शहरं
Join us  
Trending Stories
1
स्टार फुटबॉलर लिओ मेस्सी पोहोचला 'वनतारा'मध्ये; केली महाआरती, वन्य प्राण्यांमध्येही रमला!
2
मेस्सीची 'वनतारा भेट'! महाआरती, शिवाभिषेक, बाप्पाचरणी नतमस्तक अन् वाघ-सिंहाशी धमाल (Photos)
3
IPL 2026 Auction: पृथ्वी शॉने लिलाव सुरू असताना केलेली मोठी चूक, नंतर करावं लागलं 'हे' काम
4
नागपुरात भाजपमध्ये उमेदवारीसाठी तोबा गर्दी, मुलाखतीच्या वेळापत्रकात करावा लागला बदल
5
VIDEO : अनसोल्ड परदेशी खेळाडूसाठी काव्या मारननं पर्समधून १३ कोटी काढले; संजीव गोएंका बघतच राहिले!
6
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
7
पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दोन वेळा 'अनसोल्ड' राहिल्यावर शेवटी जुन्या मालकानेच दाखवला भरवसा
8
स्मृतिभ्रंशाने त्रस्त असलेल्या महिलेचा क्रिकेटपटू सलीम दुराणी यांची पत्नी असल्याचा दावा
9
"पंतप्रधान मोदींना दोन गोष्टींचा अत्यंत तिरस्कार, एक गांधींचे विचार अन् दुसरे...!"; राहुल गांधींचा हल्लाबोल
10
पतसंस्था अध्यक्षाला ग्राहक आयोगाने सुनावली दोन वर्षांच्या कारावास, दंडाची शिक्षा
11
विरार हत्याकांड प्रकरण: कुख्यात गुंड सुभाषसिंह ठाकूर याला ७ दिवसांची पोलीस कोठडी
12
मुंबईकर सरफराज खानला मोठा दिलासा! IPL च्या आगामी हंगामात पगारवाढीसह चेन्नईकडून उतरणार मैदानात
13
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
14
IPL Auction 2026 : काव्या मारन vs आकाश अंबानी यांच्यात जुगलबंदी; त्यात अनकॅप्ड खेळाडू झाला 'करोडपती'
15
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
16
IPL 2026 Auction: 'त्या' खेळाडूविषयी मनात आदरच..; आकाश अंबानींनी सांगितली पडद्यामागची गोष्ट
17
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
18
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
19
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
Daily Top 2Weekly Top 5

परभणी जिल्ह्यातील आदिवासी समाज शासन दरबारी बेदखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2017 23:47 IST

राज्य शासन एकीकडे आदिवासींचे जीवनमान उंचावण्यासाठी स्वतंत्र मंत्रालयाच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च करीत असताना दुसरीकडे परभणी जिल्ह्यातील आदिवासी समाज मात्र बेदखल असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. जिल्हाभरात तब्बल ९६ हजार ५०० लोकसंख्या असलेल्या या समाजाच्या योजनांसाठी तुटपुंजी तरतूद करण्यात येत असल्याने या समाजासाठींच्या बहुतांश योजना जिल्ह्यात राबविल्याच गेल्या नाहीत.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : राज्य शासन एकीकडे आदिवासींचे जीवनमान उंचावण्यासाठी स्वतंत्र मंत्रालयाच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च करीत असताना दुसरीकडे परभणी जिल्ह्यातील आदिवासी समाज मात्र बेदखल असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. जिल्हाभरात तब्बल ९६ हजार ५०० लोकसंख्या असलेल्या या समाजाच्या योजनांसाठी तुटपुंजी तरतूद करण्यात येत असल्याने या समाजासाठींच्या बहुतांश योजना जिल्ह्यात राबविल्याच गेल्या नाहीत.आदिवासी कल्याण मंत्रालयाच्या माध्यमातून राज्यभरात आदिवासी समाज बांधवांसाठी मोठ्या प्रमाणात योजना राबविल्या जातात. यासाठी कोट्यवधी रुपयांच्या योजनांची तरतूद करण्यात आली आहे. परभणी जिल्ह्यातही जवळपास ९६ हजार ५०० आदिवासींची लोकसंख्या आहे. जिल्ह्यातील ३५ गावे हे १०० टक्के आदिवासींची आहेत. जिंतूर, पालम, पाथरी या भागात आदिवासींची अधिक लोकसंख्या आहे. त्यामुळे या आदिवासी समाज बांधवांकरीता राज्यातील इतर ठिकाणांप्रमाणे निधी उपलब्ध करुन देणे आवश्यक असताना वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी, राजकीय नेत्यांच्या दुर्लक्षामुळे या संदर्भातील निधींची तरतूद म्हणावी त्या प्रमाणे उपलब्ध होऊ शकली नाही. परभणीपासून वेगळा झालेल्या हिंगोली जिल्ह्यात आदिवासींची १ लाख ११ हजार लोकसंख्या आहे. परंतु, तेथील जागरुक लोकप्रतिनिधींनी आदिवासींच्या योजनांसाठी आवश्यक असलेले सिलींग लिमिट मुंबईत वजन खर्ची करुन वाढवून घेतले. त्यामुळे हिंगोली जिल्ह्याला आदिवासी उपयोजना क्षेत्राबाहेरील योजनेअंतर्गत तब्बल २५ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाला. त्याच तुुलनेत परभणी जिल्ह्यात आदिवासींची ९६ हजार ५०० लोकसंख्या असताना फक्त २ कोटी ५५ लाख रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे. या त्रोटक निधीतून विकासकामांसाठी पैसेच राहत नाहीत. त्यामुळे जिल्ह्यामध्ये सद्यस्थितीत आदिवासी वस्ती विकासासाठी निधीही मिळत नाही. ही बाब शुक्रवारी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत झालेल्या चर्चेत समोर आली. या बैठकीत सिलींग लिमिट वाढवून घेण्याचा ठराव घेण्याविषयी सूचना आली. त्यानुसार ठरावही घेण्यात आला. या विषयीच्या चर्चेत यापूर्वीच ठराव वाढवून घेतला असता तर जवळपास २० कोटी रुपयांचा निधी आदिवासी समाज बांधवांच्या विकासकामांसाठी उपलब्ध झाला असता, अशी बाब निदर्शनास आली. त्यामुळे आता घेतलेल्या ठरावाची तातडीने अंमलबजावणी कशी होईल, यासाठी पालकमंत्री गुलाबराव पाटील व जिल्ह्यतील इतर लोकप्रतिनिधींनी पाठपुरावा करणे गरजेचे आहे.