शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

एक कोटींच्या कर्जाने उद्योजकांना संजीवनी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2018 23:38 IST

उद्योगनगरीत व्यावसायिकांकडून स्वागत : शासनाने तातडीने अंमलबजावणी करावी

पिंपरी : सूक्ष्म, लघू, मध्यम उद्योगांना एक कोटीपर्यंतचे कर्ज ५९ मिनिटांत मंजूर करण्याच्या शासनाने घेतलेल्या निर्णयामुळे उद्योगांना आर्थिक आधार मिळणार आहे. नवीन उद्योगांना संजीवनी मिळणार असल्याने भारताच्या अर्थव्यवस्थेचा वेग वाढण्याची आशा आहे. मात्र, ही योजना राबविताना ती प्रत्येक उद्योजकापर्यंत पोहोचण्यासाठी योजनेचा प्रचार आणि प्रसारही व्हायला हवा. योजनेची तातडीने अंमलबजावणी करताना ५९ मिनिटांत केवळ संमतीपत्र देण्याऐवजी कर्जाची रक्कमच उद्योजकाच्या खात्यात जमा करावी, अशा प्रतिक्रिया उद्योजकांनी व्यक्त केल्या. केंद्र शासनाने उद्योगांना आर्थिक आधार देण्यासाठी सर्व कागदपत्रांची पूर्तता करणाऱ्या सूक्ष्म, लघू, मध्यम उद्योगांना एक कोटीपर्यंतचे कर्ज ५९ मिनिटांत मंजूर करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत औद्योगिकनगरीतील उद्योजकांनी ‘लोकमत’कडे प्रतिक्रिया व्यक्त केल्या.शासनाची योजना चांगली असली तरी तिचा प्रचार आणि प्रसार व्हायला हवा. या योजनेबाबत अद्यापही अनेक उद्योजकांना माहिती नाही. याबाबत पिंपरी-चिंचवड औद्योगिक क्षेत्रात शासन व विविध संघटनांनी कार्यशाळांचे आयोजन करायला हवे. त्यामध्ये योजनेची सविस्तर माहिती दिल्यास ही योजना उद्योजकांपर्यंत पोहोचेल व योजनेचा लाभ घेता येईल.- संदीप बेलसरे, अध्यक्ष,पिंपरी-चिंचवड लघुउद्योग संघटनाया निर्णयामुळे उद्योजकांना मोठा आर्थिक आधार मिळेल. कागदपत्रे पूर्ण असल्यास तातडीने कर्ज मिळणार असल्याने उद्योजक मोठे पाऊल टाकू शकतो, तसेचउद्योगाला उभारी मिळू शकते. हा निर्णय अनेक उद्योजकांसाठी फायदेशीर ठरणारा आहे. केंद्र शासनाने सुरू केलेल्या या योजनेची माहिती घेऊन अधिकाधिक उद्योजकांनी याचा लाभ घ्यायला हवा.- अभय भोर, उद्योजकसूक्ष्म, लघू, मध्यम उद्योगांना एक कोटीपर्यंतचे कर्ज ५९ मिनिटांत मंजूर होणार असल्याचे बोलले जात असले तरी सुरुवातीला केवळ कर्ज मंजुरीचे प्राथमिक संमतीपत्र दिले जाणार आहे. यासाठी ५९ मिनिटांत केवळ संमतीपत्र देण्याऐवजी कागदपत्रांची पूर्तता करून कर्जाची रक्कमच उद्योजकाच्या खात्यात जमा केल्यास ही योजना खºया अर्थाने अधिक फायदेशीर होईल.- जयंत कड, उद्योजकशासनाने सुरू केलेली ही योजना उद्योगांना मंदीतून बाहेर पडण्यासाठी फायदेशीर ठरणार आहे. उद्योगांचा दर्जा पाहून एक कोटींपर्यंतचे कर्ज उद्योगांना दिले जाणार असून, यातून उद्योगांना संजीवनी मिळणार आहे. योजना योग्य पद्धतीने राबविण्याबाबत शासनाने बँकांनाही सूचना दिल्या आहेत. यातून भारतीय अर्थव्यवस्थेचा वेग वाढेल.- गोविंद पानसरे, अध्यक्ष- पुणे जिल्हा औद्योगिक विकास मंडळ 

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडbusinessव्यवसाय