शहरं
Join us  
Trending Stories
1
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
2
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
3
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
4
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
5
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
6
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
7
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
8
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
9
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
10
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
11
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
12
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
13
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
14
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
15
दुबई-अबुधाबी फिरण्याचा विचार करताय? आयआरसीटीसीने आणलंय धमाल पैसा वसूल पॅकेज!
16
India’s Squad vs SA Test : पंत इज बॅक! दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीसाठी कुणाला मिळाली संधी?
17
IND A vs SA A : रोहित-विराट दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या 'या' वनडे मालिकेपासून दूरच
18
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला
19
मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या...
20
फक्त २९ पैशांचा शेअर थेट १०० रुपयांवर! १ लाखाच्या गुंतवणुकीतून झाला '३.४४ कोटींचा' नफा

परभणी जिल्ह्यात ४७० गावांवर पाणीटंचाईचे सावट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2017 00:39 IST

जिल्ह्यातील ४७० गावांवर पाणीटंचाईचे संकट ओढावू शकते, असा अहवाल जिल्हा प्रशासनाने दिला आहे़ त्यामुळे या गावांमध्ये आता टंचाई निवारणाची कामे हाती घेण्याचे नियोजन सुरू करण्यात आले आहे़ जिल्ह्यात यावर्षी सरासरीपेक्षा ३१ टक्के पाऊस कमी झाला आहे़ परिणामी जिल्ह्यावर पाणीटंचाईचे संकट घोंगावत असल्याचे दिसत आहे़

प्रसाद आर्वीकर ।लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : जिल्ह्यातील ४७० गावांवर पाणीटंचाईचे संकट ओढावू शकते, असा अहवाल जिल्हा प्रशासनाने दिला आहे़ त्यामुळे या गावांमध्ये आता टंचाई निवारणाची कामे हाती घेण्याचे नियोजन सुरू करण्यात आले आहे़ जिल्ह्यात यावर्षी सरासरीपेक्षा ३१ टक्के पाऊस कमी झाला आहे़ परिणामी जिल्ह्यावर पाणीटंचाईचे संकट घोंगावत असल्याचे दिसत आहे़मागील वर्षीच्या पावसाळी हंगामात सरासरी एवढा पाऊस पडण्याचे भाकीत वर्तविले असले तरी प्रत्यक्षात पावसाने पाठ फिरविली़ पालम, जिंतूर, पाथरी या तालुक्यांत पावसाचे प्रमाण अत्यल्प राहिले़ परिणामी भूजल पातळीत वाढ झाली नाही़ त्यामुळे आगामी काळात या तालुक्यांना पाणीटंचाईच्या संकटातून जावे लागेल, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे़भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेमार्फत जिल्ह्यातील भूजल पातळीचा आढावा सातत्याने घेतला जाता़े़ झालेले पर्जन्यमान आणि निरीक्षण विहिरींच्या नोंदी यावरून संभाव्य टंचाईग्रस्त गावांची संख्या जाहीर केली जाते़ यावर्षीही भूजल सर्वेक्षण विभागाने जिल्ह्यात केलेल्या निरीक्षणाचा अहवाल घोषित केला आहे़ ज्या गावांमध्ये भूजल पातळीत मोठी घट झाली आहे़ अशा गावांची यादी तयार करण्यात आली असून, जिल्ह्यातील तब्बल ४७० गावांना पाणीटंचाईचा सामना करावा लागेल, असा अहवाल या विभागाने वर्तविला आहे़ त्यामुळे जिल्हा प्रशासनाने ४७० गावे हे संभावित टंचाईग्रस्त गावे म्हणून जाहीर केली आहेत़ भूजल सर्वेक्षण विभागाच्या अहवालानुसार जिल्ह्यातील ४१ गावांमध्ये सद्यस्थितीला पाणीटंचाई आहे़ जानेवारी ते मार्च २०१८ या तीन महिन्यांमध्ये १०६ गावांत पाणीटंचाई निर्माण होवू शकते तर एप्रिल ते जून या तीन महिन्यांत टंचाईग्रस्त गावांच्या संख्येत ३२३ गावांची भर पडण्याची शक्यता आहे़ त्यामुळे ही सर्व गावे संभाव्य पाणीटंचाईग्रस्त असल्याचे प्रशासनाने जाहीर केले आहे़आॅक्टोबर ते डिसेंबर या तीन महिन्यांमध्ये परभणी तालुक्यातील ३, पूर्णा ८ आणि पालम तालुक्यातील सर्वाधिक ३० गावांत टंचाईची परिस्थिती निर्माण झाली आहे़ संभाव्य पाणीटंचाई जानेवारी ते मार्च या काळात पालम तालुक्यातील ४१, पाथरी २७, सेलू १३, परभणी १७ आणि जिंतूर तालुक्यातील ८ अशा १०६ गावांत उद्भवण्याची शक्यता आहे़ तर एप्रिल ते जून या तीन महिन्यांत टंचाईचे संकट आणखी तीव्र होण्याची शक्यता असून, या काळात सेलू तालुक्यातील ६०, जिंतूर ५६, सोनपेठ ४४, गंगाखेड ५६, पूर्णा २२, मानवत ४३ आणि पाथरी तालुक्यातील २२ गावांमध्ये पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे़