शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

कोशिंबीर मऊ पडून तिला खूप पाणी सुटतं? ४ टिप्स- कोशिंबीर राहील क्रंची, कुरकुरीत- चवही खुलेल..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2025 09:25 IST

1 / 8
आपल्या रोजच्या जेवणात तोंडी लावायला कोशिंबीर असली की जेवणाचा बेत कसा मस्त रंगत जातो.
2 / 8
कोशिंबीरीचा आंबट गोडवा जेवणाचीही चव खुलवतो. त्यामुळे एरवी नाही जमलं तरी जेव्हा थोडा निवांत वेळ असतो, घरी पाहुणे येणार असतात, तेव्हा हमखास कोशिंबीर
3 / 8
आता तुम्ही काकडी, टोमॅटो, पत्ताकोबी किंवा बीटरुट अशी कोणतीही कोशिंबीर करा.. ती करताना जर काही चुका केल्या तर तिला खूपच जास्त पाणी सुटतं. यामुळे सलाड मऊ पडतं आणि शिवाय कोशिंबीरीची चवसुद्धा बिघडते.
4 / 8
त्यामुळेच या काही टिप्स लक्षात ठेवा. यामुळे कोशिंबीर नेहमीच क्रिस्पी आणि कुरकुरीत राहण्यास मदत होईल. शिवाय तिला पाणीही सुटणार नाही.
5 / 8
सगळ्यात पहिली गोेष्ट म्हणजे सगळा स्वयंपाक झाल्यानंतर सगळ्यात शेवटी कोशिंबीरीसाठी सलाड चिरायला सुरुवात करा. जेवढ्या लवकर तुम्ही सलाड चिरून ठेवणार तेवढ्या लवकर ती मऊ पडणार.
6 / 8
दुसरी गोष्ट म्हणजे जेवणाला जर वेळ असेल तर कोशिंबीरीसाठी चिरलेलं सलाड झाकून फ्रिजमध्ये ठेवून द्या. यामुळे ते मऊ पडणार नाही.
7 / 8
तिसरी गोष्ट अशी की अगदी जेवायला बसण्याच्या आधी कोशिंबीरीमध्ये मीठ आणि साखर घाला. या दोन्ही गोष्टी आधी घातल्याने कोशिंबीरीला खूप पाणी सुटतं आणि ते पांचट होते.
8 / 8
कोशिंबीरीमध्ये दही घालणार असाल तर ते सुद्धा घट्ट आणि नुकतंच फ्रिजमधून काढलेलं थंडगार असावं. पातळ, आंबट दह्यामुळे कोशिंबीरीतील सलाडचा कुरकुरीतपणा कमी होऊन ते मऊ पडतं.
टॅग्स :foodअन्नRecipeपाककृतीCooking Tipsकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.