शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
5
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
6
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
7
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
8
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
9
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
10
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
11
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
12
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
13
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
14
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
15
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
16
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
17
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
18
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
19
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
20
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."

जायकवाडीच्या डाव्या कालव्यातून पाण्याच्या आवर्तनास सुरूवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2018 13:58 IST

या वर्षीच्या खरीप हंगामात हे दुसरे पाणी आवर्तन असून 3 हजार हेक्टर क्षेत्रावरील पिकासाठी या पाण्याचा फायदा होईल .

पाथरी (परभणी ) : पुरेसा पाऊस न झाल्याने तालुक्यातील पिकांची स्थिती दयनीय आहे. या परिस्थितीमध्ये जायकवाडी धरण्याच्या डाव्या कालव्यातून खरीप पिके तसेच रब्बी पेरणीसाठी संरक्षित पाणी सोडण्यात येत आहे. या वर्षीच्या खरीप हंगामात हे दुसरे पाणी आवर्तन असून 3 हजार हेक्टर क्षेत्रावरील पिकासाठी या पाण्याचा फायदा होईल .

ऐन पावसाळ्याच्या दिवसात तब्बल सव्वामहिना पावसाने या भागात खंड दिला आहे. त्यामुळे खरिपातील पिके शेवटची घटका मोजत आहेत. सोयाबीन जागीच करपले आहे कापूस सुकून जात आहे. रब्बीची पेरणी होईल की नाही अशी अवस्था निर्माण झाली आहे. कापसाला मोठा फटका बसला आहे याचा परिणाम कापूस आणि सोयाबीन च्या उताऱ्यावर जाणवत आहे, सोयाबीन 14 हजार हेक्टर तर कापूस 18 हजार हेक्टर क्षेत्र पुर्णतः शेवटच्या घटका मोजत आहे. 

जायकवाडी धरणाचा डावा कालवा या भागातून जातो. पाथरी उपविभाग अंतर्गत 36 हजार हेक्टर क्षेत्र या कालवा कार्यक्षेत्रातील येते. यावर्षी पाऊस लांबल्याने पिके वाचवण्यासाठी डाव्या कालव्यावर पुर्णतः मदार आहे. रब्बी हंगामातील पेरणी तोंडावर आहे. मात्र पाऊस नसल्याने शेतात ओल नाही त्या मुळे सध्या शेतात रब्बीची पेरणी करता येत नाही. त्यामुळे जायकवाडी धरण्याच्या डाव्या कालव्यातून पाणी सोडण्यात यावे अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत होती. याबाबत आमदार मोहन फड यांनी पाटबंधारे मंत्र्यांकडे पाठपुरावा केला. या पाण्यामुळे कालवा क्षेत्रातील खरीप पिकांना लाभ होणार असून रब्बीच्या पेरणीसाठी दिलासा मिळाला आहे. 

दोन दिवसात वाढ होईलआम्ही 1200 क्युसेक पाण्याची मागणी केली आहे. 26 सप्टेंबरला 700 क्युसेक पाणी सोडण्यात आले असून दोन दिवसात पाण्याच्या विसर्गात वाढ होईल. -  डी.बी. खारकर, उपभियंता, जायकवाडी पाटबंधारे उपविभाग-पाथरी

टॅग्स :Jayakwadi Damजायकवाडी धरणparabhaniपरभणीagricultureशेतीFarmerशेतकरी