शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

परभणी जिल्ह्यात ४७० गावांवर पाणीटंचाईचे सावट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2017 00:39 IST

जिल्ह्यातील ४७० गावांवर पाणीटंचाईचे संकट ओढावू शकते, असा अहवाल जिल्हा प्रशासनाने दिला आहे़ त्यामुळे या गावांमध्ये आता टंचाई निवारणाची कामे हाती घेण्याचे नियोजन सुरू करण्यात आले आहे़ जिल्ह्यात यावर्षी सरासरीपेक्षा ३१ टक्के पाऊस कमी झाला आहे़ परिणामी जिल्ह्यावर पाणीटंचाईचे संकट घोंगावत असल्याचे दिसत आहे़

प्रसाद आर्वीकर ।लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : जिल्ह्यातील ४७० गावांवर पाणीटंचाईचे संकट ओढावू शकते, असा अहवाल जिल्हा प्रशासनाने दिला आहे़ त्यामुळे या गावांमध्ये आता टंचाई निवारणाची कामे हाती घेण्याचे नियोजन सुरू करण्यात आले आहे़ जिल्ह्यात यावर्षी सरासरीपेक्षा ३१ टक्के पाऊस कमी झाला आहे़ परिणामी जिल्ह्यावर पाणीटंचाईचे संकट घोंगावत असल्याचे दिसत आहे़मागील वर्षीच्या पावसाळी हंगामात सरासरी एवढा पाऊस पडण्याचे भाकीत वर्तविले असले तरी प्रत्यक्षात पावसाने पाठ फिरविली़ पालम, जिंतूर, पाथरी या तालुक्यांत पावसाचे प्रमाण अत्यल्प राहिले़ परिणामी भूजल पातळीत वाढ झाली नाही़ त्यामुळे आगामी काळात या तालुक्यांना पाणीटंचाईच्या संकटातून जावे लागेल, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे़भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेमार्फत जिल्ह्यातील भूजल पातळीचा आढावा सातत्याने घेतला जाता़े़ झालेले पर्जन्यमान आणि निरीक्षण विहिरींच्या नोंदी यावरून संभाव्य टंचाईग्रस्त गावांची संख्या जाहीर केली जाते़ यावर्षीही भूजल सर्वेक्षण विभागाने जिल्ह्यात केलेल्या निरीक्षणाचा अहवाल घोषित केला आहे़ ज्या गावांमध्ये भूजल पातळीत मोठी घट झाली आहे़ अशा गावांची यादी तयार करण्यात आली असून, जिल्ह्यातील तब्बल ४७० गावांना पाणीटंचाईचा सामना करावा लागेल, असा अहवाल या विभागाने वर्तविला आहे़ त्यामुळे जिल्हा प्रशासनाने ४७० गावे हे संभावित टंचाईग्रस्त गावे म्हणून जाहीर केली आहेत़ भूजल सर्वेक्षण विभागाच्या अहवालानुसार जिल्ह्यातील ४१ गावांमध्ये सद्यस्थितीला पाणीटंचाई आहे़ जानेवारी ते मार्च २०१८ या तीन महिन्यांमध्ये १०६ गावांत पाणीटंचाई निर्माण होवू शकते तर एप्रिल ते जून या तीन महिन्यांत टंचाईग्रस्त गावांच्या संख्येत ३२३ गावांची भर पडण्याची शक्यता आहे़ त्यामुळे ही सर्व गावे संभाव्य पाणीटंचाईग्रस्त असल्याचे प्रशासनाने जाहीर केले आहे़आॅक्टोबर ते डिसेंबर या तीन महिन्यांमध्ये परभणी तालुक्यातील ३, पूर्णा ८ आणि पालम तालुक्यातील सर्वाधिक ३० गावांत टंचाईची परिस्थिती निर्माण झाली आहे़ संभाव्य पाणीटंचाई जानेवारी ते मार्च या काळात पालम तालुक्यातील ४१, पाथरी २७, सेलू १३, परभणी १७ आणि जिंतूर तालुक्यातील ८ अशा १०६ गावांत उद्भवण्याची शक्यता आहे़ तर एप्रिल ते जून या तीन महिन्यांत टंचाईचे संकट आणखी तीव्र होण्याची शक्यता असून, या काळात सेलू तालुक्यातील ६०, जिंतूर ५६, सोनपेठ ४४, गंगाखेड ५६, पूर्णा २२, मानवत ४३ आणि पाथरी तालुक्यातील २२ गावांमध्ये पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे़