शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025: मोहसीन नक्वी टीम इंडियाला ट्रॉफी द्यायला झाले तयार, पण आता ठेवली 'ही' एक अट
2
तब्बल २२ वाहने चोरणाऱ्या आंतरराज्य चोरट्याला सांगलीत अटक; १६ लाखांचा मुद्देमाल जप्त
3
चांदी दीड लाख रूपये किलो, सप्टेंबरमध्ये २१,५२७ रुपयांची झेप; सोन्याचीही ११ हजारांची उडी
4
भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार पती-पत्नी जागीच ठार; कोहमारा-वडसा मार्गावरील घटना
5
भाजपा पदाधिकाऱ्याची पत्नीसह ३ ठिकाणी मतदारयादीत नावे, एका दुकानावर २५ नावे- काँग्रेसचा आरोप
6
पंतप्रधान मोदी करणार ‘मुख्यमंत्री अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम’ कार्यक्रमाचे उद्घाटन
7
'या' दिवसापर्यंत गपचूप ट्रॉफी भारताला द्या नाहीतर...; BCCIचे मोहसीन नक्वी यांना 'अल्टीमेटम'
8
दहिसर टोलनाका वाहतूककोंडी दूर करण्यासाठी मंत्री प्रताप सरनाईक यांनी सुचवल्या उपाययोजना
9
१०० वर्षांनी हंस महालक्ष्मी योग: ८ राशींचे कल्याण, कल्पनेपलीकडे लाभ; अपार यश, भरघोस भरभराट!
10
“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट
11
"दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं...!" धनश्री वर्माचा खळबळजनक खुलासा, युजवेंद्र चहलनं लग्नाच्या पहिल्याच वर्षात दिला होता धोका?
12
अंधेरी क्रीडा संकुल महापालिकेने स्वतः उभारावे; गोपाळ शेट्टी यांची पालिका आयुक्तांकडे मागणी
13
"ही सगळी नाटकं, पाकिस्तानसोबत खेळायलाच नको होतं"; भारत-पाक सामन्यावरुन आदित्य ठाकरेंनी सुनावलं
14
भाजप कार्यालय आमच्यासाठी इमारत नाही, मंदिर आहे; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या भावना...
15
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय! आता 'या' उद्योगावर लादला १००% कर; भारताला सर्वाधिक फटका...
16
“दसरा मेळाव्याबाबत सदसद्विवेकबुद्धीला स्मरून निर्णय घ्यावा”; अजित पवारांचा रोख कुणाकडे?
17
१० वर्षांपासून सत्ता असलेल्या राज्यात भाजपाला जबर धक्का, निवडणुकीत मिळाल्या ४० पैकी केवळ ५ जागा   
18
कुठलाही क्रिकेट सामना हे सत्य बदलू शकत नाही; PM मोदींच्या ट्विटवर मोहसीन नक्वींची दर्पोक्ती
19
विघ्नहर्ता बाप्पा संकटात धावला! श्री सिद्धीविनायक मंदिर अतिवृष्टीबाधितांसाठी १० कोटी देणार
20
IND vs PAK Final : "ते स्वतः स्ट्राइकवर येऊन..." PM मोदींसंदर्भात नेमकं काय म्हणाला सूर्यकुमार यादव?

धान्य मिळत नसेल वापरा रेशन दुकान पोर्टेबिलिटी; साडेआठ हजार कार्डधारकांनी घेतला लाभ 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2020 18:26 IST

सार्वनजिनक वितरण प्रणालीअंतर्गत जिल्ह्यातील कार्डधारकांना अल्पदरामध्ये अन्न-धान्याचा पुरवठा केला जातो.

ठळक मुद्देलाभार्थ्यांना रेशनचा पुरवठा व्हावा, या उद्देशाने पोर्टेबिलिटी सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे.या सुविधेअंतर्गत  लाभार्थ्यांना त्यांच्या सोईच्या केंद्रातून अन्न-धान्य उपलब्ध करुन घेण्यात येते.

परभणी:  सार्वजनिक वितरण योजनेंतर्गत धान्य पुरवठा करण्यात तांत्रिक अडचणी आल्याने  राज्य शासनाने पोर्टेबिलिटीचा पर्याय खुला करुन दिला असून नोव्हेंबर अखेर जिल्ह्यातील ८ हजार ६२४ कार्डधारकांनी या सुविधेचा लाभ घेतला आहे. 

