शहरं
Join us  
Trending Stories
1
आमची ट्रॉफी, मेडल्स आम्हाला परत द्या... BCCI चा मोहसीन नक्वी यांना इशारा, ACC बैठकीत राडा
2
मोहसीन नक्वी यांनी अखेर टीम इंडियापुढे गुडघे टेकले... भारताचा मोठा विजय! बैठकीत काय घडलं?
3
'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका
4
ऑक्टोबर महिन्यात पाऊस आणखी झोडपणार, हवामान खात्याने दिली धडकी भरवणारी माहिती 
5
‘राहुल गांधींना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यास कठोर शिक्षा करा, त्यांच्या सुरक्षेत वाढ करा’, काँग्रेसचं लोकसभा अध्यक्षांना पत्र  
6
ट्रम्प यांच्या निर्णयाचा भारताला फायदा; अमेरिकन कंपन्या भारतात शिफ्ट होण्याच्या तयारीत
7
ठाकरे बंधूंच्या युतीसंदर्भात संजय राऊतांचं सूचक विधान, दसऱ्याला...! स्पष्टच बोलले
8
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली
9
सचिन तेंडुलकरसारखी मॅचविनर खेळी करून रायगड जिल्हयात पक्षाला बळ देऊ- सुनिल तटकरे
10
नागपूरमधील प्रकल्प इतर राज्यांकडे वळण्याच्या प्रयत्नात ? ८८४४ कोटींचे प्रकल्प जमिनीअभावी अडकले !
11
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
12
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?
13
भरधाव कारचा भीषण अपघातात! अनेक वेळा उलटल्यानं चुराडा, तरुणीही दूर फेकली गेली; बघा VIDEO
14
Omega Seiki: जगातील पहिली ड्रायव्हरलेस रिक्षा भारतात लॉन्च, एका चार्जवर १२० किमी धावणार!
15
महात्मा गांधींना शरण जाणे हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा वैचारिक पराभव; काँग्रेसचा खोचक टोला
16
पाकिस्तानात गेलं की ISI एजंट बनतं का? सोनम वांगचुक यांच्या पत्नीने हिंसाचारासाठी CRPF ला धरलं जबाबदार
17
गावात वास्तव्य, सायकलवरून प्रवास आणि..., असं आहे Arattaiचे संस्थापक श्रीधर वेंबू यांचं साधं राहणीमान
18
"आजकाल मुलांना वाढवणं कठीण...", मृण्मयी देशपांडेने व्यक्त केलं मत, पालकांबद्दल म्हणाली...
19
मोठी बातमी! दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात मदत पोहचणार; पुढच्या आठवड्यात घोषणा करू - CM देवेंद्र फडणवीस
20
Colab Platforms Stock Price: ७३ दिवसांपासून शेअरला लागतंय अपर सर्किट, वर्षभरात ८४२% ची वाढ; गुंतवणूकदार मालामाल

वितरीकाच्या अर्धवट कामामुळे शेतात घुसले पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 04:27 IST

निम्न दुधना प्रकल्पातून रबी हंगामातील पिकांसाठी २ डिसेंबर रोजी दोन्ही कालव्यात पाणी सोडले आहे. डाव्या आणि उजव्या दोन्ही कालव्याच्या ...

निम्न दुधना प्रकल्पातून रबी हंगामातील पिकांसाठी २ डिसेंबर रोजी दोन्ही कालव्यात पाणी सोडले आहे. डाव्या आणि उजव्या दोन्ही कालव्याच्या वितरीका आणि लघु वितरिकांची कामे अर्धवट अवस्थेत आहेत. काही भागात वितरीकेच्या कामासाठी खोदकाम करून अर्धवट सोडले आहे. डाव्या कालव्याच्या ब्रम्हवाकडी शिवारातील वितरीका क्रमांक १ चे केवळ खोदकाम करून ठेवले. कालव्यात पाणी सोडल्यानंतर अनिल रावसाहेब कदम यांच्या शेतात पाणी घुसले आहे. या ठिकाणी कदम यांचे १० एकर शेती आहे. त्यात कापूस, तूर ही पिके उभी आहेत. त्यांच्या ३ एकर शेतात पाणी साचले आहे. त्यामुळे उभ्या पिकांचे नुकसान झाले अशी माहिती शेतकरी कदम यांनी दिली. तसेच या शिवारातील प्रकाश वनवे, मोहन कुलकर्णी, गणेश कोरडे या शेतकऱ्यांच्या शेतात पाणी साचले आहे. दरम्यान, शेतकऱ्यांनी या संदर्भात पाटबंधारे विभागाला माहिती दिल्यानंतर शुक्रवारी दुपारी १२ वाजता जेसीबीच्या साहायाने शेतात येणारे पाणी थांबिण्यात आले.

अधर्वट कामे आणि सफाईकडे दुर्लक्ष

निम्न दुधना प्रकल्पाच्या दोन्ही कालव्याच्या वितरीका आणि लघु वितरिकांची कामे अनेक वर्षांपासून रखडले आहेत. अनेक ठिकाणी खोदकाम करून ठेवले आहे. तर काही ठिकाणी सिमेंट कॅक्रेट करून काम अर्धवट अवस्थेत आहे. दोन्ही कालव्याची अनेक ठिकाणी तुटफुट झाली आहे. तसेच गाळ साचून कालव्यात झुडपे वाढले आहेत. त्यामुळे पाणी सोडण्यापूर्वी दोन्ही कालव्याची आवश्यक त्या ठिकाणी दुरूस्ती, साफसफाई तसेच अधर्वट कामे असलेल्या वितरिकेतून पाणी शेतात घुसणार नाही याची काळजी घेणे आवश्यक होते. मात्र संबंधित विभागाने याकडे दुर्लक्ष केल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले. तसेच पाण्याची नासाडी होत आहे. याकडे पाटबंधारे विभागाने लक्ष देण्याची मागणी होत आहे.