लग्नाच्या पहिल्याच रात्री अक्षय कुमारला समजली होते पत्नीबाबतचे हे रहस्य, स्वतः केला होता खुलास

By ऑनलाइन लोकमत | Published: December 1, 2020 11:21 AM2020-12-01T11:21:41+5:302020-12-01T11:27:40+5:30

सेलिब्रिटी मंडळी नेहमीच या ना त्या कारणामुळे चर्चेत असतात. मग ते स्वतःविषयीचं एखादं कारण असो किंवा आपल्या जवळच्या व्यक्तीबाबतची गोष्ट. ते नेहमीच प्रसिद्धीच्या झोतात असतात. अभिनेता अक्षय कुमार आणि त्याचे पत्नी ट्विंकल खन्ना दोघेही पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.

अभिनेता अक्षय कुमारला बॉलीवुडचा खिलाडी नंबर वन असं म्हटलं जातं. त्याचा अभिनय, कॉमेडीचं टायमिंग यासह त्यांच्या स्टंट्सचे सारेच फॅन आहेत. एक हरहुन्नरी अभिनेता असण्यासोबतच अक्की एक आदर्श पती आणि आदर्श पिताही आहे.

अक्षय कुमार आणि ट्विंकल खन्नाबद्दलचा एक किस्सा सध्या सोशल मीडियावर तुफान चर्चेत आहे. कपिल शर्मा शो दरम्यान अर्जना पूरन सिंहने अक्षयला काही भन्नाट प्रश्न विचारले. त्यामध्ये काही असेही प्रश्न होते ज्याचे उत्तर अक्षय उघडपणे देण्यात कंम्फर्टेबल नव्हता.

पण आता उत्तर तर द्यायचे होते. तेव्हा दिलेल्या उत्तरावर सा-यांच्या भुवया उंचावल्या.जेव्हा तुमच्या दोघांमध्ये भांडण होतात तेव्हा तर कोण जास्त आवाज चढवून बोलतो आणि लवकर शांत कोण होतो. उत्तर देत अक्षय म्हणाला की नेहमीच ट्विंकल जिंकते.

इतकेच काय तर लग्नाच्या पहिल्याच रात्री त्यांचे दोघांचे बिनसले आणि भांडणापर्यंत पोहचले तेव्हाही ट्विंकलच्या पुढे मी बोलु शकणार नाही तेव्हाच मला समजले होते. जे आजपर्यंत माझ्या लक्षात आहे. तू म्हणशील तसं हा फॉर्मुला लग्नाच्या इतक्यावर्षांनंतरही मी फॉलो करत आहे.

अक्षयची प्रेमकहाणीही खूप रंजक आहे. ट्विंकल आणि अक्षय दोघांचं हे नातं निर्माण होण्याआधी त्याला अक्षय कुमारची सासू आणि प्रसिद्ध अभिनेत्री डिंपल कपाडिया यांनी विरोध केला होता. या विरोधाचं कारण ऐकून तुम्हालाही धक्का बसल्याशिवाय राहणार नाही. या कारणाचा खुलासा खुद्द अक्षयची पत्नी ट्विंकल खन्ना हिने केला होता.

अक्षय कुमार आणि ट्विंकलचे एकमेंकांवर जीवापाड प्रेम होतं. दोघंही लग्नाच्या तयारीत होते. ही बाब ट्विंकलने आपली आई डिंपलला सांगितली. मात्र डिंपलचा या लग्नाला सुरुवातीला विरोध होता. अक्षय कुमार गे अर्थात समलैंगिक असल्याचा डिंपलला संशय होता. ट्विंकलने आपल्या आईला म्हणजेच डिंपलला बरंच समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र डिंपल ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हती.

ही सगळी बाब ट्विंकलच्या वडिलांना म्हणजेच सुपरस्टार राजेश खन्ना यांनी समजली. या सगळ्या तिढ्यात त्यांनी मधस्थी करण्याचा प्रयत्न केला. यावर तोडगा म्हणून राजेश खन्ना यांनी अक्षय आणि ट्विंकल यांना लग्नाआधी वर्षभर एकत्र राहण्याचा सल्ला दिला होता. यानंतर अक्षय आणि ट्विंकल वर्षभर एकत्र राहिले.

त्यानंतर डिंपलला खात्री पटली की अक्षय कुमार गे नाही आणि लेकीचं लग्न त्यांनी खिलाडी कुमारशी मोठ्या आनंदात लावून दिलं. दरम्यान प्रसिद्ध दिग्दर्शक-निर्माता करण जोहर आणि ट्विंकल एकत्र कॉलेजमध्ये होते. त्यामुळे करणचं ट्विंकलवर प्रेम होतं. मात्र अक्षयच्या एंट्रीमुळे करणचंही हार्टब्रेक झालं.

. प्रत्येक कामात एव्हरेडी असणारा सळसळता उत्साह, जोष, जल्लोष आणि मेहनत हेच खिलाडी अक्षयच्या यशाचे खरं कारण आहे. त्यामुळेच आता भारतीय चित्रपटसृष्टीतील सगळ्यात महागडा अभिनेत्याच्या यादीत अक्षय कुमारचे नाव सामील झाले आहे.

शिवाय मोजक्या करदात्या सेलिब्रिटींमध्येही तो आघाडीवर असतो. आपल्या कामावरील प्रेम,जिद्द आणि मेहनतीमुळे अक्षयने नवी उंची गाठली असून तो रसिकांच्या गळ्यातील ताईत बनला आहे.