शहरं
Join us  
Trending Stories
1
Two-Wheeler New Rules : नवीन सर्व दुचाकींना 'एबीएस आणि दोन हेल्मेट' सक्तीचे; केंद्रीय परिवहन मंत्रालयाचा मोठा निर्णय
2
एअर इंडियानं रद्द केली ८ उड्डाणं, आता काय घडलं? पुणे, मुंबई, दिल्लीसह अनेक मोठ्या शहरांतील प्रवाशांची अडचण
3
Debt on US: ट्रम्प अडकले... संकटात अमेरिका; कर्ज ३७ ट्रिलियन डॉलर्सच्या पार, भारताचं किती देणं लागतो US
4
क्रुझर प्रेमींची पहिली पसंत; नवीन अवतारात येणार Bajaj ची Avenger, किंमत फक्त...
5
आधी स्वत:च पत्नीचं कुंकू पुसलं, नंतर बॉयफ्रेंडसोबत लग्न लावलं; पती म्हणतो, “मला विष देऊन...”
6
इराण-इस्त्रायल युद्ध आता ट्रम्प विरुद्ध पुतिन; चीन, नॉर्थ कोरियाचा हुकुमशाह उघडपणे पुढे आले
7
पंढरपुरात मोठी घटना! मित्रासोबत विठू माऊलीच्या दर्शनाला आलेल्या तरुणाचा चंद्रभागा नदीत बुडून मृत्यू
8
'वर्षभरापूर्वीच एअर इंडियाच्या बोईंगमधील खराबीची माहिती दिलेली'; अहमदाबाद विमान अपघातावर खळबळजनक दावा
9
“पप्पा, आम्हाला भारतात बोलवा अन् फोन कट”; इराणमध्ये अडकली लेक, वडिलांना सतावतेय भीती
10
अभिषेक-करिश्मा कपूरचा झालेला साखरपुडा, पण लग्न का मोडलं? बिग बींनी केलेला खुलासा
11
बँकेत जाताय? थांबा! जुलैमध्ये १३ दिवस बँका बंद राहणार; पहा तुमच्या शहरातील सुट्ट्यांची यादी
12
मुंबई महापालिकेची निवडणूक मविआ एकत्र लढणार की नाही? शरद पवार म्हणाले, "उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची..."
13
Ashadhi Wari 2025: वारी म्हणजे केवळ पंढरपूरला चालत जाणं नव्हे, तर वारी म्हणजे सदेह वैकुंठाची वाट चालणं!
14
प्रियकरासोबत मिळून पतीची केली हत्या, लग्नाआधीपासून सुरू होते अफेअर; हत्येनंतर रचला बनाव
15
Corona Virus : बापरे! कोरोनाने वाढवलं टेन्शन, अवघ्या ४ दिवसांच्या बाळाला आणि एका महिन्यांच्या मुलीला लागण
16
मारन कुटुंबाचा वाद आला समोर, SunTV मधील हिस्स्यावरून दोन भाऊ आमने-सामने
17
Maharashtra Rain: आषाढीपुर्वीच पंढपुरात पुराचा धोका! भीमा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
18
भारताचा उल्लेख करत पाकिस्तानी संसदेत 'गजवा ए हिंद'चा नारा; खासदाराचं चिथावणीखोर भाषण
19
१ लाखाचे झाले १४ लाख! 'या' ५ मिडकॅप म्युच्युअल फंडांचा बंपर नफा, SIP मधूनही गुंतवणूकदार कोट्यधीश!
20
"६०-७० वर्षांच्या महिलांनाही रोमान्स हवा असतो, पण...", नीना गुप्तांचं बोल्ड वक्तव्य

बदलाचे वारे वाहू लागले; पालकमंत्री नवाब मलिकांच्या कार्यपद्धतीने राष्ट्रवादीत अस्वस्थता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2020 16:52 IST

मलिक यांचे जिल्ह्याकडे दुर्लक्ष झाल्याने भ्रमनिरास झालेल्या कार्यकर्त्यांनी त्यांच्यापासून दूर राहणे सुरु केले आहे

ठळक मुद्देशरद पवार यांच्याकडेच जिल्ह्यातील नेते मंडळींची तक्रारविश्रामगृहाच्या जवळच राष्ट्रवादी भवन असताना त्यांनी एकदाही भेट दिली नाही.

