1 / 9इराण-इस्रायल तणावावर भारताचं मौन हा विचारपूर्वक केलेल्या राजनैतिक रणनीतीचा भाग आहे. कोणत्याही बाजूचे संबंध धोक्यात न आणता भारत आपल्या महत्त्वाच्या आर्थिक आणि सामरिक हितसंबंधांचं रक्षण करू इच्छितो. हा गुंतागुंतीचा समतोल राखण्याचा हा सर्वात सुरक्षित मार्ग आहे. भारताकडून थोडीशी चूक झाल्यास ६.६८ अब्ज डॉलर (सुमारे ५७,४८८ कोटी रुपये) धोक्यात येऊ शकतात. 2 / 9इराणसोबत भारताचा व्यापार १.६८ अब्ज डॉलर इतका आहे. इस्रायलसोबत तो पाच अब्ज डॉलर्स आहे. भारतासाठी ऊर्जा सुरक्षा अत्यंत महत्त्वाची आहे. चाबहार बंदरात भारतानं गुंतवणूक केली आहे. भारत आणि इस्रायल यांच्यात संरक्षण तंत्रज्ञान सहकार्य वाढत आहे. भारत या परिस्थितीत अडकलाय. इराण आणि इस्रायल या दोन्ही देशांशी असलेले संबंध त्याला सांभाळावे लागणारेत.3 / 9इराणसोबत भारताचा व्यापार १.६८ अब्ज डॉलर इतका आहे. इस्रायलसोबत तो पाच अब्ज डॉलर्स आहे. भारतासाठी ऊर्जा सुरक्षा अत्यंत महत्त्वाची आहे. चाबहार बंदरात भारतानं गुंतवणूक केली आहे. भारत आणि इस्रायल यांच्यात संरक्षण तंत्रज्ञान सहकार्य वाढत आहे. भारत या परिस्थितीत अडकलाय. इराण आणि इस्रायल या दोन्ही देशांशी असलेले संबंध त्याला सांभाळावे लागणारेत.4 / 9इराण-इस्रायल तणावाच्या पार्श्वभूमीवर भारत खबरदारी घेत आहे. इराणबरोबरचा व्यापार १.६८ अब्ज डॉलरचा आहे. इस्रायलसोबत भारताचा व्यापार ५ अब्ज डॉलरचा आहे. त्यामुळे भारताला आपली ऊर्जा सुरक्षा, चाबहार बंदरातील गुंतवणूक आणि वाढते संरक्षण-तांत्रिक संबंध यांचं रक्षण करावं लागणारे. भारताचं राजनैतिक मौन हा एका विशेष रणनीतीचा भाग आहे. यात तणाव कमी करणं, पर्याय वाढविणं आणि आपल्या हितांचे संरक्षण करणंसमाविष्ट आहे.5 / 9इराण हा भारतातून बासमती तांदळाचा मोठा आयातदार आहे. त्याचबरोबर अन्य काही उत्पादनांचाही दोन्ही देशांमध्ये व्यापार केला जातो. मध्य आशियातील प्रवेशासाठी महत्त्वाच्या असलेल्या चाबहार बंदरातही भारताची मोठी गुंतवणूक आहे. या व्यापारावर कोणताही नकारात्मक परिणाम भारताच्या निर्यातदार आणि अर्थव्यवस्थेसाठी घातक ठरेल.6 / 9संरक्षण-तंत्रज्ञान आणि कृषी क्षेत्रात इस्रायलसोबत भारताचे मजबूत संबंध आहेत. इस्रायल भारताला अत्याधुनिक संरक्षण उपकरणं आणि तंत्रज्ञान पुरवतो, जे भारताच्या सुरक्षेसाठी महत्त्वाचे आहे. या संदर्भात कोणतीही तडजोड झाल्यास भारताच्या सामरिक क्षमतेवर परिणाम होऊ शकतो. एकूण ६.६८ अब्ज डॉलर्सच्या व्यापाराचा आकडा दर्शवितो की भारताचे दोन्ही देशांशी आर्थिकदृष्ट्या मोठे संबंध आहेत आणि उघडपणे एका बाजूवर टीका किंवा समर्थन केल्यास दुसऱ्या बाजूशी संबंध बिघडू शकतात. याचा थेट परिणाम भारताच्या अर्थव्यवस्थेवर होणार आहे.7 / 9स्ट्रेट ऑफ हॉरमुझ हा जागतिक तेल व्यापारासाठी महत्त्वाचा केंद्रबिंदू आहे. भारत आपल्या कच्च्या तेलाच्या गरजेपैकी मोठा हिस्सा मध्यपूर्वेतून आयात करतो. हा मार्ग विस्कळीत झाल्यानं भारताच्या ऊर्जा सुरक्षेला थेट धोका निर्माण होऊ शकतो. तेलाच्या किमतीत झालेली वाढ आणि पुरवठ्यातील व्यत्यय यामुळे भारताच्या अर्थव्यवस्थेवर गंभीर परिणाम होऊ शकतात. भारत आपल्या ऊर्जा पुरवठ्यात वैविध्य आणण्याचा प्रयत्न करत आहे. असं असलं तरी मध्यपूर्वेवरील भारताचं अवलंबित्व अजूनही खूप जास्त आहे.8 / 9चाबहार बंदर सामरिकदृष्ट्या भारतासाठी महत्त्वाचं आहे. पाकिस्तानला डावलून अफगाणिस्तान आणि मध्य आशियाई देशांना व्यापार आणि कनेक्टिव्हिटी पुरवतं. इराण-इस्रायल संघर्ष वाढल्यास चाबहार प्रकल्पाचं भवितव्य अनिश्चित होऊ शकतं. याचा परिणाम भारताच्या प्रादेशिक कनेक्टिव्हिटी योजनांवर होणार आहे.9 / 9इस्रायल भारताच्या लष्करी हार्डवेअर, गुप्तचर आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानात महत्त्वाचा भागीदार आहे. हे संबंध भारताच्या राष्ट्रीय सुरक्षेसाठी महत्त्वाचे आहेत. कोणत्याही एका बाजूला झुकल्यानं हे महत्त्वाचे संबंध बिघडू शकतात. आखाती देश, विशेषत: इराण हा भारतीय चहाचा प्रमुख खरेदीदार आहे. सागरी मार्ग विस्कळीत होऊन व्यापार विस्कळीत झाल्यास भारतीय चहा निर्यातीवर या संघर्षाचा थेट नकारात्मक परिणाम होऊन असून हजारो शेतकरी आणि निर्यातदारांना याचा फटका बसू शकतो. भारत उघडपणे कोणत्याही एका बाजूचं समर्थन किंवा विरोध करत नाही, तर परिस्थिती शांत करणं, आपल्या हितसंबंधांचं रक्षण करणं आणि विविध पर्यायांचा शोध घेण्यावर भर देतो.