शहरं
Join us  
Trending Stories
1
मणिपूरमध्ये पुन्हा हिंसा; चुराचांदपूरमध्ये कुकी नेत्यांची घरं जाळली! दोनच दिवसांपूर्वी मोदींनी केला होता दौरा
2
“भारत-पाकिस्तान सामना फिक्स होता; PCB ला 1000 कोटी मिळाले’’, संजय राऊतांचा गंभीर आरोप
3
चीनचं शटर होऊ लागलंय बंद! सरकारनं वाजवली धोक्याची घंटा; नक्की काय आहे प्रकरण, जाणून घ्या
4
भारताविरुद्ध पाकिस्तानला दिली साथ, आता 'या' देशावर भीतीचं सावट; इस्रायली हल्ल्याची सतावतेय भीती
5
धुळ्यात विधानसभेला 45 हजार बोगस मतदारांचे मतदान; अनिल गोटेंकडे यादीच, गंभीर आरोप
6
निष्पाप सान्वीचा जीव गेला; शाळांचा सुरक्षेपेक्षा 'प्रॉफिट'वर डोळा, कंत्राटदाराच्या कामामुळे दोघे जिवाला मुकले
7
कतरिना कैफ प्रेग्नंट, 'या' महिन्यात देणार बाळाला जन्म; विकी कौशल लवकरच होणार बाबा
8
राहुची महादशा, अशुभच घडतेय? ‘हे’ ८ उपाय करून तर पाहा, शुभ-लाभ; दोषमुक्ती, भरपूर भरभराट!
9
शेअर आहे की तुफान! ५ वर्षात तब्बल ६६,००० टक्के नफा! आज पुन्हा ९ टक्के वाढ; किंमत २५ पेक्षाही कमी
10
डिझेलवाले सुटले...? नाही, पेट्रोलसारखेच इथेनॉल मिसळायचे होते, पण...; नितीन गडकरींच्या मनात चाललेय तरी काय...
11
"तू जाताच पूजा यायची अन् पूर्ण दिवस आम्ही..."; नंदिनी हत्याकांडात ऑडिओ क्लीपनं नवा ट्विस्ट
12
चांगली भूमिका, चांगल्या सिनेमाचं आमिष, अभिनेत्रीवर बलात्कार, प्रसिद्ध अभिनेता अटकेत
13
ITR Filing मध्ये Gen Z नं बनवला नवा विक्रम; शेअर बाजारातील गुंतवणूक बनली कमाईचं नवं साधन
14
iPhone 17 Series : आयफोन प्रेमींना मोठा झटका! नव्या 'आयफोन १७'साठी आता आणखी वाट बघावी लागणार; कारण काय?
15
नागपूर महामार्गावर 'टोल'मध्ये 'झोल'! एकाच क्रॉसिंगचे दोनदा कापले जाताहेत पैसे, तक्रारींचीही दखल नाही
16
RCB ला विजयी करणाऱ्या रजत पाटीदारने जिंकली दुलीप ट्रॉफी! सेंट्रल झोनचा साऊथवर धडाकेबाज विजय
17
Asia Cup 2025: आशिया कपमध्ये सर्वाधिक सामने जिंकणारे संघ, भारत कितव्या क्रमांकावर?
18
"माझ्या पतीचा श्वास सुरू होता, मी ओरडते होते, प्लीज आम्हाला..."; पत्नीने फोडला टाहो
19
Gen-Z आंदोलनामुळे नेपाळ आर्थिक संकटात; अब्जो रुपयांचे नुकसान, १० हजार लोकांच्या नोकऱ्या गेल्या
20
वरुण धवन इज बॅक! 'सनी संस्कारी की तुलसी कुमारी'चा ट्रेलर, प्रेमात ट्विस्ट अन् कॉमेडीचा तडका

एक कोटींच्या कर्जाने उद्योजकांना संजीवनी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2018 23:38 IST

