शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने प्रवाशांना उडवले, तिघांची प्रकृती गंभीर; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
2
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
3
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
4
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
5
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
6
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
7
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
8
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
9
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
10
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
11
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
12
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
13
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
14
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
15
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
16
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
17
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!
18
'वन नाइट स्टॅण्ड'मधून पैसे कमावतेय ही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री, डिटेक्टिव्हचा खुलासा, म्हणाली-"तासानुसार..."
19
Video: ऑन कॅमेरा उपमुख्यमंत्री अन् आमदारात खडाजंगी; एकमेकांवर वाहिली शिव्यांची लाखोळी...
20
इकडे विरोधक टीका करतायत; तिकडे आफ्रिकेचा निवडणूक आयोग पारदर्शक प्रणाली पाहण्यासाठी खासदारांना पाठविणार

पोलीस भरतीच्या नव्या निर्णयाचे तरुणांकडून स्वागत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2021 04:13 IST

परभणी : राज्यातील एसईबीसी आरक्षण रद्द झाल्याने मराठा समाजातील तरुणांना खुल्या प्रवर्गात टाकण्याचा गृहविभागाने काढलेला आदेश रद्द करण्याचा निर्णय ...

परभणी : राज्यातील एसईबीसी आरक्षण रद्द झाल्याने मराठा समाजातील तरुणांना खुल्या प्रवर्गात टाकण्याचा गृहविभागाने काढलेला आदेश रद्द करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. या निर्णयाचे अनेकांनी स्वागत केले आहे.

राज्यात जवळपास १२ हजार पदांसाठी पोलीस भरतीप्रक्रिया राबविण्यात येणार आहे. त्यात पहिल्या टप्प्यात ५ हजार २९५ पदांसाठी भरती होणार आहे. गृहविभागाने मंगळवारी एक आदेश काढला. त्यात एसईबीसी प्रवर्गातून अर्ज केलेल्या उमेदवारांना खुल्या प्रवर्गाचे शुल्क आकारून त्यांना खुल्या प्रवर्गात टाकण्याचा आदेश काढला होता. ७ जानेवारी रोजी हा आदेश रद्द करण्याचा निर्णय गृहमंत्री अनिल देशमुख यांनी जाहीर केला. या निर्णयाचे परभणी जिल्ह्यातील तरुणांनी स्वागत केले आहे. पोलीस भरतीची अनेक वर्षांपासून तयारी करीत असताना अचानक आदेशात बदल केल्याबद्दल तरुणांमधून संताप व्यक्त करण्यात येत होता.

जिल्ह्यात १ हजार व्यक्तींमध्ये १ पोलीस

जिल्ह्यातील पोलीस दलात लोकसंख्येच्या तुलनेत अल्प मनुष्यबळ आहे. जिल्ह्याची सध्याची लोकसंख्या जवळपास २० लाख असून पोलीस विभागात जवळपास २ हजार पोलीस कर्मचारी कार्यरत आहेत. त्यामुळे १ हजार लोकसंख्येमागे १ पोलीस कर्मचारी येतो. कमी मनुष्यबळामुळे पोलीस कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण येत आहे.

चार वर्षांपासून पोलीस भरतीची तयारी करीत आहे. दररोज सकाळी आणि सायंकाळी अश्वमेध मैदानावर तयारी करीत असून पोलीस भरतीची प्रक्रियाच सुरु होत नसल्याने अनेक अडचणी निर्माण झाल्या आहेत. त्यात आर्थिक अडचणींचाही सामना करावा लागत आहे. त्यामुळे ही प्रक्रिया त्वरित राबवावी.

- बालाजी फुलपगार, परभणी

राज्य शासनाने पोलीस भरतीत एसईबीसी प्रवर्गासाठी आरक्षण न ठेवण्याचा घेतलेला निर्णय चुकीचाच होता. आता त्यात बदल करण्यात आल्याने मराठा समाजातील तरुणांना खऱ्या अर्थाने न्याय मिळाला आहे. गेल्या दोन- तीन वर्षांपासून पोलीस भरतीची तयारी करणारे अनेक तरुण आहेत. केवळ संधी मिळत नसल्याने ते सेवेत येऊ शकले नाहीत.

- विष्णू तिथे, सेलू

पोलीस भरतीच्या तयारीसाठी शारीरिक तंदुरुस्ती महत्त्वपूर्ण असते. मात्र, पोलीस भरती वेळोवेळी रद्द होत आहे. दुसरीकडे वय वाढू लागले असून ज्या क्षमतेने पूर्वी तयारी करू लागलो. ती कमी होत आहे. त्यामुळे यावर्षी पोलीस भरती राबवावी, अशी अपेक्षा आहे.

-गोविंद जाधव, परभणी