शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
2
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
3
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
4
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
5
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
6
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
7
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
8
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
9
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
10
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
11
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
12
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
13
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
14
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
15
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
16
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
17
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
18
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

माझा संतोष देशमुख झाला तर? बारावीच्या परीक्षा केंद्रसंचालकांनी मागितले सशस्त्र पोलिस संरक्षण

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2025 16:38 IST

एका उपद्रवी केंद्राचे संचालक दुसऱ्याला; मग फायदा काय? कॉपीमुक्त अभियानामुळे यंदा परभणी जिल्ह्यातील उपद्रवी परीक्षा केंद्र असलेल्या ठिकाणची मंडळी हादरली आहे.

परभणी : जिल्ह्यात कॉपीमुक्तीमुळे केंद्रसंचालकांची अदलाबदल केली. परभणीतील डीएसएम कॉलेजचे उपप्राचार्य विजय घोडके यांनी केंद्रसंचालक म्हणून जायची तयारी आहे. मात्र त्यासाठी मला घरापासून ते केंद्र व तेथून घरापर्यंत सशस्त्र पोलिस संरक्षण देण्याची मागणी छत्रपती संभाजीनगर येथे विभागीय मंडळाच्या सचिव डॉ. वैशाली जमादार यांच्याकडे काल केली.

कॉपीमुक्त अभियानामुळे यंदा परभणी जिल्ह्यातील उपद्रवी परीक्षा केंद्र असलेल्या ठिकाणची मंडळी हादरली आहे. मात्र दुसरीकडे नवीन केंद्रावर संचालक म्हणून जाणाऱ्या अनेकांनाही भीती वाटत आहे. उपप्राचार्य विजय घोडके यांनी प्रातिनिधीक स्वरुपात भावना मांडली. ते म्हणाले, शासनाने कॉपीमुक्ती हा मुद्दा अजेंड्यावर घेतला तर त्यातील भयावह स्थिती त्यांना माहिती आहे. मग उद्या आम्ही कॉपीमुक्ती करून संबंधितांच्या उद्योगात अडचण ठरणार असेल तर सुरक्षेचा धोका आहे. आमच्या कुटुंबाचे आम्ही आधार आहोत. जर कॉपीमुक्तीसाठी आमची नियुक्ती केली तर कॉपी होवू न देणे ही आमची जबाबदारी राहणार आहे. मात्र त्यासाठी आम्हाला सुरक्षाही पुरवावी, अशी रास्त मागणी आहे.

एका उपद्रवी केंद्राचे संचालक दुसऱ्याला; मग फायदा काय?जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी कॉपीमुक्तीसाठी वारंवार घेत असलेल्या बैठकांवर पाणी फेरण्याचे काम शिक्षण विभागातून होत आहे. एका उपद्रवी केंद्राचा संचालक दुसऱ्या उपद्रवी केंद्रावर व तेथील तिसऱ्या उपद्रवी केंद्रावर नेमून ही साखळी वेगळ्या पद्धतीने कायम ठेवण्याचा चंग बांधल्याचे दिसत आहे. त्यामुळे कॉपीमुक्तीसाठी या नियुक्त्या फारशा उपयोगी ठरणार नाहीत, असेच दिसते. कॉपीमुक्त सेंटरवरील दुसऱ्या शिक्षकांनाही केंद्रप्रमुख म्हणून नेमण्यासाठी काय अडचण आहे? हे कळायला मार्ग नाही.

कॉपीमुक्त केंद्रातील प्राध्यापक नेमा जेथे कॉपी केली जात नाही व नियमित वर्ग भरतात, अशा शाळा, महाविद्यालयांतील शिक्षकांना केंद्रसंचालक नेमले तर त्याचा फायदा होवू शकतो. कारण या मंडळींनी मेहनत घेवूनही त्यांचा तेवढा निकाल लागत नाही. उपद्रवी केंद्राच्या ठिकाणचा निकाल कायम उच्च कोटीचा असतो. शिवाय विद्यार्थ्यांचा ओढाही उपद्रवी केंद्रांकडेच वाढत आहे. त्यामुळे इमानदारीने काम करूनही नोकऱ्या धोक्यात येण्याची भीती या मंडळींना आहे. त्यामुळे ते केंद्रसंचालक झाले तर निदान या एका कारणाने तरी ते विद्यार्थ्यांना कॉपी करण्यापासून रोखतील.

८० च्या तुकडीत २५० विद्यार्थी कसे?जेव्हा एखाद्या शाळेत ८० विद्यार्थ्यांची तुकडी असेल तर तेथे २५० विद्यार्थी परीक्षेला कसे बसू शकतात. विभागीय मंडळ सोडा शिक्षण विभागाकडूनही साधी याची चौकशी का होत नाही? हा प्रश्न आहे.

टॅग्स :HSC / 12th Exam12वी परीक्षाparabhaniपरभणीexamपरीक्षा