शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

सेवारस्त्यावर खड्डेच खड्डे!, दुचाकीस्वार घसरून होणाऱ्या अपघाताचे प्रमाण वाढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2018 01:45 IST

जुन्या मुंबई-पुणे राष्ट्रीय मार्गावर पवनानगर फाटा येथे सुरू असलेल्या उड्डाणपुलाच्या कामासाठी काही अंतरावर मार्ग बंद करून मुख्य मार्गावरील वाहने सेवारस्त्याने वळवण्यात आली आहेत. सेवारस्त्याचे काम पूर्ण करण्याआधीच मार्ग वळवण्यात आल्याने वाहतुकीची समस्या गंभीर बनली आहे.

कामशेत - जुन्या मुंबई-पुणे राष्ट्रीय मार्गावर पवनानगर फाटा येथे सुरू असलेल्या उड्डाणपुलाच्या कामासाठी काही अंतरावर मार्ग बंद करून मुख्य मार्गावरील वाहने सेवारस्त्याने वळवण्यात आली आहेत. सेवारस्त्याचे काम पूर्ण करण्याआधीच मार्ग वळवण्यात आल्याने वाहतुकीची समस्या गंभीर बनली आहे. त्यात सेवारस्त्यावर सर्वत्र खड्ड्यांचे व खडीचे साम्राज्य पसरल्याने महामार्गावरील वाहनचालकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. अनपेक्षितपणे पुढे आलेल्या खड्डयात वाहने आदळत आहेत. तर खड्डे चुकवण्याच्या नादात अपघातांना आमंत्रण मिळत आहे. तर स्थानिकांना सेवारस्त्यावरून जीव मुठीत घेऊन चालावे लागत आहे.मागील सतरा ते अठरा महिन्यांपासून सुरू असलेल्या महामार्गावर पवनानगर फाटा येथील उड्डाणपुलाचे काम मे महिन्यात मुदत संपूनही पन्नास टक्के ही पूर्ण झाले नाही. येथे पवनानगरकडून कामशेतमध्ये येणारे जाणारे नागरिक महामार्ग ओलांडताना अपघातात शेकडो लोकांनी आपले प्राण गमावले. तर अनेकांना अपंगत्व आले. महामार्ग ओलांडणे नागरिकांच्या जीवावर बेतत असल्याने येथे उड्डाणपूल व्हावा यासाठी अनेकदा रस्ता रोको व विविध आंदोलने झाली. त्यातूनच मागील वर्षी जानेवारी महिन्यात येथे उड्डाणपुलाचे काम सुरू झाले. या वेळी स्थानिक नागरिकांसह पवनानगर भागातील सर्व नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. मात्र या उड्डाणपुलाच्या कामाची मुदत संपून दीड महिना उलटला तरी पुलाचे काम पूर्ण होत नसल्याने शिवाय सेवारस्त्यावर पडलेले खड्डे व पसरलेली खडी, सेवारस्त्यावर व कडेला झालेला चिखल, गटारीसाठी खोदलेले मोठे खड्डे आदी व इतर अनेक समस्यांनी नागरिक त्रस्त झाले आहेत. एक वेळ महामार्ग ओलांडणे परवडत होते; पण या सेवारस्त्यावरून चालणे जीवघेणे झाले आहे. लहान लहान चिमुकल्यांना शाळेत सोडण्यासाठी जाणाºया महिला व पालकयांच्यात मोठी भीती निर्माणझाली आहे. त्यामुळेच नको आम्हाला तुमचा उड्डाणपूल आमचा जुना रस्ताच आम्हाला परत द्या, अशी मागणी स्थानिक नागरिक करू लागले आहेत.वाहतूककोंडीची समस्या गंभीर१कामशेतमधील या उड्डाणपुलाच्या कामी नागरिकांची मोठी परवड होत आहे. महामार्गाच्या दोन्ही बाजूच्या सेवारस्त्यांवर मोठ मोठे खड्डे पडले आहेत. त्यात सेवारस्त्याच्या कडेला गटारीसाठी खोदण्यात आलेल्या खड्ड्यांमुळे वाहनचालक व पादचाºयांना मोठी कसरत करावी लागत आहे. या खड्ड्यांमध्ये काही दुचाकीस्वार पडून अपघात झाले आहेत. शिवाय मार्गावरून जाणारी अवजड वाहने व इतर वाहनांचा अखंड प्रवास सुरू असून, त्यांनाही येथून प्रवास करणे जिकरीचे जाले आहे. यातूनच महामार्गावर वाहतूककोंडीची समस्या गंभीर बनली आहे. दोन्ही लेनवर आठ ते दहा किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागत आहेत.उड्डाणपुलाच्या कामात दिरंगाई२ अनेक माहीतगार वाहनचालक कामशेतमधील अंतर्गत रस्त्यावरून प्रवास करत असल्याने शहरातील वाहतुकीवर परिणाम होत आहे. या उड्डाणपुलाचे काम आणखी किती वर्षे सुरू राहणार आहे. स्थानिक नागरिकांसह पवनानगर भागातील नागरिक व महामार्गावरील वाहनचालक यांचा जीवघेणा प्रवास सुरू आहे. त्यामुळेच येत्याकाही दिवसांत उड्डाणपुलाच्या कामामध्येझालेली दिरंगाई, नागरिकांची गैरसोय तसेच मोठ्या प्रमाणात झालेल्या भ्रष्टाचाराच्या विरोधात राजकीय पक्ष आंदोलन करण्यात येणार असल्याची चर्चा परिसरात सुरू आहे.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडnewsबातम्या