परभणी : पालकमंत्री नवाब मलिक यांच्या कार्यपद्धतीने राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली असून, त्यांना तातडीने बदलण्यात यावे, अशी मागणी पक्षाच्या जिल्ह्यातील प्रमुख नेत्यांनी अध्यक्ष खा. शरद पवार यांच्याकडे केली असल्याचे  विश्वसनीय सूत्रांनी सांगितले. 

पालकमंत्रीपदी नवाब मलिक हे राष्ट्रवादीचे प्रवक्ते असल्याने त्यांच्या अनुभवाचा फायदा जिल्ह्यातील विकास कामे करण्यासाठी होईल, अशी राष्ट्रवादीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांची अपेक्षा होती. त्यामुळेच नियुक्तीनंतर त्यांच्या दौऱ्यात प्रारंभी कार्यकर्त्यांचा मोठा लवाजमा असायचा. कार्यकर्त्यांची जिल्ह्यातील कामे मार्गी लागतील, अशी पक्षाच्या नेतेमंडळींची अपेक्षा होती; परंतु, मलिक यांचे जिल्ह्याकडे दुर्लक्ष झाल्याने भ्रमनिरास झालेल्या कार्यकर्त्यांनी त्यांच्यापासून दूर राहणे गेल्या दोन दौऱ्यांपासून सुरू केले होते.  विविध कामे घेऊन आलेल्या कार्यकर्त्यांना ते अपमानास्पद वागणूक देतात. एखाद्या कामाची शिफारस केल्यास त्याकडे लक्षच दिले जात नाही. विशेष म्हणजे त्यांच्या प्रत्येक दौऱ्यात कार्यकर्त्यांनी किंवा नेते मंडळींनी जी निवेदने दिली. त्यापैकी बहुतांश निवेदनावर काहीही कारवाई झाली नाही. पक्षाचा पालकमंत्री असूनही कार्यकर्त्यांना अशी वागणूक मिळत असले तर काय उपयोग, अशी तक्रार काही कार्यकर्त्यांनी जिल्ह्यातील नेत्यांकडे केली होती.

या पार्श्वभूमीवर २२ ऑक्टोबर रोजी मुंबई येथे पक्षाचे अध्यक्ष खा. शरद पवार यांच्याकडे जिल्ह्यातील प्रमुख नेते मंडळींनी पालकमंत्री नवाब मलिक यांची तक्रार केली असल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले. मलिक यांना परभणी जिल्ह्यात रस नाही. त्यामुळे ते नियमित दौऱ्यावर येत नाहीत. कार्यकर्त्यांच्या निवेदनावर कार्यवाही करीत नाहीत, त्यांना अपमानास्पद वागणूक देतात. त्यामुळे त्यांना बदलू अन्य कोणालाही ही जबाबदारी द्या, अशीही यावेळी मागणी करण्यात आली.  त्यानंतर २३ ऑक्टोबर रोजीच मलिक जिल्हा दौऱ्यावर आले. त्यांच्या दौऱ्यात एकही पदाधिकारी किंवा कार्यकर्ता सहभागी झाला नाही. त्यातूनच त्यांच्या विषयीची नाराजी समोर आली. 

पक्षाच्या बैठका विश्रामगृहातपालकमंत्र्यांचे परभणी दौऱ्यात शासकीय विश्रामगृह येथे वास्तव्य राहिले. या विश्रामगृहाच्या जवळच राष्ट्रवादी भवन असताना त्यांनी एकदाही राष्ट्रवादी भवनला भेट दिली नाही. पक्षाच्या कार्यकर्त्यांची बैठकही विश्रामगृहातच घेतली. पक्षाच्या जिल्हा परिषद, नगर पालिका, पंचायत समिती सदस्यांशी एकदाही त्यांनी संवाद साधला नाही. अधिकाऱ्यासोबत आढावा बैठक घेतली नाही. मग, कार्यकर्त्यांनी पक्षवाढीची कामे कशी करायची, असेही या पक्षातील नेत्यांनी वरिष्ठांकडे गाऱ्हाणे मांडले.

टॅग्स :nawab malikनवाब मलिकNCPराष्ट्रवादी काँग्रेसparabhaniपरभणीguardian ministerपालक मंत्री