सार्वनजिनक वितरण प्रणालीअंतर्गत जिल्ह्यातील कार्डधारकांना अल्पदरामध्ये अन्न-धान्याचा पुरवठा केला जातो. अन्न सुरक्षा योजना, दारिद्र्य रेेषेखालील लाभार्थी अशा गटात वर्गीकरण करुन लाभार्थ्यांना धान्य वितरित केले जाते. आतापर्यंत गहू, तांदुळ, साखर आणि दाळ, तेल आदी खाद्य पदार्थांचा पुरवठा केला जातो.  या प्रक्रियेमध्ये अनेक वेळा रेशन दुकानदारांच्या संदर्भात तक्रारी होतात. वेळेवर दुकान सुरु राहत नाही. संपूर्ण रेशन वितरित होत नाही. या तक्रारींबरोबरच काही ठिकाणी लाभार्थ्यांच्या अडचणी असतात. त्यामध्ये रेशन दुकान घरापासून दूर असणे, एकाच रेशन दुकानावर अनेक लाभार्थी जोडल्याने धान्य प्राप्त करण्यास विलंब लागणे यासह काही लाभार्थ्यांना इतर शहरामध्ये स्थलांतरित व्हावे लागते. अशा वेळी या लाभार्थ्यांना रेशनचा पुरवठा व्हावा, या उद्देशाने पोर्टेबिलिटी सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे.

या सुविधेअंतर्गत  लाभार्थ्यांना त्यांच्या सोईच्या केंद्रातून अन्न-धान्य उपलब्ध करुन घेण्यात येते.  नोव्हेंबर महिन्यात जिल्ह्यात ८ हजार ६२४ लाभार्थ्यांनी या सुविधेचा लाभ घेतला आहे. या लाभार्थ्यांनी ११ हजार ६४ ट्रान्झेंक्शन केले आहेत. परभणी तालुक्यात सर्वाधिक ३ हजार २६७ कार्डधारकांनी पोर्टेबिलिटीचा लाभ घेतला. तर जिंतूर तालुक्यात १ हजार ५३१ आणि सेलू तालुक्यातील १ हजार २०८ कार्डधारकांनी पोर्टेबिलिटी सुविधेचा लाभ घेतला आहे. या सुविधेमुळे कोणत्याही तांत्रिक बाबीवरुन त्या त्या महिन्यात रेशनचा पुरवठा झाला नाही, असे होणार नाही. प्रत्येक लाभार्थ्यांपर्यंत रेशनचे धान्य उपलब्ध होणार असून लाभार्थ्यांची आतापर्यंत होत असलेली गैरसोय दूर झाली आहे. 

या आहेत तक्रारीरेशन दुकानदारांच्या संदर्भात अनेक तक्रारी असतात. त्यामध्ये बहुतांश तक्रारी संपूर्ण रेशनचे वाटप होत नाही. रेशनदुकान बंद राहते, लाभार्थ्यांना त्यांच्या हक्काचे रेशन कमी प्रमाणात दिले जाते. जाणीवपूर्वक यादीतून नाव वगळले जाते. रेशन दुकानदार मनमानी करीत आहे. अशा अनेक स्वरुपाच्या तक्रारी ग्रामीण भागातून पुरवठा विभागाकडे दाखल होतात. 

मोफत धान्यामुळे वाढल्या तक्रारीकोरोनाच्या संकट काळात गोरगरिबांना मोफत तांदुळ व दाळ वितरित करण्यात आली. हे धान्य मिळाले नसल्याच्या तक्रारी त्या काळात होत्या. तसेच सेलू, मानवत आणि जिंतूर या ठिकाणी काळ्या बाजारात जाणारे धान्य पोलिसांनी कारवाई करीत पकडले होते. रेशनच्या धान्यासंदर्भात तक्रारींची संख्या अधिक आहेत. स्वस्तधान्य वितरण प्रणालीअंतर्गत जिल्हा पुरवठा विभागाकडे किती तक्रारी प्राप्त झाल्या. त्यापैकी किती तक्रारींचा निपटारा झाला. तक्रारींचे स्वरुप काय होते, याची माहिती जाणून घेण्यासाठी जिल्हा पुरवठा अधिकारी मंजुषा मुथा संपर्क साधला असता नेहमीप्रमाणे त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे पुरवठा विभागातील तक्रारींच्या अनुषंगाने झालेली कारवाई व इतर माहिती उपलब्ध होऊ शकली नाही. 

तालुकानिहाय लाभार्थीपरभणी    ३२६७गंगाखेड    ७५०जिंतूर    १५३१मानवत     ५४५पालम    २९६पाथरी    ३३२पूर्णा     १८४सेलू    १२०८सोनपेठ    ५११एकूण     ८६२४

३१३११७ - एकूण रेशनकार्डधारक८६२४ - पोर्टेबिलिटीचा लाभ घेतलेले  

टॅग्स :parabhaniपरभणीParabhani collector officeजिल्हाधिकारी कार्यालय परभणी