उद्योगनगरीत व्यावसायिकांकडून स्वागत : शासनाने तातडीने अंमलबजावणी करावी

पिंपरी : सूक्ष्म, लघू, मध्यम उद्योगांना एक कोटीपर्यंतचे कर्ज ५९ मिनिटांत मंजूर करण्याच्या शासनाने घेतलेल्या निर्णयामुळे उद्योगांना आर्थिक आधार मिळणार आहे. नवीन उद्योगांना संजीवनी मिळणार असल्याने भारताच्या अर्थव्यवस्थेचा वेग वाढण्याची आशा आहे. मात्र, ही योजना राबविताना ती प्रत्येक उद्योजकापर्यंत पोहोचण्यासाठी योजनेचा प्रचार आणि प्रसारही व्हायला हवा. योजनेची तातडीने अंमलबजावणी करताना ५९ मिनिटांत केवळ संमतीपत्र देण्याऐवजी कर्जाची रक्कमच उद्योजकाच्या खात्यात जमा करावी, अशा प्रतिक्रिया उद्योजकांनी व्यक्त केल्या. केंद्र शासनाने उद्योगांना आर्थिक आधार देण्यासाठी सर्व कागदपत्रांची पूर्तता करणाऱ्या सूक्ष्म, लघू, मध्यम उद्योगांना एक कोटीपर्यंतचे कर्ज ५९ मिनिटांत मंजूर करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत औद्योगिकनगरीतील उद्योजकांनी ‘लोकमत’कडे प्रतिक्रिया व्यक्त केल्या.शासनाची योजना चांगली असली तरी तिचा प्रचार आणि प्रसार व्हायला हवा. या योजनेबाबत अद्यापही अनेक उद्योजकांना माहिती नाही. याबाबत पिंपरी-चिंचवड औद्योगिक क्षेत्रात शासन व विविध संघटनांनी कार्यशाळांचे आयोजन करायला हवे. त्यामध्ये योजनेची सविस्तर माहिती दिल्यास ही योजना उद्योजकांपर्यंत पोहोचेल व योजनेचा लाभ घेता येईल.- संदीप बेलसरे, अध्यक्ष,पिंपरी-चिंचवड लघुउद्योग संघटनाया निर्णयामुळे उद्योजकांना मोठा आर्थिक आधार मिळेल. कागदपत्रे पूर्ण असल्यास तातडीने कर्ज मिळणार असल्याने उद्योजक मोठे पाऊल टाकू शकतो, तसेचउद्योगाला उभारी मिळू शकते. हा निर्णय अनेक उद्योजकांसाठी फायदेशीर ठरणारा आहे. केंद्र शासनाने सुरू केलेल्या या योजनेची माहिती घेऊन अधिकाधिक उद्योजकांनी याचा लाभ घ्यायला हवा.- अभय भोर, उद्योजकसूक्ष्म, लघू, मध्यम उद्योगांना एक कोटीपर्यंतचे कर्ज ५९ मिनिटांत मंजूर होणार असल्याचे बोलले जात असले तरी सुरुवातीला केवळ कर्ज मंजुरीचे प्राथमिक संमतीपत्र दिले जाणार आहे. यासाठी ५९ मिनिटांत केवळ संमतीपत्र देण्याऐवजी कागदपत्रांची पूर्तता करून कर्जाची रक्कमच उद्योजकाच्या खात्यात जमा केल्यास ही योजना खºया अर्थाने अधिक फायदेशीर होईल.- जयंत कड, उद्योजकशासनाने सुरू केलेली ही योजना उद्योगांना मंदीतून बाहेर पडण्यासाठी फायदेशीर ठरणार आहे. उद्योगांचा दर्जा पाहून एक कोटींपर्यंतचे कर्ज उद्योगांना दिले जाणार असून, यातून उद्योगांना संजीवनी मिळणार आहे. योजना योग्य पद्धतीने राबविण्याबाबत शासनाने बँकांनाही सूचना दिल्या आहेत. यातून भारतीय अर्थव्यवस्थेचा वेग वाढेल.- गोविंद पानसरे, अध्यक्ष- पुणे जिल्हा औद्योगिक विकास मंडळ 

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडbusinessव्यवसाय