शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात मदत पोहचणार; पुढच्या आठवड्यात घोषणा करू - CM देवेंद्र फडणवीस
2
पाकिस्तान: क्वेट्टा येथे लष्करी मुख्यालयाजवळ आत्मघाती हल्ला; १० ठार, ३२ हून अधिक जखमी
3
"शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून लक्ष हटवण्यासाठी अहिल्यानगरमध्ये सरकार पुरस्कृत दंगल झाली’’ काँग्रेसचा गंभीर आरोप
4
बाबाचे 'चाळे'! इन्स्टिट्यूटमधील महिलांसोबतच स्वामी चैतन्यानंदचे संबंध; मोबाईलमध्ये मिळाले फोटो
5
डोनाल्ड ट्रम्प यांचा विजय, युट्यूब देणार २१७ कोटी रुपये; फेसबुक आणि ट्विटरने किती दिलेले?
6
रामललाच्या अयोध्येत दिसणार रामायणातील आणखी २ व्यक्तिरेखा; ऑक्टोबर अखेरपर्यंत काम पूर्ण!
7
चीनची चौथी सर्वात मोठी कार कंपनी भारतात येणार? Tiggo SUV चा डिझाइन पेटंट दाखल 
8
दागिने घालून जिममध्ये जायची सून, अद्दल घडवण्यासाठी सासूने रचला कट; लोकेशन पाठवलं अन्...
9
Social Viral: मज्जा नि लाईफ! विमान ५ तास लेट; प्रवाशांनी एअरपोर्टवर फेर धरला थेट! 
10
Illegal U Turn : पावती फाडण्यासाठी पोहोचले पोलीस, पण रिकाम्या हातानं परतावं लागलं; कारमध्ये डोकावून बघितलं तर...! नेमकं काय घडलं?
11
टाटा, बाय बाय...! आशिया कपमध्ये हरले, बिल या खेळाडूवर फाडले; दक्षिण आफ्रिकेविरोधातील मालिकेसाठी संघातून बाहेर काढले...
12
देवी बनून 'बाहुबली' साम्राज्य उभारण्याचं स्वप्न; कोट्यवधी लोकांची अब्जावधी डॉलर्सची फसवणूक
13
गेमचेंजर! भारतात सापडला 'व्हाइट गोल्ड'चा खजिना; चीनवरील निर्भरता संपणार, नवी क्रांती घडणार
14
"मी आजपर्यंत एकाही कंत्राटदाराकडून कधी..."; भ्रष्टाचार, इथेनॉलच्या आरोपांवर गडकरींनी सोडलं मौन
15
'शालार्थ आयडी' नंतर आणखी एक शिक्षण घोटाळा ! क्षमता नसताना शाळेत १८ शिक्षकांची नियुक्ती कशाला ?
16
MP Accident: देवदर्शनावरून येताना टूरिस्ट बसनं उडवलं, तिघांचा मृत्यू; सणासुदीच्या दिवशी कुटुंबावर शोककळा
17
"ज्यांना नरकात जायचंय, त्यांनी 'गजवा-ए-हिंद'च्या नावावर..."; योगी आदित्यनाथांचा दंगेखोरांना इशारा
18
TCS Layoffs: 'स्वतःहून राजीनामा द्या किंवा टर्मिनेट व्हा'; टीसीएसमध्ये ३० हजार कर्मचाऱ्यांची कपात? TATA समूहाच्या आयटी कंपनीत भीतीचं वातावारण
19
सूत जुळलं! १२वीच्या विद्यार्थिनीचं शिक्षकावर प्रेम जडलं, लग्न केलं अन् आता पतीसाठी मागतेय सुरक्षा
20
दीपिकाला अनफॉलो केलं? चर्चांवर अखेर फराह खानने सोडलं मौन, म्हणाली, "आम्ही दोघींनी..."

