शहरं
Join us  
Trending Stories
1
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
2
एअर इंडियाने मोठा निर्णय घेतला! वॉशिंग्टन डीसीला जाणारी सर्व विमान उड्डाणे रद्द केली; १ सप्टेंबरपासून...
3
'एका व्यक्तीच्या मूर्खपणामुळे देशाचे नुकसान..; केंद्रीय मंत्री किरेन रिजिजूंचा काँग्रेसवर घणाघात
4
मुंबई: दहीहंडीचा सराव करताना दहिसरमध्ये चिमुरड्या बालगोविंदाचा मृत्यू; कुटुंबावर शोककळा
5
बँका मिनिमम बॅलन्स का ठेवतात? 'या' कारणामुळे तुमच्या खात्यातून कापले जातात पैसे!
6
'भारतात शिक्षण, आरोग्य सामान्य माणसाच्या आवाक्याबाहेर गेलंय'; सरसंघचालक भागवतांनी व्यक्त केली चिंता
7
एअर इंडियामागची पीडा काही संपेना! आता लँडिंगनंतर दरवाजेच उघडले नाही; तासभर अडकून राहिले प्रवासी
8
भाजपाकडून विधानसभा निवडणूक लढवलेला नेता चकमकीत ठार, अनेक गुन्ह्यांत होता वाँटेड
9
देवदर्शनासाठी जाणारी पिकअप १०० ते १५० फूट दरीत; ३० महिला जखमी, तिघांचा मृत्यू, खेड तालुक्यातील घटना
10
बाजारात तेजी परतली! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ, टाटा-SBI सह 'या' शेअर्सचा गुंतवणूकदारांना दिलासा
11
शाब्बास पोरी! देशसेवेचं स्वप्न पाहिलं- सत्यात उतरवलं अन् झाली IAS; हार मानलीच नाही..
12
डोनाल्ड ट्रम्प झाले 'वसुली भाई'; चिप निर्यातीचा लायसन्स देण्यासाठी आता कंपन्यांकडून मागताहेत पैसे
13
Janmashtami 2025: १० ऑगस्ट रोजी सुरू झाली आहे कृष्ण नवरात्र; त्याची सांगता कधी आणि कशी?
14
MS Dhoni: "तुला आयपीएल खेळायचं आहे", चाहत्याची कमेंट, धोनीनं काय उत्तर दिलं? पाहा
15
भटक्या कुत्र्यांना पकडा आणि..., सर्वोच्च न्यायालयाने दिले सक्त आदेश
16
“भाजपा-महायुती लुटेरे, केंद्रात-राज्यात राज्यघटनेच्या विचाराचे सरकार आणू”; काँग्रेसचा एल्गार
17
Janmashtami 2025: पती-पत्नीचे नाते राधा-कृष्णासारखे व्हावे, म्हणून जन्माष्टमीला करा 'हे' वास्तू उपाय!
18
१५० सेवा, ३ कोटी प्रवासी, ७५ हजार कोटींचे उत्पन्न; ‘वंदे भारत’ची महाराष्ट्रात काय स्थिती?
19
मध्य प्रदेशात भीषण अपघात, जीप आणि दुचाकीच्या धडकेत 5 जणांचा जागीच मृत्यू; नेमकं काय घडलं?
20
हत्तीजवळ जाऊन फोटो काढणे भोवले; तरुणाला पायाखाली चिरडले, पाहा धक्कादायक Video...

