शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या टॅरिफला अमेरिकेतच विरोध; भारतावरील ५०% टॅरिफ रद्द करण्याचा प्रस्ताव
2
कोलकात्यात मेस्सी आला अन्... संतप्त चाहत्यांनी खुर्च्यांचाच फुटबॉल केला!
3
दिसते तसे नसते... म्हणूनच जग फसते! भाजप-शिंदेसेनेच्या भांडणामागचे आणि युतीमागचे 'राजकारण'
4
इसिसच्या मॉड्युलची पडघ्यात खैराच्या लाकडाची मोठी तस्करी; ईडीने केलेल्या तपासातून माहिती आली उजेडात
5
'मतचोरी'त भाजपच्या माजी आमदारासह मुलाचा सहभाग; आळंद येथील घटनेप्रकरणी सात जणांवर आरोपपत्र
6
झोपडपट्ट्यांत मूल विकणाऱ्या टोळ्या सक्रिय; हरवलेल्या मुलांच्या शोधासाठी 'ऑपरेशन मुस्कान'
7
इंडिगोचे पंख आवळले, ५९ कोटींचा ठोठावला दंड! आदेशाला आव्हान देण्याचा विमान कंपनीचा विचार
8
संसदेवरील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्यांना श्रद्धांजली अर्पण; २००१ मध्ये झाला होता हल्ला
9
ज्येष्ठांच्या संरक्षणाबाबत पोलिसांचे वर्तन बेफिकीर; वृद्ध दाम्पत्याला मुलाकडून मारहाणप्रकरणी हायकोर्टाचे पोलिसांवर ताशेरे
10
लाडकी बहीण योजनेत e-KYC करताना चूक झाली? सरकारने दिली दुरुस्तीची संधी; ‘ही’ आहे शेवटची तारीख
11
फुटबॉलचा जादूगार २२ मिनिटेच का थांबला? मेस्सीचे लगेचच स्टेडियम सोडण्याचे खरे कारण आले समोर
12
"या मुलांना धडा शिकवायला हवाच"; वरळी हिट-अँड-रन प्रकरणात कोर्टाचा दणका, मिहिर शाहचा जामीन फेटाळला
13
टीम इंडियाचं नेमकं कुठं चुकतंय? गौतम गंभीरच्या रणनीतीवर रॉबिन उथप्पाची टीका
14
“आता येत्या २ महिन्यात एकनाथ शिंदे पुन्हा CM होतील असे वाटतेय”; कुणी केली भविष्यवाणी?
15
"मगरीचे अश्रू, बंगालचा अपमान...", मेस्सीच्या कार्यक्रमात गोंधळ; BJP-TMC मध्ये आरोप-प्रत्यारोप
16
प्रवाशांनो… वंदे भारत, राजधानीने प्रवास करताय? ‘हा’ नियम अनिवार्य; अन्यथा तिकीट मिळणार नाही!
17
५१००० हजारांचे कोल्हापुरी चप्पल थेट निघाले प्राडाच्या गावी; एक ग्रॅम ही वजनात फरक नसलेली एकमेव जोड
18
डोंबिवलीत पुन्हा प्रदूषण; रस्त्यावर गुलाबी रंग; पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, 'तथ्ये तपासून कारवाई करू'
19
सिडकोच्या घरांमध्ये मोठी सूट; लॉटरीपूर्वीच किमती १० टक्क्यांनी घटल्या, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय
20
जंगलात एक कोटींच्या शेळ्या सोडणे हास्यास्पद; वनमंत्र्यांच्या बिबट्यांच्या उपायांची अजित पवारांनी उडवली खिल्ली
Daily Top 2Weekly Top 5

माझा संतोष देशमुख झाला तर? बारावीच्या परीक्षा केंद्रसंचालकांनी मागितले सशस्त्र पोलिस संरक्षण

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2025 16:38 IST

एका उपद्रवी केंद्राचे संचालक दुसऱ्याला; मग फायदा काय? कॉपीमुक्त अभियानामुळे यंदा परभणी जिल्ह्यातील उपद्रवी परीक्षा केंद्र असलेल्या ठिकाणची मंडळी हादरली आहे.

