शहरं
Join us  
Trending Stories
1
Mantha Cyclone: मोंथा चक्रीवादळ किनारपट्टीवर धडकले! वेग प्रतितास 100 किमी, विदर्भाला ऑरेंज अलर्ट
2
वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची खरंच चौकशी सुरू केली आहे का? मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले उत्तर
3
"निवडणुकीत लक्ष्मी दर्शन, कुणाला चपटी, कुणाला कोंबडं बकरू लागतं, तयारी ठेवा"; अजित पवारांच्या आमदाराचे विधान
4
पुण्यात भीषण अपघात! फरश्या घेऊन जाणाऱ्या ट्रकची तीन वाहनांना धडक,ट्रकचालकला पोलिसांच्या ताब्यात
5
१० हजारांचं जेवण करून बिल न भरता पळाले; ट्रॅफिकमध्ये झाला घोळ, रेस्टॉरंट मालकाने रस्त्यात गाठलं अन्...
6
वेळेत ब्लाऊज शिवून न देणे टेलरला पडलं महागात; ग्राहक कोर्टाने सुनावली शिक्षा, काय आहे प्रकार?
7
जळगाव जिल्ह्यात एसटी बसचा भीषण अपघात, चालकासह 8 प्रवाशी जखमी
8
"अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना आतापर्यंत ८ हजार कोटी वाटप, पुढील १५ दिवसांत ११ हजार कोटी देणार"
9
Mohammed Shami: "मी काही बोललो तर, वाद होईल!" संघ निवडीबाबत उपस्थित होणाऱ्या प्रश्नांवर शमीचं उत्तर
10
"त्यांना फाशीशिवाय दुसरी शिक्षा असूच शकत नाही"; डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणात उदयनराजेंनी लोकांना काय केले आवाहन?
11
Viral Video: फलंदाजाला 'असं' आउट होताना कधीच पाहिलं नसेल; षटकार मारूनंही पंचांनी वर केलं बोट!
12
अजबच! गावठी कुत्रा बनला ज्वेलरी शॉपचा रखवालदार, गळ्यात घालतो ५० तोळ्यांची सोन्याची चेन
13
Inspiring Story: तरुणीला किडनीची गरज, तरुणाला कर्करोग...; गोष्ट एका अनोख्या प्रेमाची!
14
'५० कोटींच्या धमकीला भीक घालत नाही', सुषमा अंधारेंनी रणजितसिंह नाईक निंबाळकरांविरोधात पुरावे दाखवले
15
4 दुचाकी, 6 सिलिंडर...बसमध्ये ठेवलेले 'हे' सामान; भडका उडाल्याने दोघांचा जागीच मृत्यू, डझनभर जखमी
16
UPSC Student Murder: लिव्ह पार्टनरची थंड डोक्याने हत्या, फॉरेन्सिक सायन्सची विद्यार्थिनी अमृताकडून 'ती' एक चूक झाली अन्...
17
'महायुती सरकारचे ११ हजार कोटींचे पॅकेजही ३२ हजार कोटींच्या पॅकेजसारखे फसवेच', हर्षवर्धन सपकाळ यांची टीका
18
मोठी बातमी! कर्जमाफीसाठी परभणी जिल्हाधिकाऱ्यांच्या गाडीवर शेतकऱ्याची दगडफेक
19
ट्रम्प आणि पुतिन यांच्यातील दरी वाढली, रशियन तेल साम्राज्याला मोठा झटका; परदेशी मालमत्ता विकण्यास सुरुवात
20
8th Pay Commission: १४०००, १५००० की १८०००...एक लाख सॅलरीवर किती होणार दरमहा वाढ?

बदलाचे वारे वाहू लागले; पालकमंत्री नवाब मलिकांच्या कार्यपद्धतीने राष्ट्रवादीत अस्वस्थता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2020 16:52 IST

मलिक यांचे जिल्ह्याकडे दुर्लक्ष झाल्याने भ्रमनिरास झालेल्या कार्यकर्त्यांनी त्यांच्यापासून दूर राहणे सुरु केले आहे

ठळक मुद्देशरद पवार यांच्याकडेच जिल्ह्यातील नेते मंडळींची तक्रारविश्रामगृहाच्या जवळच राष्ट्रवादी भवन असताना त्यांनी एकदाही भेट दिली नाही.

