शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
3
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
4
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
5
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
6
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
7
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
8
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
9
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
10
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
11
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
12
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
13
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
14
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
15
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
16
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
17
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
18
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
19
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
20
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम

परभणी जिल्ह्यातील आदिवासी समाज शासन दरबारी बेदखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2017 23:47 IST

राज्य शासन एकीकडे आदिवासींचे जीवनमान उंचावण्यासाठी स्वतंत्र मंत्रालयाच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च करीत असताना दुसरीकडे परभणी जिल्ह्यातील आदिवासी समाज मात्र बेदखल असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. जिल्हाभरात तब्बल ९६ हजार ५०० लोकसंख्या असलेल्या या समाजाच्या योजनांसाठी तुटपुंजी तरतूद करण्यात येत असल्याने या समाजासाठींच्या बहुतांश योजना जिल्ह्यात राबविल्याच गेल्या नाहीत.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : राज्य शासन एकीकडे आदिवासींचे जीवनमान उंचावण्यासाठी स्वतंत्र मंत्रालयाच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च करीत असताना दुसरीकडे परभणी जिल्ह्यातील आदिवासी समाज मात्र बेदखल असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. जिल्हाभरात तब्बल ९६ हजार ५०० लोकसंख्या असलेल्या या समाजाच्या योजनांसाठी तुटपुंजी तरतूद करण्यात येत असल्याने या समाजासाठींच्या बहुतांश योजना जिल्ह्यात राबविल्याच गेल्या नाहीत.आदिवासी कल्याण मंत्रालयाच्या माध्यमातून राज्यभरात आदिवासी समाज बांधवांसाठी मोठ्या प्रमाणात योजना राबविल्या जातात. यासाठी कोट्यवधी रुपयांच्या योजनांची तरतूद करण्यात आली आहे. परभणी जिल्ह्यातही जवळपास ९६ हजार ५०० आदिवासींची लोकसंख्या आहे. जिल्ह्यातील ३५ गावे हे १०० टक्के आदिवासींची आहेत. जिंतूर, पालम, पाथरी या भागात आदिवासींची अधिक लोकसंख्या आहे. त्यामुळे या आदिवासी समाज बांधवांकरीता राज्यातील इतर ठिकाणांप्रमाणे निधी उपलब्ध करुन देणे आवश्यक असताना वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी, राजकीय नेत्यांच्या दुर्लक्षामुळे या संदर्भातील निधींची तरतूद म्हणावी त्या प्रमाणे उपलब्ध होऊ शकली नाही. परभणीपासून वेगळा झालेल्या हिंगोली जिल्ह्यात आदिवासींची १ लाख ११ हजार लोकसंख्या आहे. परंतु, तेथील जागरुक लोकप्रतिनिधींनी आदिवासींच्या योजनांसाठी आवश्यक असलेले सिलींग लिमिट मुंबईत वजन खर्ची करुन वाढवून घेतले. त्यामुळे हिंगोली जिल्ह्याला आदिवासी उपयोजना क्षेत्राबाहेरील योजनेअंतर्गत तब्बल २५ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाला. त्याच तुुलनेत परभणी जिल्ह्यात आदिवासींची ९६ हजार ५०० लोकसंख्या असताना फक्त २ कोटी ५५ लाख रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे. या त्रोटक निधीतून विकासकामांसाठी पैसेच राहत नाहीत. त्यामुळे जिल्ह्यामध्ये सद्यस्थितीत आदिवासी वस्ती विकासासाठी निधीही मिळत नाही. ही बाब शुक्रवारी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत झालेल्या चर्चेत समोर आली. या बैठकीत सिलींग लिमिट वाढवून घेण्याचा ठराव घेण्याविषयी सूचना आली. त्यानुसार ठरावही घेण्यात आला. या विषयीच्या चर्चेत यापूर्वीच ठराव वाढवून घेतला असता तर जवळपास २० कोटी रुपयांचा निधी आदिवासी समाज बांधवांच्या विकासकामांसाठी उपलब्ध झाला असता, अशी बाब निदर्शनास आली. त्यामुळे आता घेतलेल्या ठरावाची तातडीने अंमलबजावणी कशी होईल, यासाठी पालकमंत्री गुलाबराव पाटील व जिल्ह्यतील इतर लोकप्रतिनिधींनी पाठपुरावा करणे गरजेचे आहे.