शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
2
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
3
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
5
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
6
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
7
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
8
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
9
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
10
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
11
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
12
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
13
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
14
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
15
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
16
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
17
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
18
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
19
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
20
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं

दुधना प्रकल्पाच्या पाणी पातळीत दोन दिवसातच ६ दलघमीने वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2020 11:10 IST

सेलू तालुका: जालना जिल्ह्यात पाऊस; मोठा दिलासा

सेलू:- जालना जिल्ह्यात गुरूवारी झालेल्या जोरदार पावसामुळे निम्न दुधना प्रकल्पाच्या जलाशयात  दोन दिवसात तब्बल ६ दलघमी एवढे  पाणी आले आहे. जून महिन्यातच प्रकल्पाच्या पाणी पातळीत वाढ होण्यास सुरुवात झाल्याने परभणी जिल्हासाठी मोठा दिलासा मानला जात आहे.

गतवर्षी अनेक भागात ऑक्टोबर महिन्यात अतिवृष्टी झाली होती. त्यानंतरही निम्न दुधना प्रकल्पाच्या पाणी पातळीत अपेक्षित वाढ झाली नव्हती. परिणामी दुधनेत २० टक्केच पाणीसाठा वाढला होता. बाष्पीभवन आणि  बॅक वाॅटर मधून पिकांसाठी पाण्याचा मोठ्या प्रमाणावर उपसा झाल्याने मार्च महिन्यातच दुधना प्रकल्प मृत साठयात गेला आहे. जालना जिल्ह्यात पाऊस पडल्यानंतर प्रकल्पात पाणी येते. गुरूवारी रात्री बदनापूर तालुक्यात जोरदार पाऊस पडला. त्यामुळे दुधना नदी प्रवाहीत होऊन प्रकल्पात वेगाने पाण्याची  आवक झाली. परतूर तालुक्यातील आणि प्रकल्पाच्या शेजारील रोहिणा पुला खालून पाणी वाहत आहे. गतवर्षी नोंव्हेबर महिन्यात या पुला खालून पाणी येऊन प्रकल्पात पाण्याची वाढ झाली होती. यंदा मात्र जून महिन्यात प्रकल्पात पाण्याची आवक होत असल्याने प्रकल्प पूर्ण क्षमतेने पाणी साठा होण्याची आशा पल्लवित झाल्या आहेत. 

मृतसाठयात एकूण ८२ दलघमी पाणी 

निम्न दुधना प्रकल्पातून सेलू शहर, आठ गाव पाणी पुरवठा योजना तसेच जालना जिल्ह्यातील परतूर, मंठा तसेच इतर पाणी पुरवठा योजनेला पाणी घेतले जाते. टंचाईच्या काळात परभणी, पुर्णा शहरा देखील या पूर्वी नदीपाञात पाणी सोडून तहान भागवली जाते. त्यामुळे दुधनेतील पाणी साठयाकडे सर्वाच्या नजरा असतात. सद्यस्थितीत प्रकल्प मृत साठयात असून ८२ दलघमी पाणी साठा आहे. आणखी २० दलघमी पाणी साठा झाल्यानंतर प्रकल्प मृत साठयातून बाहेर येईल. 

टॅग्स :Rainपाऊसparabhaniपरभणी