शहरं
Join us  
Trending Stories
1
तुम्ही आम्हाला मतदान केले, तरच...; सहायक आयुक्तांना व्यासपीठावर बसवून मंत्री राणे यांची प्रचारसभा
2
तामिळनाडू हादरलं! कडलूरमध्ये भीषण अपघात; भरधाव बसने दोन कारना चिरडले, ९ जणांचा मृत्यू
3
महास्फोट! एपस्टीनच्या 'त्या' १० लाख कागदपत्रांमध्ये दडलंय काय? नेमकं सत्य काय? जगभरात खळबळ!
4
वर्षानुवर्षांची स्क्रिप्ट बदला, विकासावर बोला, हजार रुपये मिळवा : देवेंद्र फडणवीस
5
हमास प्रमुख इस्माईल हानियाला हत्येच्या काही वेळ आधीच गडकरी भेटलेले...; पहाटे ४ वाजता हॉटेलवर अधिकारी आले...
6
तारिक रहमान परतण्यापूर्वी बांगलादेशात पुन्हा हिंसाचार उफाळला; ढाका बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू
7
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
8
संपादकीय: निवडणूक कामात शिक्षकच का? समोर दहावी, बारावीच्या परीक्षाही...
9
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २५ डिसेंबर २०२५: आनंदाची बातमी मिळेल, कुटुंबातील वातावरण सुखावह राहील!
10
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
11
‘निवडून आलो, तर पक्ष बदलणार नाही’, असे लिहून देता का?
12
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
13
मोठा धक्का! बीकेसीतील बुलेट ट्रेन स्थानकाचे काम तात्काळ थांबवण्याची नाेटीस
14
देशातील हवाई वाहतूक क्षेत्रात आणखी दोन नव्या कंपन्यांची एन्ट्री; हिंद एअर, फ्लाईएक्स्प्रेसला केंद्र सरकारकडून मंजुरी
15
‘त्या’ कुटुंबाची जबाबदारी बांगलादेश सरकारने स्वीकारली
16
सुट्टीसाठी तळमळणाऱ्या मंत्र्यांना ‘डिसेंबर’ हुडहुडी!
17
जिथे नेटवर्क नाही, तिथेही मोबाइल चालणार; आपत्तींतही इंटरनेट मिळेल
18
बिहार संघाने नोंदवली विश्वविक्रमी धावसंख्या; वैभवने चोपल्या १९० धावा, त्याही एवढ्याच चेंडूत...
19
विजय हजारे स्पर्धेत विक्रमच विक्रम, एकाच दिवसात दोन दीड शतके, दोन स्फोटक शतके...
20
वायुप्रदूषण असेच कायम राहिल्यास बांधकामे थांबवण्याचे आदेश देऊ! मुंबई उच्च न्यायालयाचा महापालिकेला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

तीन रुपये किलोने विक्री करावे लागले टरबूज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2021 04:17 IST

परभणी : टरबुजाची शेती करून दरवर्षी उत्पन्न मिळवणाऱ्या तालुक्यातील पाथरी येथील शेतकऱ्याला यावर्षी मात्र तब्बल दीड लाख रुपयांचा फटका ...

परभणी : टरबुजाची शेती करून दरवर्षी उत्पन्न मिळवणाऱ्या तालुक्यातील पाथरी येथील शेतकऱ्याला यावर्षी मात्र तब्बल दीड लाख रुपयांचा फटका सहन करावा लागला आहे. संचारबंदीमुळे बाजारपेठेत उठाव नसल्याने तीन रुपये किलो दराने टरबुजाची विक्री केल्याचे शेतकऱ्याने सांगितले.

तालुक्यातील पाथरा येथील सय्यद समंदर सय्यद छोटू हे दरवर्षी टरबुजाची लागवड करतात. पारंपरिक शेतीला फाटा देत प्रयोगशीलता अवलंबत टरबूज शेतीतून त्यांनी आतापर्यंत बऱ्यापैकी उत्पन्न मिळविले आहे. मात्र यावर्षी टरबुजांचे उत्पादन बाजारात येण्यापूर्वी कोरोनाची साथ धडकली. वाढलेल्या संसर्गामुळे संचारबंदी लावण्यात आली आहे. परिणामी जिल्हाभरातील बाजारपेठ ठप्प आहे. उन्हाळ्यात टरबुजांना मागणी वाढते; परंतु या वर्षी बाजारपेठच उपलब्ध नसल्याने टरबुजांचे भाव गडगडले. परिणामी सय्यद समंदर यांना मोठा आर्थिक फटका सहन करावा लागला. टरबुजांना भाव मिळत नसल्याने काही दिवसांपूर्वी त्यांनी नांदेड जिल्ह्यातील लोहा येथील बाजारपेठेत ३ रुपये किलो या दराने टरबुजांची विक्री केली. त्यामुळे या संपूर्ण हंगामातून टरबूज शेतीवर केलेला खर्चही निघणे दुरापास्त झाले आहे. सुमारे दीड लाख रुपयांचा फटका सहन करावा लागला, असे सय्यद समंदर यांनी सांगितले.

पाच एकरमध्ये लागवड

पाथरा येथील शेतकरी सय्यद समंदर यांनी पाच एकर क्षेत्रावर टरबुजाची लागवड केली होती. यासाठी तीन महिन्यांपूर्वी केलेला खर्चही निघालेला नाही. सर्वसाधारणपणे ८ ते ९ रुपये किलो दराने विक्री होणारे टरबूज यंदा मात्र तीन रुपये किलो दराने विक्री करावी लागले. त्यामुळे टरबूज शेती यावर्षी तोट्यात राहिली आहे.