शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
3
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
4
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
5
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
6
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
7
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
8
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
9
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
10
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
11
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
12
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
13
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
14
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
15
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
16
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
17
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
18
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
19
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली
20
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार

चालत्या दुचाकीवर रिल बनवताना झालेल्या अपघातात दाेघा शाळकरी विद्यार्थ्यांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2023 06:35 IST

लातूरला उपचार घेणाऱ्या स्वप्निलचा शुक्रवारी सकाळी मृत्यू झाला. त्यामुळे डाकूपिंप्री गावावर शोककळा पसरली आहे. 

पाथरी (जि. परभणी) :

प्रजासत्ताक  दिनानिमित्त गुरुवारी सकाळी ध्वजारोहणासाठी दुचाकीवरून जाताना रिल बनवत असताना  त्यांच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने झालेल्या अपघातात चार शाळकरी विद्यार्थी गंभीर जखमी झाले. त्यापैकी दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही दुर्घटना पाथरी तालुक्यातील डाकूपिंप्री येथे घडली. 

या अपघातात गंभीर जखमी झालेल्या स्वप्निल ज्ञानेश्वर चव्हाण, राहुल महादू तिथे, योगानंद कैलास घुगे, शंतनू सोनवने या  चारही  विद्यार्थ्यांना उपचारासाठी अंबाजोगाईला आणण्यात आले होते. त्यातील स्वप्निल चव्हाण या विद्यार्थ्याची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यास तातडीने लातूरला हलविले होते.  अंबाजोगाईत उपचार घेणाऱ्या शंतनू कांचन सोनवणे याचा गुरुवारी सायंकाळी मृत्यू झाला.

हात रस्त्यावर तुटुन पडला पाथरी तालुक्यातील डाकूपिंप्री येथील इयत्ता नववीतील चार विद्यार्थी सकाळी साडेसहाच्या सुमारास दुचाकीवरून कानसूर फाटा येथील हायस्कूलमध्ये ध्वजारोहणासाठी निघाले होते. डाकूपिंप्री ते कानसूर  फाटा येथून जाताना शाळेच्या अगदी जवळ काही अंतरावर दुचाकीवरून हे विद्यार्थी आपल्या मोबाइलमध्ये व्हिडीओ रिल बनवत होते. त्यांचा व्हिडीओ  मोबाइलमध्ये कैद झाला. मात्र, काही वेळात त्यांच्या  दुचाकीला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने गंभीर अपघात झाला. यात एका विद्यार्थ्याचा हात अक्षरशः रस्त्यावर तुटून पडला होता.

लातूरला उपचार घेणाऱ्या स्वप्निलचा शुक्रवारी सकाळी मृत्यू झाला. त्यामुळे डाकूपिंप्री गावावर शोककळा पसरली आहे. 

टॅग्स :Accidentअपघात