शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
2
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
3
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
4
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
5
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
6
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
7
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
8
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
9
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
10
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
11
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
12
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
13
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
14
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
15
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
16
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
17
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
18
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
19
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
20
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?

गळतीमुळे रस्त्यावर पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 04:30 IST

कराची वसुली मोठ्या प्रमाणात केली परभणी : शहरातील नागरिकांकडे मोठ्या प्रमाणात कराची थकबाकी आहे. मनपा प्रशासनाने ही थकबाकी वसूल ...

कराची वसुली मोठ्या प्रमाणात केली

परभणी : शहरातील नागरिकांकडे मोठ्या प्रमाणात कराची थकबाकी आहे. मनपा प्रशासनाने ही थकबाकी वसूल करण्यासाठी फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीस पथकांची स्थापना केली होती. मात्र अजूनही कर वसुली फारसा प्रतिसाद मिळत नाही. मागील वर्षापासून करवसुली थकलेली आहे. त्यामुळे महानगरपालिकेसमोर आर्थिक संकट उभे टाकले आहे.

घरकुलांची बांधकामे रखडली

परभणी : जिल्ह्यात मुबलक प्रमाणात वाळू उपलब्ध नसल्याने घरकुलांची बांधकामे रखडली आहेत. खुल्या बाजारपेठेत वाळूचे भाव गगनाला भिडले असून, ही वाळू खरेदी करून घरकुल बांधणे परवडत नसल्याने लाभार्थ्यांनी बांधकाम बंद ठेवले आहे. प्रशासनाने घरकुल लाभार्थ्यांना वाळू उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी होत आहे.

गुटखा विक्रीला लागेना लगाम

परभणी : जिल्ह्यात खुलेआम गुटख्याची विक्री होत असून, पोलीस प्रशासन दररोज कारवाई करीत असले तरी शहरात गुटखा सहज उपलब्ध होत आहे. अन्न व औषध प्रशासनाने यासंदर्भात कडक कारवाई करण्याची गरज निर्माण झाली आहे.

रस्ता उखडल्याने वाहनधारक त्रस्त

परभणी : शहरातील सुपर मार्केट ते वसंतराव नाईक यांचा पुतळा हा रस्ता अनेक ठिकाणी उखडला आहे. ठीक ठिकाणच्या खड्ड्यांमुळे वाहनधारक त्रस्त झाले आहेत. त्यातच मनपाने जलवाहिनीसाठी खड्डे खोदल्यामुळे रस्त्याच्या दुरवस्थेत आणखीच भर पडली आहे. विशेष म्हणजे हा प्रमुख मार्ग असून दररोज शेकडो वाहनधारक या मार्गावर वाहतूक करतात. दुरुस्तीची मागणी होत आहे.

जिल्ह्यात वाढली मास्कची विक्री

परभणी : जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढत असल्या प्रतिबंधात्मक उपाय म्हणून मास्कचा वापर केला जात आहे. शहरातील विविध भागात रस्त्याच्या कडेला थांबून मास्क विक्री केली जात असून नागरिकांकडूनही मात्र चांगलीच मागणी होत आहे.

चारही बाजूचे रस्ते उखडले

परभणी : शहरात येणारे चारही बाजूची रस्ते उखडले असून नागरिक त्रस्त आहेत. परभणी-पाथरी, परभणी-जिंतूर, परभणी-गंगाखेड आणि परभणी- वसमत या चारही रस्त्यांवर खड्डे असल्याने शहरात दाखल होण्यासाठी वाहनधारकांना कसरत करीत प्रवास करावा लागत आहे. महामार्ग प्राधिकरणाने रस्त्याची तातडीने दुरुस्ती करावी, अशी नागरिकांची मागणी आहे.

शहरातील रस्त्यांवर अतिक्रमणे वाढली

परभणी : शहरातील बाजारपेठ भागात सर्वच रस्त्याच्या कडेने मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे झाली आहेत. अतिक्रमणांचा वाहतुकीला त्रास होत असून अतिक्रमण हटविण्याची आवश्‍यकता निर्माण झाली आहे. मनपाने मध्यंतरी अतिक्रमण हटाव मोहीम सुरू केली होती. बाजारपेठेत अतिक्रमणांमुळे वाहतूक विस्कळीत होते. मात्र अतिक्रमणे हटविली जात नाहीत. त्यामुळे वाहतुकीची समस्या कायम आहे.