शहरं
Join us  
Trending Stories
1
कॅचच्या निर्णयावरून भारतीय खेळाडूंचा अंपायरशी वाद; पाकिस्तानकडून वैभव सूर्यवंशीच्या संघाचा पराभव
2
दिल्ली ब्लास्ट : रोहतकची डॉक्टर प्रियंका शर्मा अनंतनागमधून ताब्यात, कुटुंबीयांनी काय सांगितंल?
3
IND A vs PAK A : भारत-पाक मॅचमध्ये Relay Catch वरुन वाद; नेमकं काय घडलं? चिटिंग झाली की...
4
ब्रेकिंग! मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईचा गॅस पुरवठा खंडित; पाईपलाईनचे मोठे नुकसान, घरगुती गॅस बंद, CNG स्टेशनवर तुटवडा
5
सैन्यभरतीसाठी गेलेल्या तरुणांच्या मोटरसायकलला उसाच्या ट्रकची धडक; दोघांचाही जागीच मृत्यू
6
भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज मॅच! वैभव सुर्यवंशीचा संघ ढेपाळला; एका मागोमाग एक १० विकेट, झालेत इतकेच रन्स...
7
मोठी बातमी! लाल किल्ला स्फोटाची जबाबदारी टीआरएफने स्वीकारली; 'पहलगाम' हल्ल्याशी जोडले स्फोटाचे धागेदोरे
8
दिल्ली ब्लास्ट प्रकरणात NIA ची मोठी कारवाई, उमरच्या जवळच्या सहकाऱ्याला अटक; याच्याच नावावर होती i-20 कार
9
'विशेष मतदार यादी सुधारणा' प्रक्रियेच्या कामाच्या ताणामुळे बीएलओ अधिकाऱ्याने आयुष्य संपविले; कर्मचारी वर्गात संताप
10
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार! 'मिशन कॅबिनेट'ची तयारी पूर्ण; मुख्यमंत्री कोणाचा होणार यावर मात्र...
11
तेजस्वी यांनी पराभवासाठी बहीण रोहिणीला ठरवलं जबाबदार; फेकली होती चप्पल? अशी आहे संपूर्ण इनसाइड स्टोरी!
12
पाकिस्तानच्या गोळीबार गमावला पाय; आता 'गौरी'ला मिळाले नवीन आयुष्य
13
दिल्ली ब्लास्टचे बांग्लादेश कनेक्शन उघड; मुर्शिदाबाद मार्गे भारतात आणली स्फोटके
14
युरोपने केलेली 'ही' मोठी चूक अमेरिकेला ३० वर्षांत गरीब करेल; जे पी मॉर्गनचा इशारा
15
तेजस्वी यादवांच्या अन्य तिन्ही बहिणींनी पाटणाचे घर सोडले; मोठ्या बहिणीनंतर...
16
मी दिलेला '२५ जागांचा शाप' खरा ठरला!; तेजस्वी यादवांनी तिकीट नाकारले तेव्हा रडणाऱ्या नेत्याचा दावा 
17
तेजप्रताप यादवांचा राज्यातील NDA सरकारला पाठिंबा; रोहिणी आचार्य यांना मोठी जबाबदारी देणार
18
रशिया आणि युक्रेनमध्ये मोठा करार होणार, राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींनी केली घोषणा; म्हणाले...
19
“जो जीता वही सिकंदर, पण सिकंदर बनायचे राज समजू शकले नाही”; बिहार निकालावर उद्धव ठाकरे बोलले
20
"सुन लो जयचंदों...! माझ्या वडिलांनी एक इशारा दिला तर...!", रोहिणी आचार्य वादावरून तेजप्रताप भडकले
Daily Top 2Weekly Top 5

वितरीकाच्या अर्धवट कामामुळे शेतात घुसले पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 04:27 IST

निम्न दुधना प्रकल्पातून रबी हंगामातील पिकांसाठी २ डिसेंबर रोजी दोन्ही कालव्यात पाणी सोडले आहे. डाव्या आणि उजव्या दोन्ही कालव्याच्या ...

निम्न दुधना प्रकल्पातून रबी हंगामातील पिकांसाठी २ डिसेंबर रोजी दोन्ही कालव्यात पाणी सोडले आहे. डाव्या आणि उजव्या दोन्ही कालव्याच्या वितरीका आणि लघु वितरिकांची कामे अर्धवट अवस्थेत आहेत. काही भागात वितरीकेच्या कामासाठी खोदकाम करून अर्धवट सोडले आहे. डाव्या कालव्याच्या ब्रम्हवाकडी शिवारातील वितरीका क्रमांक १ चे केवळ खोदकाम करून ठेवले. कालव्यात पाणी सोडल्यानंतर अनिल रावसाहेब कदम यांच्या शेतात पाणी घुसले आहे. या ठिकाणी कदम यांचे १० एकर शेती आहे. त्यात कापूस, तूर ही पिके उभी आहेत. त्यांच्या ३ एकर शेतात पाणी साचले आहे. त्यामुळे उभ्या पिकांचे नुकसान झाले अशी माहिती शेतकरी कदम यांनी दिली. तसेच या शिवारातील प्रकाश वनवे, मोहन कुलकर्णी, गणेश कोरडे या शेतकऱ्यांच्या शेतात पाणी साचले आहे. दरम्यान, शेतकऱ्यांनी या संदर्भात पाटबंधारे विभागाला माहिती दिल्यानंतर शुक्रवारी दुपारी १२ वाजता जेसीबीच्या साहायाने शेतात येणारे पाणी थांबिण्यात आले.

अधर्वट कामे आणि सफाईकडे दुर्लक्ष

निम्न दुधना प्रकल्पाच्या दोन्ही कालव्याच्या वितरीका आणि लघु वितरिकांची कामे अनेक वर्षांपासून रखडले आहेत. अनेक ठिकाणी खोदकाम करून ठेवले आहे. तर काही ठिकाणी सिमेंट कॅक्रेट करून काम अर्धवट अवस्थेत आहे. दोन्ही कालव्याची अनेक ठिकाणी तुटफुट झाली आहे. तसेच गाळ साचून कालव्यात झुडपे वाढले आहेत. त्यामुळे पाणी सोडण्यापूर्वी दोन्ही कालव्याची आवश्यक त्या ठिकाणी दुरूस्ती, साफसफाई तसेच अधर्वट कामे असलेल्या वितरिकेतून पाणी शेतात घुसणार नाही याची काळजी घेणे आवश्यक होते. मात्र संबंधित विभागाने याकडे दुर्लक्ष केल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले. तसेच पाण्याची नासाडी होत आहे. याकडे पाटबंधारे विभागाने लक्ष देण्याची मागणी होत आहे.