनेक विकासकामे केली आहेत. तर काही ठिकाणी कामे सुरू आहेत. या कामांमध्ये अनियमितता असून अनेक कामांमध्ये मूळ निविदा किमतीपेक्षा अधिक खर्च झाला आहे. मूळ डिझाईनमध्ये बदल करण्याच्या नावाखाली प्रकल्पाच्या मूळ अर्थसंकल्पीय रकमेत प्रचंड वाढ केली आहे. या शिवाय ठराविक ठेकेदाराने ही कामे केल्याचे दिसून येते. भोसरी येथे पुणे-नाशिक महामार्गावर शीतलबाग येथे लोखंडी पादचारी पूल बांधला आहे. देहू - आळंदी रस्त्यावरील मोशी चौकात विकास आराखड्यातील रस्त्यावर सीडी करण्याचे काम केले आहे. आळंदी ते दिघीतील बोपखेल फाट्यापर्यंत रस्त्याचे काम केले आहे. चिंचवड येथे बास्केट ब्रीज उभारला आहे. तर, निगडीतील भक्ती- शक्ती चौकात पुणे - मुंबई महामार्गावर नवीन उड्डाणपूल आणि ग्रेडसेपरेटरचे कामालाही नुकतीच मंजुरी दिली आहे. या कामांबाबत नागरिक प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत. या विविध कामांचे डिझाईन करणाऱ्या कन्सल्टन्सींचे नाव आणि त्यांच्या पात्रतेची माहिती द्यावी. ठेकेदाराने अटींची पूर्तता करताना सर्व कागदपत्रांची पूर्तता केली होती का, याची सविस्तर माहिती द्यावी, अशी मागणी आढळराव पाटील यांनी केली.९० कोटींचा बोजा महापालिकेवर का?देहू-आळंदी-पंढरपूर तीर्थक्षेत्र विकास निधीतून रक्कम मिळू शकत असताना महापालिकेने या रस्त्यासाठी स्वत:चा निधी वापरण्याचे काय कारण, असा सवाल करत खासदार आढळराव पाटील म्हणाले, महापालिकेला हा निधी अन्य विकासकामांसाठी वापरता येऊ शकला असता. निगडीतील भक्ती- शक्ती चौक हासुद्धा पालखी मार्गावरील चौक असल्याने तेथील पुलाचे कामही तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातून करता येणे शक्य होते. त्यामुळे महापालिकेला ९० कोटींतून इतर प्रकल्प हाती घेता आले असते.’’