शहरं
Join us  
Trending Stories
1
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
2
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
3
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
4
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
5
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
6
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं
7
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
8
"मी तिच्याशिवाय राहू शकत नाही, दहशतवाद्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे"; आईपासून दुरावली मुलं
9
रिकी पाँटिंगमुळे पंजाब आयपीएलची ट्रॉफी जिंकणार नाही, माजी क्रिकेटपटूचे गंभीर आरोप
10
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
11
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
12
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
13
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
14
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?
15
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
16
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
17
पती झाला हैवान! बहिणीच्या लग्नासाठी भावाने घर विकलं, हुंड्यासाठी सासरच्यांनी तिलाच मारलं
18
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
19
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?

सेवारस्त्यावर खड्डेच खड्डे!, दुचाकीस्वार घसरून होणाऱ्या अपघाताचे प्रमाण वाढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2018 01:45 IST

जुन्या मुंबई-पुणे राष्ट्रीय मार्गावर पवनानगर फाटा येथे सुरू असलेल्या उड्डाणपुलाच्या कामासाठी काही अंतरावर मार्ग बंद करून मुख्य मार्गावरील वाहने सेवारस्त्याने वळवण्यात आली आहेत. सेवारस्त्याचे काम पूर्ण करण्याआधीच मार्ग वळवण्यात आल्याने वाहतुकीची समस्या गंभीर बनली आहे.

कामशेत - जुन्या मुंबई-पुणे राष्ट्रीय मार्गावर पवनानगर फाटा येथे सुरू असलेल्या उड्डाणपुलाच्या कामासाठी काही अंतरावर मार्ग बंद करून मुख्य मार्गावरील वाहने सेवारस्त्याने वळवण्यात आली आहेत. सेवारस्त्याचे काम पूर्ण करण्याआधीच मार्ग वळवण्यात आल्याने वाहतुकीची समस्या गंभीर बनली आहे. त्यात सेवारस्त्यावर सर्वत्र खड्ड्यांचे व खडीचे साम्राज्य पसरल्याने महामार्गावरील वाहनचालकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. अनपेक्षितपणे पुढे आलेल्या खड्डयात वाहने आदळत आहेत. तर खड्डे चुकवण्याच्या नादात अपघातांना आमंत्रण मिळत आहे. तर स्थानिकांना सेवारस्त्यावरून जीव मुठीत घेऊन चालावे लागत आहे.मागील सतरा ते अठरा महिन्यांपासून सुरू असलेल्या महामार्गावर पवनानगर फाटा येथील उड्डाणपुलाचे काम मे महिन्यात मुदत संपूनही पन्नास टक्के ही पूर्ण झाले नाही. येथे पवनानगरकडून कामशेतमध्ये येणारे जाणारे नागरिक महामार्ग ओलांडताना अपघातात शेकडो लोकांनी आपले प्राण गमावले. तर अनेकांना अपंगत्व आले. महामार्ग ओलांडणे नागरिकांच्या जीवावर बेतत असल्याने येथे उड्डाणपूल व्हावा यासाठी अनेकदा रस्ता रोको व विविध आंदोलने झाली. त्यातूनच मागील वर्षी जानेवारी महिन्यात येथे उड्डाणपुलाचे काम सुरू झाले. या वेळी स्थानिक नागरिकांसह पवनानगर भागातील सर्व नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. मात्र या उड्डाणपुलाच्या कामाची मुदत संपून दीड महिना उलटला तरी पुलाचे काम पूर्ण होत नसल्याने शिवाय सेवारस्त्यावर पडलेले खड्डे व पसरलेली खडी, सेवारस्त्यावर व कडेला झालेला चिखल, गटारीसाठी खोदलेले मोठे खड्डे आदी व इतर अनेक समस्यांनी नागरिक त्रस्त झाले आहेत. एक वेळ महामार्ग ओलांडणे परवडत होते; पण या सेवारस्त्यावरून चालणे जीवघेणे झाले आहे. लहान लहान चिमुकल्यांना शाळेत सोडण्यासाठी जाणाºया महिला व पालकयांच्यात मोठी भीती निर्माणझाली आहे. त्यामुळेच नको आम्हाला तुमचा उड्डाणपूल आमचा जुना रस्ताच आम्हाला परत द्या, अशी मागणी स्थानिक नागरिक करू लागले आहेत.वाहतूककोंडीची समस्या गंभीर१कामशेतमधील या उड्डाणपुलाच्या कामी नागरिकांची मोठी परवड होत आहे. महामार्गाच्या दोन्ही बाजूच्या सेवारस्त्यांवर मोठ मोठे खड्डे पडले आहेत. त्यात सेवारस्त्याच्या कडेला गटारीसाठी खोदण्यात आलेल्या खड्ड्यांमुळे वाहनचालक व पादचाºयांना मोठी कसरत करावी लागत आहे. या खड्ड्यांमध्ये काही दुचाकीस्वार पडून अपघात झाले आहेत. शिवाय मार्गावरून जाणारी अवजड वाहने व इतर वाहनांचा अखंड प्रवास सुरू असून, त्यांनाही येथून प्रवास करणे जिकरीचे जाले आहे. यातूनच महामार्गावर वाहतूककोंडीची समस्या गंभीर बनली आहे. दोन्ही लेनवर आठ ते दहा किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागत आहेत.उड्डाणपुलाच्या कामात दिरंगाई२ अनेक माहीतगार वाहनचालक कामशेतमधील अंतर्गत रस्त्यावरून प्रवास करत असल्याने शहरातील वाहतुकीवर परिणाम होत आहे. या उड्डाणपुलाचे काम आणखी किती वर्षे सुरू राहणार आहे. स्थानिक नागरिकांसह पवनानगर भागातील नागरिक व महामार्गावरील वाहनचालक यांचा जीवघेणा प्रवास सुरू आहे. त्यामुळेच येत्याकाही दिवसांत उड्डाणपुलाच्या कामामध्येझालेली दिरंगाई, नागरिकांची गैरसोय तसेच मोठ्या प्रमाणात झालेल्या भ्रष्टाचाराच्या विरोधात राजकीय पक्ष आंदोलन करण्यात येणार असल्याची चर्चा परिसरात सुरू आहे.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडnewsबातम्या