शहरं
Join us  
Trending Stories
1
चंद्रपूर: 'फादर्स डे'च्या दिवशी पाच मुले झाली पोरकी! दोन रानटी हत्तीनी सोंडेने आपटून एकाला केले ठार
2
Kedarnath Helicopter Crash : चारधाम यात्रेची हेलिकॉप्टर सेवा स्थगित; गौरीकुंडमधील दुर्घटनेनंतर नवा आदेश
3
मोठी बातमी: पुणे पोलिसांनी केलेल्या गोळीबारात कुख्यात गुन्हेगार ठार; सोलापूर जिल्ह्यातील घटना
4
मोठा दिलासा! आधार मोफत अपडेट करण्याची शेवटची संधी? UIDAI ने तारीख बदलली!
5
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
6
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सात जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील भाविकांचा समावेश
7
सुनेची काळजी घेण्यासाठी निघालेल्या यास्मिन; तीन दिवस प्रवास पुढे ढकलला, विमान अपघातात मृत्यू
8
Navi Mumbai: नवी मुंबई विमानतळावर लँडिंग करण्याआधी वैमानिकांसमोर २२५ अडथळे!
9
वाशिमच्या मेडशी बायपासवर भीषण अपघात; दोन ठार, एक जखमी, दोघे थोडक्यात बचावले
10
लव जिहादच्या आरोपावर आमिर खानने दिलं उत्तर, म्हणाला, "माझ्या दोन्ही बहिणी अन् मुलीने..."
11
इस्रायलचा इराणवर 'वार'! तेहरानमधील संरक्षण मंत्रालयाची इमारत, अणु मुख्यालय उद्ध्वस्त
12
Thane: मुंब्रा-शीळ भागात आणखी ८ इमारती जमीनदोस्त!
13
हायकू हायकू हायकू... म्हणजेच...; पुस्तकाच्या जन्माची गोष्ट!
14
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
15
"मी एकावेळी ४-४ सिनेमे केले नाही...", दीपिकाच्या ८ तास शिफ्ट मागणीवर काजोलची प्रतिक्रिया
16
Maharashtra Govt: महावितरणची सौरऊर्जेत ३० हजार कोटींची गुंतवणूक!
17
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
18
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
19
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
20
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक

कंपनीच्या तोट्यामुळे १९५ कामगार बेरोजगार; महिंद्रा सीआयई कंपनीच्या प्रतिनिधींची तहसीलदारांसोबत बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2018 04:10 IST

कान्हे (ता. मावळ) येथील महिंद्रा सीआयई कंपनीचा सव्वाकोटी रुपयांचा तोटा झाल्याचे कारण सांगून १ जानेवारीपासून १९५ कंत्राटी कामगारांना कामावरून कमी केले आहे.

वडगाव मावळ : कान्हे (ता. मावळ) येथील महिंद्रा सीआयई कंपनीचा सव्वाकोटी रुपयांचा तोटा झाल्याचे कारण सांगून १ जानेवारीपासून १९५ कंत्राटी कामगारांना कामावरून कमी केले आहे.त्यामुळे कामगारांमध्ये निर्माण झालेला असंतोष लक्षात घेऊन तहसीलदार रणजित देसाई यांनी सोमवारी तहसील कार्यालयात कंपनीचे अधिकारी कामगारांचे प्रतिनिधीत्व करणाºया महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेचे प्रतिनिधी कामगारांची संयुक्त बैठक आयोजित केली होती. लेबर आॅफिसर आर. जी. रुमाले पोलीस निरीक्षक प्रदीप काळे, कंपनीचे एचआर प्रमुख विद्याधर भोंगे, फॅक्टरी मॅनेजर प्रमोद मंत्रवादी, निवृत्ती सावे, महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेचे उपाध्यक्ष राजेश उज्जैनकर, चिटणीस केतन नाईक, मनसेचे तालुकाध्यक्ष रुपेश म्हाळस्कर, अक्षय पनवेलकर, अक्षय पखडी आदींसह ठेकेदार व कामगार उपस्थित होते.उत्पादन कमी झाल्याने तसेच सव्वाकोटी रुपयांचा तोटा झाल्याने हंगामी कामगारांना तात्पुरते कमी केले आहे. ट्रेनिंग कामगारही कंपनीत मोठ्या प्रमाणात आले आहेत, अशी माहिती कंपनीच्या अधिकाºयांनी बैठकीत दिली. उज्जैनकर यांनी सांगितले की, कंपनीने तोटा झाल्याचे कारण सांगून कामगारांना कामावरून कमी केले आहे. परंतु अशी कारवाई करण्यापूर्वी बॅलन्स शीट सादर केलेले नाही. कामगारांना कमी करण्यापूर्वी ले आॅफसाठी असणाºया कायदेशीर बाबींची पूर्तता केलेली नाही. मनसे कामगार संघटनेचे सदस्य असलेल्या कामगारांवरच आकसाने कारवाई केली आहे. इतर संघटनेच्या कोणत्याही कामगारांनातसेच व्यवस्थापकीय कामगारांना कमी केले नाही.न्याय न मिळाल्यास आंदोलनमनसेचे तालुकाध्यक्ष रुपेश म्हाळस्कर म्हणाले, कामगारांना न्याय न मिळाल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल. तहसीलदार देसाई म्हणाले की, कंपनीतील स्थानिक कामगारांना असे वाºयावर सोडता येणार नाही. सहानभूतीपूर्वक विचार करून त्यांना पुन्हा कामावर घ्यावे. कायदा सुवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास कंपनीवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा तहसीलदार देसाई यांनी दिला. येत्या १३ जानेवारील पुन्हा बैठक घेण्याची सूचना त्यांनी दिली़ तत्पूर्वी वरिष्ठांशी चर्चा करून सकारात्मक निर्णय घेण्याचे आवाहन त्यांनी केले. तहसील कार्यालयाच्या प्रांगणात मोठ्या संख्येने कामगार उपस्थित होते.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड