शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
2
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
3
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
4
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
5
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
6
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
7
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
8
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
9
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
10
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
11
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
12
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
13
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
14
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
15
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
16
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
17
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
18
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
19
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
20
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!

गळतीमुळे रस्त्यावर पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 04:30 IST

कराची वसुली मोठ्या प्रमाणात केली परभणी : शहरातील नागरिकांकडे मोठ्या प्रमाणात कराची थकबाकी आहे. मनपा प्रशासनाने ही थकबाकी वसूल ...

कराची वसुली मोठ्या प्रमाणात केली

परभणी : शहरातील नागरिकांकडे मोठ्या प्रमाणात कराची थकबाकी आहे. मनपा प्रशासनाने ही थकबाकी वसूल करण्यासाठी फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीस पथकांची स्थापना केली होती. मात्र अजूनही कर वसुली फारसा प्रतिसाद मिळत नाही. मागील वर्षापासून करवसुली थकलेली आहे. त्यामुळे महानगरपालिकेसमोर आर्थिक संकट उभे टाकले आहे.

घरकुलांची बांधकामे रखडली

परभणी : जिल्ह्यात मुबलक प्रमाणात वाळू उपलब्ध नसल्याने घरकुलांची बांधकामे रखडली आहेत. खुल्या बाजारपेठेत वाळूचे भाव गगनाला भिडले असून, ही वाळू खरेदी करून घरकुल बांधणे परवडत नसल्याने लाभार्थ्यांनी बांधकाम बंद ठेवले आहे. प्रशासनाने घरकुल लाभार्थ्यांना वाळू उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी होत आहे.

गुटखा विक्रीला लागेना लगाम

परभणी : जिल्ह्यात खुलेआम गुटख्याची विक्री होत असून, पोलीस प्रशासन दररोज कारवाई करीत असले तरी शहरात गुटखा सहज उपलब्ध होत आहे. अन्न व औषध प्रशासनाने यासंदर्भात कडक कारवाई करण्याची गरज निर्माण झाली आहे.

रस्ता उखडल्याने वाहनधारक त्रस्त

परभणी : शहरातील सुपर मार्केट ते वसंतराव नाईक यांचा पुतळा हा रस्ता अनेक ठिकाणी उखडला आहे. ठीक ठिकाणच्या खड्ड्यांमुळे वाहनधारक त्रस्त झाले आहेत. त्यातच मनपाने जलवाहिनीसाठी खड्डे खोदल्यामुळे रस्त्याच्या दुरवस्थेत आणखीच भर पडली आहे. विशेष म्हणजे हा प्रमुख मार्ग असून दररोज शेकडो वाहनधारक या मार्गावर वाहतूक करतात. दुरुस्तीची मागणी होत आहे.

जिल्ह्यात वाढली मास्कची विक्री

परभणी : जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढत असल्या प्रतिबंधात्मक उपाय म्हणून मास्कचा वापर केला जात आहे. शहरातील विविध भागात रस्त्याच्या कडेला थांबून मास्क विक्री केली जात असून नागरिकांकडूनही मात्र चांगलीच मागणी होत आहे.

चारही बाजूचे रस्ते उखडले

परभणी : शहरात येणारे चारही बाजूची रस्ते उखडले असून नागरिक त्रस्त आहेत. परभणी-पाथरी, परभणी-जिंतूर, परभणी-गंगाखेड आणि परभणी- वसमत या चारही रस्त्यांवर खड्डे असल्याने शहरात दाखल होण्यासाठी वाहनधारकांना कसरत करीत प्रवास करावा लागत आहे. महामार्ग प्राधिकरणाने रस्त्याची तातडीने दुरुस्ती करावी, अशी नागरिकांची मागणी आहे.

शहरातील रस्त्यांवर अतिक्रमणे वाढली

परभणी : शहरातील बाजारपेठ भागात सर्वच रस्त्याच्या कडेने मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे झाली आहेत. अतिक्रमणांचा वाहतुकीला त्रास होत असून अतिक्रमण हटविण्याची आवश्‍यकता निर्माण झाली आहे. मनपाने मध्यंतरी अतिक्रमण हटाव मोहीम सुरू केली होती. बाजारपेठेत अतिक्रमणांमुळे वाहतूक विस्कळीत होते. मात्र अतिक्रमणे हटविली जात नाहीत. त्यामुळे वाहतुकीची समस्या कायम आहे.