परभणीत प्लास्टिक कोटेड रस्त्याचा प्रयोग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2019 01:01 IST

काळ्या मातीमुळे वारंवार खचणाऱ्या रस्त्यांवर पर्याय म्हणून तालुक्यातील साडेगाव ते मांगणगाव हा ६.४ कि.मी.अंतराचा रस्ता जिओ टेक्सटाईल मटेरियल वापरुन तयार केला जात आहे. अशा पद्धतीने प्लास्टिक कोटेड रस्ता तयार करण्याची राज्यातील पहिलीच वेळ आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी: काळ्या मातीमुळे वारंवार खचणाऱ्या रस्त्यांवर पर्याय म्हणून तालुक्यातील साडेगाव ते मांगणगाव हा ६.४ कि.मी.अंतराचा रस्ता जिओ टेक्सटाईल मटेरियल वापरुन तयार केला जात आहे. अशा पद्धतीने प्लास्टिक कोटेड रस्ता तयार करण्याची राज्यातील पहिलीच वेळ आहे.साडेगाव ते मांगणगाव या भागातील जमीन काळ्या मातीची आहे. परिसरातून कालवा गेला असल्याने डांबरी रस्ता तयार केल्यानंतर पाण्यामुळे काही काळातच हा रस्ता खड्डेमय होतो, अनेक ठिकाणी खचला जातो. वारंवार रस्ता करुनही गावांसाठी चांगला रस्ता उपलब्ध होत नसल्याने ग्रामस्थांची मोठी अडचण होत होती. यावर पर्याय काढण्यासाठी प्लास्टिक कोटेडच्या सहाय्याने रस्ता तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला. ग्रामीण भागामध्ये प्रथमच हे तंत्रज्ञान वापरुन रस्त्याची निर्मिती केली जात आहे. पंतप्रधान ग्राम सडक विभागातील रिसर्च अ‍ॅण्ड डेव्हलपमेंट या शाखेच्या वतीने हा रस्ता तयार केला जात आहे. मंगळवारी आ. राहुल पाटील यांनी रस्त्याची पाहणी केली. मांगणगाव ते साडेगाव या ६.४ अंतरासाठी ४.९८ कोटी रुपयांचा खर्च केला जाणार आहे. प्लास्टिक कोटेडचे नवीन तंत्रज्ञान वापरुन रस्ता बनविल्यानंतर तो खचणार नाही आणि अधिक काळापर्यंत रस्त्याचे आयुष्यमान वाढेल, अशी आशा व्यक्त होत आहे.या रस्त्याचा प्रश्न कायमस्वरुपी मार्गी लागणार असल्याने ग्रामस्थांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. साडेगाव ते परभणी हे ३० कि.मी.चे अंतर असून नागरिकांना परभणी येथे वळसा घालून यावे लागत असे. साडेगाव ते मांगणगाव रस्त्याचे काम पूर्ण होणार असल्याने हे अंतर १७ कि.मी.पर्यंत कमी होणार आहे.असा होणार रस्ता४साडेगाव ते मांगणगाव हा रस्ता प्लास्टिक कोटेडच्या सहाय्याने तयार केला जात आहे. सुरुवातीला मुरुमाचा थर टाकला जात असून त्यावर जिओ टेक्सटाईल मटेरियल वापरले जात आहे. या मटेरियलवर पुन्हा मुरुमाचा थर नंतर गिट्टीचे दोन थर आणि त्यानंतर डांबरीकरण केले जाणार आहे. ४५ से.मी.पर्यंत जाडीचा हा रस्ता होणार असल्याची माहिती अभियंता सचिन पडुळे यांनी दिली.४कचºयातून निघणाºया प्लास्टिकचा वापर तांत्रिक प्रक्रिया करून या कामासाठी वापर केला जातो. प्लास्टिक कचºयापासून बनलेल्या रस्त्यात पाणी कमी प्रमाणात झिरपते. या विभागाचे तज्ज्ञ सतीश शुक्ला यांच्या मतानुसार, तांत्रिक प्रक्रिया केलेला प्लास्टिकचा कचरा हा उत्कृष्ट राहिलेला आहे. या तंत्रज्ञानात प्लास्टिकबरोबर गिट्टीचा चुरा मिसळला जातो. ज्यामुळे रस्त्यावर एक विशिष्ट प्रकारचा लेअर तयार होतो. ज्यामुळे पाणी रस्त्यावर थांबू देत नाही. पाणी मुरत नसल्यामुळे या रस्त्याचे आयुर्मानही वाढते.

टॅग्स :parabhaniपरभणी