शहरं
Join us  
Trending Stories
1
पहिला दिवस गोंधळाचा; विरोधक झाले आक्रमक; पहलगाम हल्ला ते बिहार मतदारयादीवरून गोंधळ 
2
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
3
शाळेवर विमान कोसळून २० ठार; बांगलादेशात अहमदाबादची पुनरावृत्ती!
4
६३ खासदार म्हणतात, न्या. वर्मांना पदावरून हटवा! कारण काय?
5
महाराष्ट्रातील ४ लाख शेतकरी लाभार्थी यादीतून झाले गायब; लाभार्थी १०.२ लाखांवरून केवळ १५ हजारांवर
6
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
7
शेतकऱ्याचा मुलगा ते उपराष्ट्रपती, अशी राहिली आहे जगदीप धनखड यांची वादळी कारकीर्द
8
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
9
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
10
सुनील तटकरे यांच्या सांगण्यावरूनच विजयकुमार घाडगे यांना मारहाण, मनोज जरांगे-पाटील यांचा आरोप
11
दातांवर उपचार करताना महिलेचे कानही झाले बरे, २० वर्षांपासून येत नव्हतं ऐकू, असा घडला चमत्कार
12
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
13
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
14
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
15
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
16
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
17
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
18
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
19
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
20
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...

खेर्डा येथे २६ जून रोजी पाणी पेरणी परिषद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2021 04:12 IST

खेर्डा येथील प्रकरणाच्या अनुषंगाने बोलताना कॉ. गणपत भिसे म्हणाले की, खेर्डा येथे दलित वस्तीचे पाणी तोडून येथील काही ग्रामपंचायत ...

खेर्डा येथील प्रकरणाच्या अनुषंगाने बोलताना कॉ. गणपत भिसे म्हणाले की, खेर्डा येथे दलित वस्तीचे पाणी तोडून येथील काही ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी दलित व नवबौद्धांबाबत अपशब्द वापरले आहेत. काही दलित ग्रामस्थांना मारहाण करण्यात आली आहे. त्यांना अपमानित करण्यात आले. या प्रकरणी पाथरी पोलीस स्थानिक नेतेमंडळींच्या आदेशानुसार काम करीत आहेत. त्यामुळे मागासवर्गीयांवर अन्याय केला जात आहे. या पार्श्वभूमीवर २६ जून रोजी दुपारी १२.३० वाजता खेर्डा येथे पाणी पेरणी परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. महाड येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी २० मार्च १९२७ रोजी पाण्यासाठी चवदार तळ्याचा सत्याग्रह केला होता. या घटनेच्या ९४ वर्षांनंतरही दलितांना पाण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. नव्या पिढीसमोर बाबासाहेबांच्या विचारांचा संदेश घेऊन जाण्यासाठी चवदार तळ्याचे पाणी आणून त्या पाण्याची खेर्डा या गावात पेरणी करण्यात येणार आहे. त्यासाठीच पाणी पेरणी परिषद घेण्यात येणार असल्याचे कॉ. भिसे म्हणाले. या परिषदेस उपस्थित राहण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.