ग्रामीण भागात पाणीटंचाई वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2021 04:17 IST

नटराज रंगमंदिराचे भिजत घोंगडे कायम परभणी : येथील नटराज रंगमंदिर मागच्या सहा वर्षांपासून बंद आहे. या नाट्यगृहाच्या दुरुस्तीसाठी मनपाने ...

नटराज रंगमंदिराचे भिजत घोंगडे कायम

परभणी : येथील नटराज रंगमंदिर मागच्या सहा वर्षांपासून बंद आहे. या नाट्यगृहाच्या दुरुस्तीसाठी मनपाने मध्यंतरी प्रस्ताव पाठविला होता; परंतु त्याचा पाठपुरावा केला नसल्याने नाट्यगृहाची दुरुस्ती रखडली आहे. हे नाट्यगृह सुरू करण्यासाठी मनपा प्रशासनाने पुढाकार घ्यावा, अशी कलावंतांची मागणी आहे.

राष्ट्रीय महामार्गाची जिल्ह्यात दुरवस्था

परभणी : जिल्ह्यातून जाणाऱ्या सर्वच राष्ट्रीय महामार्गांची दुरवस्था झाली आहे. एकाही महामार्गाचे काम अद्यापपर्यंत पूर्ण झालेले नसल्याने वाहनधारकांना कसरत करीत वाहने चालवावी लागत आहेत. कल्याण ते निर्मल या राष्ट्रीय महामार्गाचे काम मानवत रोड ते परभणी आणि वसमत रस्त्यावर असोला पाटी ते झिरो फाट्यापर्यंत रखडले आहे. त्याचप्रमाणे गंगाखेड आणि जिंतूर या दोन्ही रस्त्यांचे काम अद्याप पूर्ण झालेले नाही. त्यामुळे वाहनधारकांची गैरसोय कायम आहे.

बाजारपेठ भागातील रस्त्यांवर खड्डे

परभणी : शहरातील बाजारपेठ भागातील रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. विशेषतः कच्छी बाजारातून नानलपेठकडे जाणारा रस्ता जागोजागी उखडला आहे. आधीच अरुंद असलेल्या या रस्त्यावर खड्डे पडल्याने वाहनधारक त्रस्त आहेत.

लघुविक्रेत्यांना जागा देण्याची मागणी

परभणी : जिल्ह्यातील आठवडी बाजार १५ एप्रिलपर्यंत बंद राहणार असून, या काळात लघुविक्रेत्यांचे मोठे नुकसान होणार आहे. तेव्हा या विक्रेत्यांना शहरात भाजी विक्री करण्यासाठी पर्यायी जागा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी होत आहे.

मूलभूत सुविधांचा नागरी भागात अभाव

परभणी : शहरातील वसाहतींमध्ये मूलभूत सुविधांचा अभाव असल्याने नागरिकांना समस्यांचा सामना करावा लागत आहे. नव्याने वसलेल्या वसाहतीत रस्त्यांबरोबरच वीज आणि पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. मनपा प्रशासनाने मूलभूत सुविधा नागरिकांना उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी होत आहे.

स्टेडियम परिसरात मनपाकडून स्वच्छता

परभणी : जिल्हा स्टेडियम परिसरात महानगरपालिकेच्या कर्मचार्‍यांनी बुधवारी स्वच्छता मोहीम राबवली. झाडांची पाने गळून या भागात मोठ्या प्रमाणात कचरा झाला होता. हा कचरा साफ करण्यात आला आहे.

वाळूअभावी घरकुले रखडली

परभणी : केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध आवास योजनांतर्गत प्रशासनाने घरकुल लाभार्थींना वाळू उपलब्ध करून दिली नाही. खुल्या बाजारात वाळूचे दर वाढलेले असल्याने लाभार्थींनी घरकुलाचे बांधकाम बंद ठेवले आहे. गोरगरिबांच्या घरकुलाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रशासनाने लाभार्थींना वाळू उपलब्ध करून द्यावी, अशी नागरिकांची मागणी आहे.