शहरं
Join us  
Trending Stories
1
९ जुलैला भारत बंद, २५ कोटी कामगार संपावर; शाळा, कॉलेज, बँका आणि बाजारासह काय-काय बंद राहणार? जाणून घ्या
2
तिरुपतीला गेलेल्या अहिल्यानगरच्या तिघांचा दुर्वैवी मृत्यू; कार उलटल्याने झाला भीषण अपघात
3
'भारतासह ब्रिक्स देशांना द्यावा लागणार अतिरिक्त १० टक्के कर"; व्यापार करारापूर्वी ट्रम्प यांचे विधान
4
"एक स्पष्ट आदेश... पक्षातील कोणीही..."; मराठीचा मुद्दा गाजत असतानाच राज ठाकरेंची फेसबूक पोस्ट
5
"रेल्वे कर्मचाऱ्याला तमीळ येत नव्हतं, म्हणून दुर्घटना घडली", आता तामिळनाडू रेल्वे-व्हॅन अपघातातही भाषेची एन्ट्री!
6
२ कोटींच्या विम्यासाठी मित्राला गाडीत जिवंत जाळलं; नऊ महिने सुरु होती प्लॅनिंग, पत्नीचाही सहभाग
7
भारताचे INS महेंद्रगिरी शत्रूला पाणी पाजायला तयार! चीन-पाकिस्तानची झोप उडणार, काय आहे यात खास? जाणून थक्क व्हाल!
8
ठाकरे बंधूंची युती होईल का, किती टिकेल? स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वतींची मोठी भविष्यवाणी
9
मराठी शाळा बंद, ५००० शिक्षकाचं आंदोलन, मुख्यमंत्र्यांनी त्याकडे लक्ष द्यावं- सुप्रिया सुळे
10
“ज्येष्ठ कलाकार मनमोहन माहिमकर यांना बेघर होऊ देणार नाही”; DCM एकनाथ शिंदेंनी दिली ग्वाही
11
महाराष्ट्रातील सीईटी कक्षाकडून घेण्यात येणाऱ्या प्रवेश नोंदणीला मुदतवाढ; विद्यार्थी हितासाठी निर्णय!
12
टॉप 10 अब्जाधिशांच्या यादीतून बिल गेट्स बाहेर, संपत्तीत मोठी घसरण
13
कोट्यवधी लोकांना खूशखबर, पीएफच्या खात्यात जमा झाले व्याजाचे पैसे, असा तपासा बॅलन्स
14
१४ वर्षांच्या पोराचा आणखी एक पराक्रम! आता वैभव सूर्यंवशीनं मोडला शुबमन गिलचा विक्रम
15
११ तासांत काय घडलं? अविनाश जाधव यांनी सगळं सांगितलं; अटक, सुटका ते मोर्चाची Inside Story
16
येमेनमध्ये भारतीय नर्स निमिषा प्रियाला फाशीची शिक्षा; न्यायालयाने तारीख ठरवली
17
इतके पैसे कुठून आणता? निशिकांत दुबेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा; मालमत्तांची यादीच शेअर केली
18
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
19
भारतीय क्रिकेटर स्मृती मन्धानाला इंग्लंडमध्ये मिळाला 'लाल गुलाब'; फोटो व्हायरल, रंगली चर्चा
20
गोपाल खेमका हत्याकांडात मोठा गौप्यस्फोट, एका व्यावसायिकानेच दिली होती सुपारी, समोर आलं असं कारण

तिसऱ्या लाटेच्या धास्तीने वाढले लसीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2021 04:13 IST

परभणी : कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता आरोग्य विभागाकडून वर्तविली जात असून, त्याचा परिणाम कोरोना लसीकरणावर झाला आहे. मागच्या ...

परभणी : कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता आरोग्य विभागाकडून वर्तविली जात असून, त्याचा परिणाम कोरोना लसीकरणावर झाला आहे. मागच्या काही दिवसांपासून लसीकरणासाठी नागरिक पुढे येत असून, दररोज सात ते आठ हजार नागरिकांचे लसीकरण जिल्ह्यात होत आहे.

