शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंना 'सर्वोच्च' दिलासा, सुप्रीम कोर्टाकडून शिक्षेला स्थगिती; आमदारकीही जाणार नाही
2
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
3
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
4
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
5
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
6
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
7
Budh Gochar 2025: २०२५ ला निरोप देताना 'या' ७ राशींचे नशीब चमकणार, आयुष्यात येणार सुवर्णकाळ
8
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
9
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
10
KVP Scheme: पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
11
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
12
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
13
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
14
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
15
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
16
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
17
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
18
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
19
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
20
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस भरतीच्या नव्या निर्णयाचे तरुणांकडून स्वागत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2021 04:13 IST

परभणी : राज्यातील एसईबीसी आरक्षण रद्द झाल्याने मराठा समाजातील तरुणांना खुल्या प्रवर्गात टाकण्याचा गृहविभागाने काढलेला आदेश रद्द करण्याचा निर्णय ...

परभणी : राज्यातील एसईबीसी आरक्षण रद्द झाल्याने मराठा समाजातील तरुणांना खुल्या प्रवर्गात टाकण्याचा गृहविभागाने काढलेला आदेश रद्द करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. या निर्णयाचे अनेकांनी स्वागत केले आहे.

राज्यात जवळपास १२ हजार पदांसाठी पोलीस भरतीप्रक्रिया राबविण्यात येणार आहे. त्यात पहिल्या टप्प्यात ५ हजार २९५ पदांसाठी भरती होणार आहे. गृहविभागाने मंगळवारी एक आदेश काढला. त्यात एसईबीसी प्रवर्गातून अर्ज केलेल्या उमेदवारांना खुल्या प्रवर्गाचे शुल्क आकारून त्यांना खुल्या प्रवर्गात टाकण्याचा आदेश काढला होता. ७ जानेवारी रोजी हा आदेश रद्द करण्याचा निर्णय गृहमंत्री अनिल देशमुख यांनी जाहीर केला. या निर्णयाचे परभणी जिल्ह्यातील तरुणांनी स्वागत केले आहे. पोलीस भरतीची अनेक वर्षांपासून तयारी करीत असताना अचानक आदेशात बदल केल्याबद्दल तरुणांमधून संताप व्यक्त करण्यात येत होता.

जिल्ह्यात १ हजार व्यक्तींमध्ये १ पोलीस

जिल्ह्यातील पोलीस दलात लोकसंख्येच्या तुलनेत अल्प मनुष्यबळ आहे. जिल्ह्याची सध्याची लोकसंख्या जवळपास २० लाख असून पोलीस विभागात जवळपास २ हजार पोलीस कर्मचारी कार्यरत आहेत. त्यामुळे १ हजार लोकसंख्येमागे १ पोलीस कर्मचारी येतो. कमी मनुष्यबळामुळे पोलीस कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण येत आहे.

चार वर्षांपासून पोलीस भरतीची तयारी करीत आहे. दररोज सकाळी आणि सायंकाळी अश्वमेध मैदानावर तयारी करीत असून पोलीस भरतीची प्रक्रियाच सुरु होत नसल्याने अनेक अडचणी निर्माण झाल्या आहेत. त्यात आर्थिक अडचणींचाही सामना करावा लागत आहे. त्यामुळे ही प्रक्रिया त्वरित राबवावी.

- बालाजी फुलपगार, परभणी

राज्य शासनाने पोलीस भरतीत एसईबीसी प्रवर्गासाठी आरक्षण न ठेवण्याचा घेतलेला निर्णय चुकीचाच होता. आता त्यात बदल करण्यात आल्याने मराठा समाजातील तरुणांना खऱ्या अर्थाने न्याय मिळाला आहे. गेल्या दोन- तीन वर्षांपासून पोलीस भरतीची तयारी करणारे अनेक तरुण आहेत. केवळ संधी मिळत नसल्याने ते सेवेत येऊ शकले नाहीत.

- विष्णू तिथे, सेलू

पोलीस भरतीच्या तयारीसाठी शारीरिक तंदुरुस्ती महत्त्वपूर्ण असते. मात्र, पोलीस भरती वेळोवेळी रद्द होत आहे. दुसरीकडे वय वाढू लागले असून ज्या क्षमतेने पूर्वी तयारी करू लागलो. ती कमी होत आहे. त्यामुळे यावर्षी पोलीस भरती राबवावी, अशी अपेक्षा आहे.

-गोविंद जाधव, परभणी