शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

उलटीचं कारण देत गाडीतून उतरली नववधू अन् केलं असं काही...

By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2020 8:07 PM

1 / 12
राजस्थानच्या सवाई माधोपूर येथे लग्नाचा आनंद शोकसागरात बुडाला आहे. लग्न झाल्यानंतर सासरी निघालेल्या वधूनं चंबळ नदीच्या पुलावर गाडी थांबवली आणि नदीत उडी मारली.
2 / 12
या घटनेनं वराकडच्या मंडळींनी आरडाओरडा केला. कोणालाही काहीही समजण्याच्या आतच तिनं पुलावरून नदीत उडी घेतली.
3 / 12
त्याचदरम्यान गाडी चंबळ नदीच्या पुलावर आली, नववधून गाडीतून खाली उतरली आणि लोकांना काही समजण्याच्या आतच तिने पुलाच्या रेलिंगमधून नदीत उडी मारली. हे पाहून वराला व त्याच्या साथीदारांना धक्काच बसला.
4 / 12
आरडाओरडा ऐकल्यानंतर स्थानिक लोक तेथे जमले होते. पोलीसही घटनास्थळी पोहोचले असून, स्थानिकांच्या मदतीनं वधूचा शोध घेतला जात आहे.
5 / 12
बोटीतून काही स्थानिकही वधूचा नदीच शोध घेत आहेत. नातेवाईकांच्या म्हणण्यानुसार, मुलीचे एक दिवस आधी लग्न झाले होते आणि लग्नाच्या काळात ती खूप आनंदी होती.
6 / 12
लग्नात नववधू आपल्या पतीबरोबर आनंदच्या भरात नाचलीसुद्धा होती. ज्या पुलावरून महिलेने उडी मारली तो पूल राजस्थान आणि मध्य प्रदेशच्या सीमेवरील चंबळ नदीवर बांधलेला पूल आहे.
7 / 12
त्यामुळे त्याला चंबळ पूल असेही म्हणतात. या घटनेची माहिती मिळताच राजस्थानच्या खंडार पोलीस ठाण्याचे आणि मध्य प्रदेशच्या समरसा चौकी पोलिसांचे पोलीसही घटनास्थळी पोहोचले आहेत आणि तपास सुरू केला आहे.
8 / 12
विशेष म्हणजे आदल्या दिवशी आनंदात असणाऱ्या मुलीनं असं का केलं असावं असा प्रश्नही आता पोलिसांना सतावतो आहे.
9 / 12
मुलीकडची परिस्थिती अत्यंत गरीब आहे. लॉकडाऊनच्या काळातही अगदी साधेपणानं हे लग्न करण्यात आलं होतं.
10 / 12
लग्नात नववधू वराबरोबर आनंदातही असल्याचंही तिच्या कुटुंबीयांचं म्हणणं आहे.
11 / 12
पण मग त्या नववधूनं अचानक एवढं टोकाचं पाऊल का उचललं असावं, याचाच पोलीस आता तपास करत आहेत.
12 / 12
पण मग त्या नववधूनं अचानक एवढं टोकाचं पाऊल का उचललं असावं, याचाच पोलीस आता तपास करत आहेत.