शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

महिला, बांगड्यांना कमी लेखू नका-रुपालीताई चाकणकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2020 22:25 IST

बांगड्या हे महिलांचे आभूषण आहे़ समाजात स्त्री शिक्षणाचा जागर करणाऱ्या सावित्रीबाई फुले, राजामाता अहिल्यादेवी होळकर यांनी समाज परिवर्तनाची मोठी कामे केली़ महिशासूर दैत्याचा वध करणाºया देवीनेही बांगड्याच घातल्या होत्या़ त्यामुळे बांगड्यांना कमी लेखू नका, असा इशारा राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा रुपालीताई चाकणकर यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : बांगड्या हे महिलांचे आभूषण आहे़ समाजात स्त्री शिक्षणाचा जागर करणाऱ्या सावित्रीबाई फुले, राजामाता अहिल्यादेवी होळकर यांनी समाज परिवर्तनाची मोठी कामे केली़ महिशासूर दैत्याचा वध करणाºया देवीनेही बांगड्याच घातल्या होत्या़ त्यामुळे बांगड्यांना कमी लेखू नका, असा इशारा राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा रुपालीताई चाकणकर यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिला आहे.परभणी शहरातील राष्ट्रवादी भवन येथे रविवारी राष्ट्रवादी महिला संवाद मेळावा पार पडला़ या मेळाव्यात चाकणकर बोलत होत्या़ यावेळी महिला राष्टÑवादी काँग्रेसच्या राष्टÑीय अध्यक्षा फौजिया खान, जि.प. अध्यक्षा निर्मलाताई विटेकर, राष्टÑीय सचिव सोनालीताई देशमुख, रायुकाँचे जिल्हाध्यक्ष रितेश काळे, प्रेक्षाताई भांबळे, शहर जिल्हाध्यक्ष किरण सोनटक्के, राविकाँचे जिल्हाध्यक्ष सुमंत वाघ, सभापती अनिल नखाते, महिला राकाँच्या जिल्हाध्यक्षा भावनाताई नखाते, शहराध्यक्षा नंदाताई राठोड, रेखा आवटे, कमल राठोड, रेखाताई फड, परवीन कौसर, शेख मुमताज आदींची उपस्थिती होती.माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही दिवसांपूर्वी आम्ही शिवसेनेनेप्रमाणे हातात बांगड्या घातल्या नाहीत, असे वक्तव्य केले होते़ या वक्तव्यावरून रुपालीताई चाकणकर यांनी फडणवीस यांच्यावर टीका केली़ त्या म्हणाल्या, भाजपा सरकारच्या काळात महिलांवर अत्याचार वाढले़ महिलांविषयी अपशब्द वापरणाºया आमदारांवर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे, असे असताना या आमदारांना पाठीशी घालण्याचे काम भाजपाने केले़ त्यावरुन भाजपाची संस्कृती काय आहे, हे लक्षात येते़ आमच्या सरकारच्या काळात महिलांना सुरक्षा दिली जात आहे़ त्यांच्यावर अत्याचार होणार नाहीत, यासाठी प्रयत्न केले जात आहेत़ महिलांंना न्याय मिळवून देण्यासाठी आगामी काळात राज्यातील प्रत्येक तालुक्यात महिला दक्षता समिती स्थापन केली जाणार आहे, असे चाकणकर यांनी यावेळी सांगितले. राष्टÑीय अध्यक्ष फौजिया खान यांनी अध्यक्षीय समारोप केला. महिला राष्ट्रवादीच्या अध्यक्षा भावनाताई नखाते यांनी प्रास्ताविक केले. संदीप माटेगावकर यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी राकाँच्या महिला पदाधिकारी, कार्यकर्त्या बहुसंख्येने उपस्थित होत्या.संघटन वाढविण्यासाठी एकत्रित प्रयत्न करा४जिल्ह्यात राष्टÑवादी काँग्रेसची ताकद वाढविण्यासाठी महिला पदाधिकाऱ्यांनी एकत्रित प्रयत्न करावेत़ संघटना ही शिडीसारखी काम करत असते. प्रत्येकाने एकमेकांना आधार दिला पाहिजे. विशेष म्हणजे, संघटनचे काम करताना आत्मविश्वास वाढविणे तेवढेच गरजेचे आहे़ तेव्हा पदाधिकाºयांनी गावपातळीवर जावून काम करावे़ महिलांची ताकद वाढली तर पक्ष मजबूत होईल, असे चाकणकर म्हणाल्या़

टॅग्स :parabhaniपरभणीNCPराष्ट्रवादी काँग्रेस