शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात 'जम्बो'भरती! ४ ऑक्टोबरला एकाचवेळी तब्बल १०,३०९ उमेदवार शासकीय सेवेत होणार दाखल
2
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम
3
“मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज, पण सरकारने...”; खासदार शाहू महाराजांनी व्यक्त केली खंत
4
ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागप्रमुखाला २५ लाखांची लाच घेताना अटक; अगोदर घेतलेले १० लाख
5
मंत्रालयातील लूटीला चाप बसणार! सल्लागारांच्या नियुक्त्यांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी निर्णय
6
GST घटला, पण सरकारचा खजिना भरला, सप्टेंबर महिन्यात झाली विक्रमी कमाई   
7
ICC Womens World Cup : 'लेडी मॅक्सवेल'ची विक्रमी सेंच्युरी; असा पराक्रम करणारी ठरली पहिली बॅटर
8
मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी उद्धवसेनेला मोठा धक्का; ‘या’ गटाचे प्रमुख, पदाधिकारी शिवसेनेत
9
VIDEO: परंपरा.. प्रतिष्ठा.. अनुशासन.. 'या' ठिकाणी पुरूष साडी नेसून करतात गरबा, कारण...
10
“वाट कसली पाहता? शेतकरी भाजपात आल्यावर कर्जमुक्ती करणार का?”; उद्धव ठाकरेंचा थेट सवाल
11
संविधान सत्याग्रह पदयात्रेदरम्यान पोलिसांकडून पाळत, काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचे सरकारला आव्हान, म्हणाले...
12
NHIDCL: एनएचआयडीसीएलमध्ये नोकरी, 'या' पदांसाठी भरती; १ लाख ५० हजारांपर्यंत पगार!
13
वय वर्ष ३१, संपत्ती ₹२१,१९० कोटी! कोण आहे भारतातील सर्वात तरुण अब्जाधीश? काय काम करतो?
14
लोकसंख्येतील बदल घुसखोरीपेक्षाही घातक...! असं का म्हणाले पंतप्रधान मोदी? देशाला दिला गंभीर इशारा
15
'ओला दुष्काळ जाहीर करा', उद्धव ठाकरेंनी दाखवले CM फडणवीसांचे पत्र, म्हणाले, "मलाही वेदना झाल्या.."
16
CM फडणवीसांचा ‘तो’ Video विरोधकांनी दाखवला; म्हणाले, “गांभीर्याने विचार करा, असले राजकारण...”
17
शौक बड़ी चीज है! १७ व्या वर्षी iPhone 4, iPad 2 साठी विकली किडनी, आता आयुष्यभराचं दुखणं
18
पुतीन यांची दहशत...! 27 देशांनी घेतला रशियाचा धसका; जगात पहिल्यांदाच तयार होणार 'ड्रोन वॉल', कसं काम करणार?
19
बोगस खेळाडू आढळल्यामुळे वय निश्चितीची अट; शालेय क्रीडा स्पर्धांपासून मुले राहताहेत वंचित
20
'देशद्रोह्यांनी मॅच एन्जॉय केली असेल', IND-PAK सामन्यावरुन उद्धव ठाकरेंची बोचरी टीका

टरबूज, खरबूज, भाजीपाला उत्पादकांचे १० कोटींचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2021 04:17 IST

गंगाखेड : कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यासह परजिल्ह्यात लागू केलेल्या संचारबंदीमुळे बाजारपेठ बंद राहिल्या. परिणामी ४ हजार हेक्टरवरील काढणीस आलेले ...

गंगाखेड : कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यासह परजिल्ह्यात लागू केलेल्या संचारबंदीमुळे बाजारपेठ बंद राहिल्या. परिणामी ४ हजार हेक्टरवरील काढणीस आलेले टरबूज, खरबजू, भाजीपाला बाजारपेठ अभावी जागेवरच सडून जात आहे. त्यामुळे गंगाखेड तालुक्यातील या शेतकऱ्यांचे १० काेटींहून अधिकचे नुकसान झाले आहे. याकडे राज्य शासनाने लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.

गंगाखेड तालुक्यातून इतर शहरात मोठ्या प्रमाणात दरवर्षी टरबूज, खरबूज व भाजीपाल्याची वाहतूक केली जाते. त्यामुळे कमी दिवसांमध्ये जास्तीचे उत्पादन घेण्यासाठी तालुक्यातील शेतकरी मागील अनेक वर्षांपासून सरसावले आहेत. त्यामुळे याहीवर्षी शेतकऱ्यांनी १ हजार ५०० हेक्टरवर टरबूज, खरबूज आणि २ हजार ५०० हेक्टरवर वांगे, टोमॅटो, मिरची, पालक, गाजर, चुका आदी भाजीपाल्याची मोठ्या प्रमाणात लागवड केली. मात्र यावर्षीच्या फेब्रुवारी महिन्यापासून पुन्हा एकदा संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यासह परजिल्ह्यातील बाजारपेठा ठप्प पडल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी लागवड करून काढणीस आलेला भाजीपाला बाजारपेठ अभावी जागीच सडून जात आहे. त्यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांनी भाजीपाला उत्पादनासाठी मोठ्या प्रमाणात केलेला खर्चही निघाला नाही. त्यामुळे राज्य शासनाने या शेतकऱ्यांच्या नुकसानीकडे लक्ष देऊन पंचनामा करत आर्थिक नुकसान द्यावे, अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.

अर्ध्या एकर शेतामध्ये टोमॅटो, वांग्यांची लागवड केली. या पिकांवर मोठा खर्च केला. मात्र कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर लागलेल्या संचारबंदीमुळे बाजारपेठ बंद आहेत. त्यामुळे भाजीपाल्याचे भाव गडगडले आहेत. परिणामी मोठा फटका सहन करावा लागत आहे.

बाळासाहेब राठोड, भाजीपाला उत्पादक शेतकरी