शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

बदलाचे वारे वाहू लागले; पालकमंत्री नवाब मलिकांच्या कार्यपद्धतीने राष्ट्रवादीत अस्वस्थता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2020 16:52 IST

मलिक यांचे जिल्ह्याकडे दुर्लक्ष झाल्याने भ्रमनिरास झालेल्या कार्यकर्त्यांनी त्यांच्यापासून दूर राहणे सुरु केले आहे

ठळक मुद्देशरद पवार यांच्याकडेच जिल्ह्यातील नेते मंडळींची तक्रारविश्रामगृहाच्या जवळच राष्ट्रवादी भवन असताना त्यांनी एकदाही भेट दिली नाही.

परभणी : पालकमंत्री नवाब मलिक यांच्या कार्यपद्धतीने राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली असून, त्यांना तातडीने बदलण्यात यावे, अशी मागणी पक्षाच्या जिल्ह्यातील प्रमुख नेत्यांनी अध्यक्ष खा. शरद पवार यांच्याकडे केली असल्याचे  विश्वसनीय सूत्रांनी सांगितले. 

पालकमंत्रीपदी नवाब मलिक हे राष्ट्रवादीचे प्रवक्ते असल्याने त्यांच्या अनुभवाचा फायदा जिल्ह्यातील विकास कामे करण्यासाठी होईल, अशी राष्ट्रवादीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांची अपेक्षा होती. त्यामुळेच नियुक्तीनंतर त्यांच्या दौऱ्यात प्रारंभी कार्यकर्त्यांचा मोठा लवाजमा असायचा. कार्यकर्त्यांची जिल्ह्यातील कामे मार्गी लागतील, अशी पक्षाच्या नेतेमंडळींची अपेक्षा होती; परंतु, मलिक यांचे जिल्ह्याकडे दुर्लक्ष झाल्याने भ्रमनिरास झालेल्या कार्यकर्त्यांनी त्यांच्यापासून दूर राहणे गेल्या दोन दौऱ्यांपासून सुरू केले होते.  विविध कामे घेऊन आलेल्या कार्यकर्त्यांना ते अपमानास्पद वागणूक देतात. एखाद्या कामाची शिफारस केल्यास त्याकडे लक्षच दिले जात नाही. विशेष म्हणजे त्यांच्या प्रत्येक दौऱ्यात कार्यकर्त्यांनी किंवा नेते मंडळींनी जी निवेदने दिली. त्यापैकी बहुतांश निवेदनावर काहीही कारवाई झाली नाही. पक्षाचा पालकमंत्री असूनही कार्यकर्त्यांना अशी वागणूक मिळत असले तर काय उपयोग, अशी तक्रार काही कार्यकर्त्यांनी जिल्ह्यातील नेत्यांकडे केली होती.

या पार्श्वभूमीवर २२ ऑक्टोबर रोजी मुंबई येथे पक्षाचे अध्यक्ष खा. शरद पवार यांच्याकडे जिल्ह्यातील प्रमुख नेते मंडळींनी पालकमंत्री नवाब मलिक यांची तक्रार केली असल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले. मलिक यांना परभणी जिल्ह्यात रस नाही. त्यामुळे ते नियमित दौऱ्यावर येत नाहीत. कार्यकर्त्यांच्या निवेदनावर कार्यवाही करीत नाहीत, त्यांना अपमानास्पद वागणूक देतात. त्यामुळे त्यांना बदलू अन्य कोणालाही ही जबाबदारी द्या, अशीही यावेळी मागणी करण्यात आली.  त्यानंतर २३ ऑक्टोबर रोजीच मलिक जिल्हा दौऱ्यावर आले. त्यांच्या दौऱ्यात एकही पदाधिकारी किंवा कार्यकर्ता सहभागी झाला नाही. त्यातूनच त्यांच्या विषयीची नाराजी समोर आली. 

पक्षाच्या बैठका विश्रामगृहातपालकमंत्र्यांचे परभणी दौऱ्यात शासकीय विश्रामगृह येथे वास्तव्य राहिले. या विश्रामगृहाच्या जवळच राष्ट्रवादी भवन असताना त्यांनी एकदाही राष्ट्रवादी भवनला भेट दिली नाही. पक्षाच्या कार्यकर्त्यांची बैठकही विश्रामगृहातच घेतली. पक्षाच्या जिल्हा परिषद, नगर पालिका, पंचायत समिती सदस्यांशी एकदाही त्यांनी संवाद साधला नाही. अधिकाऱ्यासोबत आढावा बैठक घेतली नाही. मग, कार्यकर्त्यांनी पक्षवाढीची कामे कशी करायची, असेही या पक्षातील नेत्यांनी वरिष्ठांकडे गाऱ्हाणे मांडले.

टॅग्स :nawab malikनवाब मलिकNCPराष्ट्रवादी काँग्रेसparabhaniपरभणीguardian ministerपालक मंत्री