शहरं
Join us  
Trending Stories
1
SSC Result 2025: दहावीचा निकाल उद्या जाहीर होणार! विद्यार्थ्यांना कधी आणि कुठे पाहता येणार? जाणून घ्या
2
Video: 'आय लव्ह यू यार... प्लीज उठ जा...'; हुतात्मा सुरेंद्र कुमार यांच्या पत्नीचा मन हेलावून टाकणारा आक्रोश
3
Virat Kohli Test Retirement: 'किंग कोहली'ची कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती; १४ वर्षांचा 'विराट' प्रवास थांबवला!
4
पाकिस्तानवरील कारवाईदरम्यान बंद केलेली ३२ विमानतळं, आता सरकारनं घेतला महत्त्वाचा निर्णय; जाणून घ्या
5
'या' मॉडेलला आता आयुष्यभर जेलमध्ये राहावं लागणार; ग्लॅमरस ते खुनी 'असा' होता प्रवास
6
पाकला पाठिंबा देणाऱ्या चीनला भारताने शिकवला धडा; ड्रॅगनला ५ वर्षे सहन करावा लागणार तोटा
7
Bank of Baroda मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹३२,०४४ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
8
ना कोणी आले, ना गेले! केरळच्या श्री पद्मनाभस्वामी मंदिरात 'चमत्कार'; गायब झालेला सोन्याचा रॉड सापडला
9
किंमत २३९ कोटी रुपये, जगात फक्त ३ लोकांकडे आहे ही कार; कोणती आहे ही गाडी? पाहा डिटेल्स
10
पाकिस्तानच्या प्रत्येक हालचालींवर भारताच्या 'या' 10 डोळ्यांची करडी नजर, ISRO प्रमुखांची माहिती
11
भारताचा 'तो' घाव बरोब्बर वर्मी बसला, पाकिस्तान हडबडला! नूर खान एअरपोर्टवर दडलंय युद्धविरामाचं रहस्य
12
मैत्रिणीच्या मेहंदीला गेला अन्..; प्रसिद्ध अभिनेत्याचं ३४ व्या वर्षी निधन, मनोरंजनविश्वावर शोककळा
13
९०च्या स्पीडने येत होती वंदे भारत, अचानक जोडप्याने घेतली ट्रॅकवर उडी अन्...    
14
India Pakistan War :'तुम्ही पाकिस्तानला संपवा, आम्ही त्यांच्यावर मागून हल्ला करतो'; बलुचिस्तानमधून भारताला संदेश
15
बापरे! गुरुग्राममध्ये एटीएम न फोडता १० लाख रुपये काढले; बँक अन् पोलिसांनाही कळेना
16
अमेरिका आणि चीनमधील टॅरिफ वॉर शमणार? व्हाईट हाऊसने दिली महत्त्वाची माहिती, कुणी घेतली माघार?
17
IPL खेळायला भारतात परतले तर ठीक, नाहीतर...; 'त्या' खेळाडूंविरोधात BCCI घेणार कठोर निर्णय
18
दहशतवाद्यांच्या अंत्ययात्रेत सामील झाले पाकिस्तानचे लष्करी अधिकारी, भारताने नावेच जाहीर केली!
19
सारा तेंडुलकरचा नवा व्हिडिओ व्हायरल; चाहत्यांचं लाजीरवाणं कृत्य, उडवली फिटनेसची खिल्ली
20
Ritual: महत्त्वाच्या कामाला निघताना एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? शास्त्र सांगते...

जायकवाडीच्या डाव्या कालव्यातून पाण्याच्या आवर्तनास सुरूवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2018 13:58 IST

या वर्षीच्या खरीप हंगामात हे दुसरे पाणी आवर्तन असून 3 हजार हेक्टर क्षेत्रावरील पिकासाठी या पाण्याचा फायदा होईल .

पाथरी (परभणी ) : पुरेसा पाऊस न झाल्याने तालुक्यातील पिकांची स्थिती दयनीय आहे. या परिस्थितीमध्ये जायकवाडी धरण्याच्या डाव्या कालव्यातून खरीप पिके तसेच रब्बी पेरणीसाठी संरक्षित पाणी सोडण्यात येत आहे. या वर्षीच्या खरीप हंगामात हे दुसरे पाणी आवर्तन असून 3 हजार हेक्टर क्षेत्रावरील पिकासाठी या पाण्याचा फायदा होईल .

ऐन पावसाळ्याच्या दिवसात तब्बल सव्वामहिना पावसाने या भागात खंड दिला आहे. त्यामुळे खरिपातील पिके शेवटची घटका मोजत आहेत. सोयाबीन जागीच करपले आहे कापूस सुकून जात आहे. रब्बीची पेरणी होईल की नाही अशी अवस्था निर्माण झाली आहे. कापसाला मोठा फटका बसला आहे याचा परिणाम कापूस आणि सोयाबीन च्या उताऱ्यावर जाणवत आहे, सोयाबीन 14 हजार हेक्टर तर कापूस 18 हजार हेक्टर क्षेत्र पुर्णतः शेवटच्या घटका मोजत आहे. 

जायकवाडी धरणाचा डावा कालवा या भागातून जातो. पाथरी उपविभाग अंतर्गत 36 हजार हेक्टर क्षेत्र या कालवा कार्यक्षेत्रातील येते. यावर्षी पाऊस लांबल्याने पिके वाचवण्यासाठी डाव्या कालव्यावर पुर्णतः मदार आहे. रब्बी हंगामातील पेरणी तोंडावर आहे. मात्र पाऊस नसल्याने शेतात ओल नाही त्या मुळे सध्या शेतात रब्बीची पेरणी करता येत नाही. त्यामुळे जायकवाडी धरण्याच्या डाव्या कालव्यातून पाणी सोडण्यात यावे अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत होती. याबाबत आमदार मोहन फड यांनी पाटबंधारे मंत्र्यांकडे पाठपुरावा केला. या पाण्यामुळे कालवा क्षेत्रातील खरीप पिकांना लाभ होणार असून रब्बीच्या पेरणीसाठी दिलासा मिळाला आहे. 

दोन दिवसात वाढ होईलआम्ही 1200 क्युसेक पाण्याची मागणी केली आहे. 26 सप्टेंबरला 700 क्युसेक पाणी सोडण्यात आले असून दोन दिवसात पाण्याच्या विसर्गात वाढ होईल. -  डी.बी. खारकर, उपभियंता, जायकवाडी पाटबंधारे उपविभाग-पाथरी

टॅग्स :Jayakwadi Damजायकवाडी धरणparabhaniपरभणीagricultureशेतीFarmerशेतकरी