शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
3
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
4
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
5
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
6
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
7
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
9
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
10
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
11
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
12
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
13
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
14
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
16
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
17
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
18
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
19
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर

पाथरी तालुक्यातील सिंचन विहिरींच्या ५८ कामांना कार्यारंभ आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2018 19:40 IST

महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेंतर्गत गतवर्षी मंजुरी मिळालेल्या ६४ सिंचन विहिरींपैकी ५८ कामांना कार्यारंभ आदेश देण्यात आले आहेत़ यातील ४९ कामांवर जिओ टॅगींग करून कामे सुरू करण्यात आली आहेत. त्याचबरोबर ९१ सिंचन विहिरीला नव्याने मान्यता देण्यात आली आहे.

ठळक मुद्देगतवर्षी छाननी समितीने ६५ सिंचन विहिरींना मान्यता दिली होती़या कामांना जिल्हास्तरीय समितीकडून मान्यता मिळाल्यानंतर आता पंचायत समितीस्तरावरून कामे सुरू झाली आहेत़ ५८ सिंचन विहिरींच्या कामांना कार्यारंभ आदेश देण्यात आले आहेत़

पाथरी (परभणी) :  महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेंतर्गत गतवर्षी मंजुरी मिळालेल्या ६४ सिंचन विहिरींपैकी ५८ कामांना कार्यारंभ आदेश देण्यात आले आहेत़ यातील ४९ कामांवर जिओ टॅगींग करून कामे सुरू करण्यात आली आहेत. त्याचबरोबर ९१ सिंचन विहिरीला नव्याने मान्यता देण्यात आली आहे.

मनरेगा योजनेंतर्गत पंचायत समितीस्तरावर सिंचन विहिरींची कामे मोठ्या प्रमाणावर होत आहेत़ योजनेच्या अंमलबजावणीसाठीही दोन वर्षापूर्वी राज्य शासनाने छाननी समितीची मंजुरी अनिवार्य केली होती़ छाननी समितीच्या बैठका वेळेत होत नसल्याने दोन वर्षांत कामे सुरू होवू शकली नव्हती़ गतवर्षी छाननी समितीने ६५ सिंचन विहिरींना मान्यता दिली होती़ या कामांना जिल्हास्तरीय समितीकडून मान्यता मिळाल्यानंतर आता पंचायत समितीस्तरावरून कामे सुरू झाली आहेत़ ५८ सिंचन विहिरींच्या कामांना कार्यारंभ आदेश देण्यात आले आहेत़ यातील ४९ कामांचे जिओ टॅगींग करण्यात येऊन कामाला सुरुवात झाली आहे.

योजनेची अंमलबजावणी करताना तांत्रिक मान्यता व कामाचे अंतिमीकरण करण्यासाठी अनेक अडचणी निर्माण होत असल्याने जि़प़च्या मुख्य कार्यकारी अधिकारी प्रताप सवडे यांनी मनरेगाच्या कामासाठी अधिकार्‍यांच्या नियुक्त्या केल्या आहेत़ पाथरी, मानवत, सेलू या तीन तालुक्यांसाठी तांत्रिक मान्यता पूर्णत्वाचे दाखले देण्यासाठी जिंतूर येथील लघुसिंचन उपविभागाचे उपअभियंता बी़व्ही़ मिरासे यांच्या नावाने आदेश काढले आहेत़ त्यामुळे नवीन ९१ कामांना तांत्रिक मान्यता देण्याचा प्रश्न निकाली निघाला आहे़ 

छाननी समितीची १७९ कामांना मान्यतामनरेगा योजनेंतर्गत कार्यरत असणार्‍या उपजिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली छाननी समितीने १७९ कामांना मान्यता दिली आहे़ यात अमृतकुंड शेततळे ०९, निर्मल शौचालय २७, विहिर पुनर्भरण ५२, अहिल्यादेवी सिंचन विहिर ९१ या कामांचा समावेश आहे़ 

२६ प्रस्तावात त्रुटी

पाथरी पंचायत समितीने छाननी समितीकडे सिंचन विहिरींचे प्रस्ताव सादर केल होते़ त्यापैकी १७९ प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली आहे़ तर २६ प्रस्ताव आढळून आले आहेत़ तर दोन प्रस्ताव अपात्र ठरले गेले आहे़ 

कुशल-अकुशलची देयके अडकली

योजनेच्या कामांना तालुकास्तरावर नव्याने सुरुवात झाली असली तरी मागील कामांचे कुशल देयके सहा महिन्यांपासून आॅनलाईन उपलब्ध झाले नाहीत़ आता तर गेल्या १५ दिवसांपासून अकुशल देयके आॅनलाईन उपलब्ध झाले नसल्याने योजनेच्या अंमलबजावणीस अडचणी निर्माण होत आहेत़ 

अंमलबजावणी सुरू झाली आहे़मनरेगा अंतर्गत छाननी समितीने मंजुरी दिलेल्या सर्वच कामांची पंचायत समितीस्तरावरुन अंमलबजावणी सुरू झाली आहे़ वेळेत कामे पूर्ण करण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे.- बी.टी. बायस, गटविकास अधिकारी, पाथरी

कामांना गती आली आहे़ मनरेगा अंतर्गत सिंचन विहिरींच्या कामांना आता चांगली गती आली आहे़ सातत्याने पाठपुरावा केल्याने प्रशासनही कामाला लागले असून, मंजुराना काम व लाभार्थ्यांना लाभ मिळणार आहे़ योजनेच्या प्रभावीपणे अंमलबजावणीसाठी प्रयत्न सुरू आहेत.- शिवकन्या ढगे, सभापती, पंचायत समिती