शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन राज्यांचे पोलीस होते मागावर, अखेर असे मारले गेले दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणारे हल्लेखोर
2
पाकिस्तानवर कुणी हल्ला केल्यास तर 'हा' इस्लामिक देश थेट युद्धात उतरणार; काय आहे 'डिफेन्स डील'?
3
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
4
आजचे राशीभविष्य- १८ सप्टेंबर २०२५: नोकरी- व्यवसायात अडचणी येतील; अनपेक्षित घटना घडण्याची शक्यता
5
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
6
लोकशाहीचा पाचोळा होऊ नये !... तर लोकशाही केवळ नावापुरती उरेल
7
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
8
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक
9
उपराष्ट्रपतींची निवडणूक : ‘कोऱ्या’ मतपत्रिकांचे रहस्य!
10
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
11
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
12
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
13
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
14
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
15
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
16
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
17
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
18
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
19
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
20
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!

बदल्यांच्या अनियमिततेचा परभणी जिल्हा परिषदेत सपाटा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2018 11:36 IST

जिल्हा परिषदेत वर्षानुवर्षे एकाच जागी ठाण मांडलेल्या कर्मचा-यांच्या तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी सुशील खोडवेकर यांनी केलेल्या बदल्यांचा आदेश अडगळीत टाकून मनमानी पद्धतीने कर्मचा-यांना परस्पर नियुक्त्या देण्याचा सपाटा काही अधिका-यांनी लावल्याची आणखी एक बाब समोर आली आहे़ विशेष म्हणजे जि़प़च्या काही कर्मचा-यांनी ‘लोकमत’कडेच या संदर्भातील माहिती उपलब्ध करून दिली आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : जिल्हा परिषदेत वर्षानुवर्षे एकाच जागी ठाण मांडलेल्या कर्मचाºयांच्या तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी सुशील खोडवेकर यांनी केलेल्या बदल्यांचा आदेश अडगळीत टाकून मनमानी पद्धतीने कर्मचाºयांना परस्पर नियुक्त्या देण्याचा सपाटा काही अधिकाºयांनी लावल्याची आणखी एक बाब समोर आली आहे़ विशेष म्हणजे जि़प़च्या काही कर्मचाºयांनी ‘लोकमत’कडेच या संदर्भातील माहिती उपलब्ध करून दिली आहे़जिल्हा परिषदेचे तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी सुशील खोडवेकर यांनी जून २०१७ मध्ये गेल्या १५ ते २० वर्षांपासून एकाच जागी ठाण मांडून बसलेल्या कर्मचाºयांच्या बदल्या केल्या होत्या़ खोडवेकर यांची बदली झाल्यानंतर तातडीने एकाच जागेचा लळा लागलेल्या या कर्मचाºयांनी मर्जीतील अधिकाºयांना गाठून परस्पर नियुक्त्या केल्याचे वृत्त ‘लोकमत’ने २ फेब्रुवारीच्या अंकात प्रसिद्ध केले होते़ ‘लोकमत’च्या या वृत्तानंतर जवळपास महिनाभरापासून याबाबत चर्चा होत नसल्याने आनंदात असलेल्या अधिकारी-कर्मचाºयांमध्ये खळबळ उडाली़ दुसरीकडे जि़प़तील काही प्रामाणिक कर्मचाºयांनी त्यांच्या मनातील विषय ‘लोकमत’ने मांडल्याने त्यांनी ‘लोकमत’चे जाहीर आभार मानणारे पत्र कार्यालयात आणून दिले़ शिवाय आणखी कोण कोणत्या विभागातील कर्मचाºयांच्या परस्पर बदल्या रद्द करून ते कर्मचारी ‘क्रीम’ जागेवर आले, याबाबतची माहिती ‘लोकमत’कडे दिली़ त्यामध्ये अर्थ, बांधकाम, शिक्षण, मग्रारोहयो विभागातील प्रमुख कर्मचाºयांची नावे आहेत़एका कर्मचाºयाने तर या संदर्भात जि़प़च्या सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी एम़व्ही़ करडखेलकर यांच्या स्वाक्षरीने १६ नोव्हेंबर रोजी काढलेल्या एका आदेशाची प्रतच ‘लोकमत’ला उपलब्ध करून दिली़ त्यामध्ये सामान्य प्रशासन विभागातील कनिष्ठ सहाय्यक एस़व्ही़ जोशी यांच्याकडील भांडार विभागाचा पदभार मग्रारोहयो विभागातील एस़जे़ बेग यांना देण्यासंदर्भातील तर बेग यांच्याकडील मग्रारोहयोचा पदभार जोशी यांच्याकडे सोपविण्यासंदर्भातील आदेश आहेत़ त्यामुळे जि़प़चे अवेळी केलेल्या बदल्यांचे बिंग फुटले आहे़करडखेलकर यांच्या बोलण्यात आली तफावत१ फेब्रुवारी रोजी कर्मचाºयांच्या बदल्यांच्या अनुषंगाने प्रतिक्रियेसाठी उपमुख्य कार्यकारी अधिकारी करडखेलकर यांची सदरील प्रतिनिधीने प्रतिक्रिया घेतली असता त्यावेळी त्यांनी अधिकृतरित्या कोणत्याही कर्मचाºयांच्या सद्यस्थितीत बदल्या केल्या नसल्याचे सांगितले होते़ कामाची गरज म्हणून कोणाला बोलावून घेतले असेल तर माहीत नाही, असे ते म्हणाले होते़ परंतु, कनिष्ठ सहाय्यक जोशी व बेग यांच्या बदलीसंदर्भात त्यांना सोमवारी पुन्हा विचारणा केली असता पूर्वी बदल्या झाल्या नाहीत, अशा त्यांच्या भूमिकेपासून घुमजाव करीत त्यांनी पंचायतराज समितीच्या दौºयाच्या पार्श्वभूमीवर या तात्पुरत्या बदल्यांचे आदेश काढले होते, असे सांगितले़ पंचायतराज समितीचा दौरा होवून दोन महिन्यांचा कालावधी उलटला आहे़ मग या बदल्या आता रद्द का केल्या नाहीत? यावर मात्र त्यांनी प्रतिक्रिया दिली नाही़ त्यामुळे करडखेलकर यांच्या दोन दिवसांमधील बोलण्यात तफावत आल्याचे दिसून येत आहे़