शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

कामचुकारपणा करणाऱ्या दोषींवर कारवाई हवीच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2018 04:30 IST

पिंपरी : सल्लागार संस्थेच्या कामचुकारपणामुळे पिंपरी-चिंचवड शहराला राहण्यायोग्य शहरांच्या यादीत ६९वा क्रमांक मिळाला. यात दोषी असणाऱ्यांवर महापालिका आयुक्तांनी कडक कारवाई ...

पिंपरी : सल्लागार संस्थेच्या कामचुकारपणामुळे पिंपरी-चिंचवड शहराला राहण्यायोग्य शहरांच्या यादीत ६९वा क्रमांक मिळाला.यात दोषी असणाऱ्यांवर महापालिका आयुक्तांनी कडक कारवाई करावी, अशी मागणी महापालिकेतील विविध पक्षांच्या गटनेत्यांनी केली.

केंद्र सरकारच्या वतीने घेण्यात आलेल्या राहण्यायोग शहराच्या यादीत उद्योगनगरीची पिछाडी झाली. सल्लागारावर महापालिकेची भिस्त असल्याने, केंद्राने मागविलेली माहिती परिपूर्ण नसल्याने गुणवत्ता असतानाही शहर मागे पडले. सल्लागारामुळेच महापालिकेला अपयश आले. निष्क्रिय प्रशासनामुळेच अपयशाचे खापर सत्ताधारी पक्ष आणि शहरवासीयांवर फुटले. केंद्राला पाठविलेला अहवाल लोकमतने मिळविला आणि अहवालातील सत्य जनतेसमोर आणले. अहवालातील गोलमाल उघड केला. सल्लागारांची पाठराखण महापालिका करीत असल्याचे शहरवासीयांच्या निदर्शनास आणून दिले. प्रशासनामुळेच शहराला अपयश आले. दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी महापालिकेतील विविध पक्षांच्या गटनेत्यांनी केली आहे.

शिवसेनेचे गटनेते राहुल कलाटे म्हणाले, ‘‘महापालिकेची भिस्त ही सल्लागारांवरच आहे. सल्लागारांना पोसण्याचे काम सत्ताधारी करीत आहेत. मोठ्या विकासकामांना सल्लागार नेमणे योग्य आहे. मात्र, छोट्या कामांना नेमणे चुकीचे आहे. राहण्यायोग्य शहरात प्रशासनाच्या चुकीने आपण मागे पडलो. त्यामुळे दोषी कोणीही असो, त्यावर कारवाई होणे गरजेचे आहे.’’

मनसे गटनेते सचिन चिखले म्हणाले, ‘‘सल्लागारांवर कोट्यवधींचा खर्च होत आहे. राहण्यायोग्य शहरात आपली पिछाडी झाली. खरेच आपले शहर राहण्यायोग्य नाही का, याचे उत्तर होय हे आहे. असे असताना केंद्राला पाठविलेली माहिती, अहवाल याची तपासणी करणे गरजेचे आहे. प्रशासनाने आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे.’’महापौर : प्रशासनाने आत्मपरीक्षण करावेमहापौर राहुल जाधव म्हणाले, ‘‘आपले शहर स्मार्ट सिटीकडे वाटचाल करीत आहे. पुण्या-मुंबईचे लोक आपल्या शहरात वास्तव्य करण्यास घर घेण्यास प्राधान्य देतात. मात्र, राहण्यायोग्य शहरांच्या यादीत आपण मागे का पडलो, याचे आत्मपरीक्षण प्रशासनाने करायला हवे. चुका शोधायला हव्यात. उपाययोजना करायला हव्यात.’’

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड