शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

दोन सख्या चुलत भावांवर काळाचा घाला; आरखेड गावात पेटल्या नाहीत चुली

By ज्ञानेश्वर भाले | Updated: May 2, 2023 18:26 IST

पालम तालुक्यातील आरखेड गावावर शोककळा; एकाचा पाण्यात बुडून, दुसऱ्याचा अपघाती मृत्यू

पालम (जि. परभणी) : आधीच एकाचे मातृछत्र, तर दुसऱ्याचे पितृछत्र हरवलेल्या दोन सख्या चुलत भावांवर काळ कोपला. दोन दिवसांच्या अंतराने या दोन भावांचा मृत्यू झाला असून, सदर घटनेमुळे पालम तालुक्यातील आरखेड गावावर शोककळा पसरली आहे. पहिली घटना ३० एप्रिलला, तर दुसरी घटना १ मे ला घडली. त्यात एकाचा पाण्यात बुडून, तर दुसऱ्याचा अपघाताने मृत्यू झाला.

आरखेड येथील राजकुमार तुकाराम दुधाटे (३०) यांचा पहिल्या घटनेत मृत्यू झाला. ते २८ एप्रिलला सकाळी पोहण्यासाठी गावालगत गोदावरी नदीत गेले होते. पाण्याचा अंदाज न आल्याने ते नदीत बुडाले. दरम्यान, दोन दिवस ग्रामस्थांनी त्यांचा शोध घेतला. तरीही ते सापडले नव्हते. त्यानंतर ३० एप्रिलला गोळेगाव शिवारातील गोदावरी नदीत त्यांचा मृतदेह आढळला. त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कारासाठी चुलत भाऊ नितीन मारोतराव दुधाटे (२७) उपस्थित होते. त्यालाही दोन दिवसानंतर काळाने गाठले. त्यांचा अपघात नांदेडवरून पालमकडे येत असताना सोमवारी (ता. १) रात्री ९:०० वाजता झाला. दिवसभराचे कामकाज आटोपून दुचाकीने ते पालमकडे निघाले होते. त्यांच्या दुचाकीला पालमकडून भरधाव वेगात येणाऱ्या एका ऑटोची धडक बसली. त्यात नितीन दुधाटे यांचा जागीच मृत्यू झाला. ते नांदेड जिल्ह्यात पशुवैद्यकीय दवाखान्यात नोकरीस होते. एकाच घरातील दोन्ही कर्ते पुरूष गेल्याने दुधाटे कुटुंबीयांवर काळ रुसला.

आरखेड गावात पेटल्या नाहीत चुलीराजकुमार दुधाटे यांच्या पश्चात आई - वडील, पत्नी, तीन मुली आणि एक बहीण असा परिवार आहे. त्यातील एका मुलीचे वय दीड वर्षदेखील नाही. दुसरीकडे नितीन दुधाटे यांच्या पश्चात आई, पत्नी आणि एक बहीण असा परिवार आहे. घरात एकही कर्ता पुरूष नाही. शिवाय, नितीन दुधाटे यांच्या विवाहाला दोन वर्षेही झाली नाहीत. त्यांच्या पार्थिवावर मंगळवारी (ता. २) दुपारी १२:०० वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले. सदर घटनेमुळे आरखेड गावात चुलीच पेटल्या नव्हत्या.

 

टॅग्स :parabhaniपरभणीAccidentअपघात