परभणी : जिल्ह्यात कॉपीमुक्तीमुळे केंद्रसंचालकांची अदलाबदल केली. परभणीतील डीएसएम कॉलेजचे उपप्राचार्य विजय घोडके यांनी केंद्रसंचालक म्हणून जायची तयारी आहे. मात्र त्यासाठी मला घरापासून ते केंद्र व तेथून घरापर्यंत सशस्त्र पोलिस संरक्षण देण्याची मागणी छत्रपती संभाजीनगर येथे विभागीय मंडळाच्या सचिव डॉ. वैशाली जमादार यांच्याकडे काल केली.

कॉपीमुक्त अभियानामुळे यंदा परभणी जिल्ह्यातील उपद्रवी परीक्षा केंद्र असलेल्या ठिकाणची मंडळी हादरली आहे. मात्र दुसरीकडे नवीन केंद्रावर संचालक म्हणून जाणाऱ्या अनेकांनाही भीती वाटत आहे. उपप्राचार्य विजय घोडके यांनी प्रातिनिधीक स्वरुपात भावना मांडली. ते म्हणाले, शासनाने कॉपीमुक्ती हा मुद्दा अजेंड्यावर घेतला तर त्यातील भयावह स्थिती त्यांना माहिती आहे. मग उद्या आम्ही कॉपीमुक्ती करून संबंधितांच्या उद्योगात अडचण ठरणार असेल तर सुरक्षेचा धोका आहे. आमच्या कुटुंबाचे आम्ही आधार आहोत. जर कॉपीमुक्तीसाठी आमची नियुक्ती केली तर कॉपी होवू न देणे ही आमची जबाबदारी राहणार आहे. मात्र त्यासाठी आम्हाला सुरक्षाही पुरवावी, अशी रास्त मागणी आहे.

एका उपद्रवी केंद्राचे संचालक दुसऱ्याला; मग फायदा काय?जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी कॉपीमुक्तीसाठी वारंवार घेत असलेल्या बैठकांवर पाणी फेरण्याचे काम शिक्षण विभागातून होत आहे. एका उपद्रवी केंद्राचा संचालक दुसऱ्या उपद्रवी केंद्रावर व तेथील तिसऱ्या उपद्रवी केंद्रावर नेमून ही साखळी वेगळ्या पद्धतीने कायम ठेवण्याचा चंग बांधल्याचे दिसत आहे. त्यामुळे कॉपीमुक्तीसाठी या नियुक्त्या फारशा उपयोगी ठरणार नाहीत, असेच दिसते. कॉपीमुक्त सेंटरवरील दुसऱ्या शिक्षकांनाही केंद्रप्रमुख म्हणून नेमण्यासाठी काय अडचण आहे? हे कळायला मार्ग नाही.

कॉपीमुक्त केंद्रातील प्राध्यापक नेमा जेथे कॉपी केली जात नाही व नियमित वर्ग भरतात, अशा शाळा, महाविद्यालयांतील शिक्षकांना केंद्रसंचालक नेमले तर त्याचा फायदा होवू शकतो. कारण या मंडळींनी मेहनत घेवूनही त्यांचा तेवढा निकाल लागत नाही. उपद्रवी केंद्राच्या ठिकाणचा निकाल कायम उच्च कोटीचा असतो. शिवाय विद्यार्थ्यांचा ओढाही उपद्रवी केंद्रांकडेच वाढत आहे. त्यामुळे इमानदारीने काम करूनही नोकऱ्या धोक्यात येण्याची भीती या मंडळींना आहे. त्यामुळे ते केंद्रसंचालक झाले तर निदान या एका कारणाने तरी ते विद्यार्थ्यांना कॉपी करण्यापासून रोखतील.

८० च्या तुकडीत २५० विद्यार्थी कसे?जेव्हा एखाद्या शाळेत ८० विद्यार्थ्यांची तुकडी असेल तर तेथे २५० विद्यार्थी परीक्षेला कसे बसू शकतात. विभागीय मंडळ सोडा शिक्षण विभागाकडूनही साधी याची चौकशी का होत नाही? हा प्रश्न आहे.

टॅग्स :HSC / 12th Exam12वी परीक्षाparabhaniपरभणीexamपरीक्षा