परभणी : पालकमंत्री नवाब मलिक यांच्या कार्यपद्धतीने राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली असून, त्यांना तातडीने बदलण्यात यावे, अशी मागणी पक्षाच्या जिल्ह्यातील प्रमुख नेत्यांनी अध्यक्ष खा. शरद पवार यांच्याकडे केली असल्याचे  विश्वसनीय सूत्रांनी सांगितले. 

पालकमंत्रीपदी नवाब मलिक हे राष्ट्रवादीचे प्रवक्ते असल्याने त्यांच्या अनुभवाचा फायदा जिल्ह्यातील विकास कामे करण्यासाठी होईल, अशी राष्ट्रवादीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांची अपेक्षा होती. त्यामुळेच नियुक्तीनंतर त्यांच्या दौऱ्यात प्रारंभी कार्यकर्त्यांचा मोठा लवाजमा असायचा. कार्यकर्त्यांची जिल्ह्यातील कामे मार्गी लागतील, अशी पक्षाच्या नेतेमंडळींची अपेक्षा होती; परंतु, मलिक यांचे जिल्ह्याकडे दुर्लक्ष झाल्याने भ्रमनिरास झालेल्या कार्यकर्त्यांनी त्यांच्यापासून दूर राहणे गेल्या दोन दौऱ्यांपासून सुरू केले होते.  विविध कामे घेऊन आलेल्या कार्यकर्त्यांना ते अपमानास्पद वागणूक देतात. एखाद्या कामाची शिफारस केल्यास त्याकडे लक्षच दिले जात नाही. विशेष म्हणजे त्यांच्या प्रत्येक दौऱ्यात कार्यकर्त्यांनी किंवा नेते मंडळींनी जी निवेदने दिली. त्यापैकी बहुतांश निवेदनावर काहीही कारवाई झाली नाही. पक्षाचा पालकमंत्री असूनही कार्यकर्त्यांना अशी वागणूक मिळत असले तर काय उपयोग, अशी तक्रार काही कार्यकर्त्यांनी जिल्ह्यातील नेत्यांकडे केली होती.

या पार्श्वभूमीवर २२ ऑक्टोबर रोजी मुंबई येथे पक्षाचे अध्यक्ष खा. शरद पवार यांच्याकडे जिल्ह्यातील प्रमुख नेते मंडळींनी पालकमंत्री नवाब मलिक यांची तक्रार केली असल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले. मलिक यांना परभणी जिल्ह्यात रस नाही. त्यामुळे ते नियमित दौऱ्यावर येत नाहीत. कार्यकर्त्यांच्या निवेदनावर कार्यवाही करीत नाहीत, त्यांना अपमानास्पद वागणूक देतात. त्यामुळे त्यांना बदलू अन्य कोणालाही ही जबाबदारी द्या, अशीही यावेळी मागणी करण्यात आली.  त्यानंतर २३ ऑक्टोबर रोजीच मलिक जिल्हा दौऱ्यावर आले. त्यांच्या दौऱ्यात एकही पदाधिकारी किंवा कार्यकर्ता सहभागी झाला नाही. त्यातूनच त्यांच्या विषयीची नाराजी समोर आली. 

पक्षाच्या बैठका विश्रामगृहातपालकमंत्र्यांचे परभणी दौऱ्यात शासकीय विश्रामगृह येथे वास्तव्य राहिले. या विश्रामगृहाच्या जवळच राष्ट्रवादी भवन असताना त्यांनी एकदाही राष्ट्रवादी भवनला भेट दिली नाही. पक्षाच्या कार्यकर्त्यांची बैठकही विश्रामगृहातच घेतली. पक्षाच्या जिल्हा परिषद, नगर पालिका, पंचायत समिती सदस्यांशी एकदाही त्यांनी संवाद साधला नाही. अधिकाऱ्यासोबत आढावा बैठक घेतली नाही. मग, कार्यकर्त्यांनी पक्षवाढीची कामे कशी करायची, असेही या पक्षातील नेत्यांनी वरिष्ठांकडे गाऱ्हाणे मांडले.

टॅग्स :nawab malikनवाब मलिकNCPराष्ट्रवादी काँग्रेसparabhaniपरभणीguardian ministerपालक मंत्री