कोरोनावर कोणतेही औषध नाही. लसीकरण हाच पर्याय आहे, याविषयी वारंवार जनजागृती करण्यात आली. मात्र तरीही नागरिक फारसे गांभीर्याने घेत नव्हते. कोरोनाचा संसर्ग कमी झाल्यानंतर तर जिल्ह्यातील लसीकरण केंद्रांवरील गर्दी कमी झाली. शहरातील प्रत्येक केंद्रावर दिलेले प्रत्येकी ५० डोसचेही लसीकरण पूर्ण होत नव्हते. लसीकरणासाठी नागरिक पुढे येत नसल्याने आरोग्य विभागासमोर मोठा पेच निर्माण झाला होता. जास्तीत जास्त नागरिकांनी लसीकरण करावे यासाठी गावा-गावांत लसीकरण शिबिरे आयोजित करण्यात आली. लोकप्रतिनिधी, अधिकाऱ्यांच्या माध्यमातून जनजागृती करून लसीकरण करण्याचे आवाहन करण्यात आले. मात्र तरीही लसीकरणाचा वेग वाढत नव्हता.

मागच्या काही दिवसांपासून कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तविली जात होती. मात्र तरीही नागरिक फारसे लसीकरणासाठी घराबाहेर पडत नव्हते. मात्र राज्यात कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत असल्याने पुन्हा चिंतेचे वातावरण तयार झाले आहे. तिसरी लाट येऊ शकते, याविषयी नागरिकांच्या मनात भीती निर्माण झाली आहे. राज्यातील इतर जिल्ह्यांत डेल्टा प्लस हा कोरोनाचा विषाणू आढळत आहे. त्यामुळे जिल्ह्यातही नागरिकांनी धास्ती घेतली असून, लसीकरणासाठी पुन्हा गर्दी होऊ लागली आहे.

कोरोना संसर्ग ओसरल्यानंतर मे महिन्याच्या शेवटच्या दोन आठवड्यांत रोज केवळ अडीच ते तीन हजार नागरिकांचेच जिल्ह्यात लसीकरण होत होते. ही संख्या आता मागच्या चार दिवसांपासून ८ ते १० हजारांवर पोहोचली आहे. त्यामुळे लसीकरणाचा वेग जिल्ह्यात वाढला असून, शहरी आणि ग्रामीण भागांतही लसीकरणासाठी नागरिक घराबाहेर पडत आहेत.

शुक्रवारी विक्रमी लसीकरण

कोरोनापासून बचाव करण्यासाठी प्रशासन लसीकरणावर भर देत असले तरी कधी लसीच्या तुटवड्यामुळे, तर कधी ऑनलाईन नोंदणीतील अडचणींमुळे लसीकरणाला फारसा प्रतिसाद मिळत नव्हता. आतापर्यंत एका दिवसात सहा ते सात हजार नागरिकांचेच लसीकरण करण्यात प्रशासनाला यश आले. मात्र मागील चार दिवसांत हे लसीकरण मोठ्या प्रमाणात वाढले. शुक्रवारी (दि. २५) एका दिवसात ११ हजार नागरिकांचे लसीकरण झाले. ही संख्या आतापर्यंतच्या लसीकरणातील सर्वाधिक ठरली आहे.

ग्रामीण भागात जनजागृतीवर भर

लसीकरणासाठी नागरिकांनी पुढाकार घ्यावा, यासाठी ग्रामीण भागात लसीकरणावर भर दिला जात आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे हे प्रत्येक गावात जाऊन लसीकरणाचे महत्त्व ग्रामस्थांना पटवून देत आहेत. त्याचप्रमाणे लसीकरणासाठी पुढे येण्याचे आवाहन करीत आहेत. त्याचाही परिणाम लसीकरण वाढण्यासाठी झाला आहे. लसीकरणासाठी नागरिक आता गर्दी करू लागले आहेत.

२३ जून : १०२१४

२४ जून : ८१६८

२५ जून : ११७२१

२६ जून : ९७२०