ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
नवी मुंबईत दहीहंडीचा उत्साह, साई तेजस प्रतिष्ठाननंही रचले थरावर थर
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2019 23:21 IST
1 / 6नवी मुंबईतही दहीहंडीचा मोठा उत्साह पाहायला मिळतोय. नवी मुंबईसह ठाण्यात दहीहंडीचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. मोठ्या उत्साहात गोविंदा पथकांनी थरावर थर रचले.(सर्व छायाचित्र- भालचंद्र जुमलेदार) 2 / 6 राज्यातील पूर परिस्थितीमुळे राजकीय नेत्यांनी मोठ्या दहीहंड्या रद्द केल्या. तरी गोविंदा पथकांचा उत्साह मात्र कायम असल्याचं पाहायला मिळालं. 3 / 6नवी मुंबईतल्या साई तेजस प्रतिष्ठाननंही दहीहंडीसाठी एकावर एक थर लावले होते. 4 / 6 शेकडो गोविंदांनी गोविंदा रे गोपाळा, तुझ्या घरात नाही पाणी घागर उताणी रे गोपाळा यांसारख्या गाण्यांवर चांगलाच ताल धरला होता. 5 / 6अनेक ठिकाणच्या दहीहंड्या रद्द करून दहीहंडीची रक्कम मंडळांनी पूरग्रस्तांना दिली आहे. 6 / 6एकंदरीतच दहीहंडीचा उत्साह दरवर्षीप्रमाणे पाहायला मिळालेला नाही.