शहरं
Join us  
Trending Stories
1
जोधपूरमध्ये भीषण अपघात, टेम्पो ट्रॅव्हलर उभ्या असलेल्या ट्रकला धडकला, १५ जणांचा मृत्यू
2
धक्कादायक! बंगालमध्ये सातवीत शिकणाऱ्या मुलीवर सामुहिक अत्याचार; तिघांना अटक
3
निवडणुकांमुळे हिवाळी अधिवेशन दहा दिवस पुढे ढकलले जाणार ? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
4
Womens World Cup Final:'वाइल्ड कार्ड' एन्ट्रीसह आली अन् बॅटिंगनंतर बॉलिंगमध्येही 'ट्रम्प कार्ड' ठरली (VIDEO)
5
महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्षपद अजित पवारांकडेच; चौथ्यांदा मिळवली जबाबदारी
6
IND vs SA Womens World Cup 2025 Final : ...अन् अमनजोतच्या 'रॉकेट थ्रो'सह मिळाला मोठा दिलासा (VIDEO)
7
शफालीसह दीप्तीचं अर्धशतक! दक्षिण आफ्रिकेसमोर टीम इंडियानं सेट केलं २९९ धावांचे टार्गेट
8
मोठे आश्वासन देऊ नका; 10-20%..; अमेरिकन टॅरिफबाबत रघुराम राजन यांचा इशारा
9
वर्ल्ड कप फायनलमध्ये 'लेडी सेहवाग'चा विक्रमी धमाका! धोनी-गंभीरला मागे टाकण्याचीही होती संधी, पण...
10
पाकिस्तान करतोय हल्ले, भारतानं पाठवली 'अनमोल' मदत...; दिल्लीच्या निर्णयानं अफगाणिस्तानचं मन जिंकलं, मुनीरला मिरची लागणार!
11
2026 मध्ये किती रुपयांपर्यंत जाऊ शकतं सोनं? जाणून थक्क व्हाल! आता ₹10 हजारनं स्वस्त मिळतंय, एक्सपर्ट म्हणतायत चांगली संधी
12
Fact Check: आधार कार्ड दाखवून फुकटात मिळतेय बाईक? मोदींचा व्हिडीओ व्हायरल! सत्य समोर!
13
मेक्सिकोच्या सुपरमार्केटमध्ये भीषण स्फोट, २३ जणांचा मृत्यू; नेमके काय घडले?
14
IND W vs SA W Final : वनडे 'क्वीन' स्मृतीनं रचला इतिहास! मितालीचा विक्रम मोडत ठरली 'नंबर वन'
15
शत्रूच्या हालचालींवर भारताची करडी नजर! ISRO ने लॉन्च केले नौदलाचे सर्वात शक्तिशाली सॅटेलाईट
16
'दहशतवादी हल्ल्याचा कट अमेरिकेने रचला, पाकिस्तानने घडवून आणला'; शेख हसीना यांनी मौन सोडले
17
अभिषेक शर्माचा मोठा कारनामा! हिटमॅन रोहितसह गब्बरचा विक्रम मोडत रचला नवा इतिहास
18
"राज ठाकरे हे फेक नॅरेटीव्हच्या बाबतीत राहुल गांधींशी स्पर्धा करत आहेत का?", भाजपाचा सवाल
19
'ऑपरेशन सिंदूरद्वारे विस्फोट पाकिस्तानात, अन् झोप उडाली काँग्रेसची', पीएम मोदींचा घणाघात...
20
IND vs AUS : वॉशिंग्टनची अति 'सुंदर' बॅटिंग! विक्रमी विजयासह टीम इंडियानं केली ऑस्ट्रेलियाची बरोबरी

मानवतमध्ये रेल्वे सिग्नल यंत्रणेत बिघाडाने वाहतूक खोळंबली; वारंवारच्या बिघाडाने प्रवासी संतप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2020 13:42 IST

सिग्लन यंत्रणेतील बिघाडाची तीन दिवसांतील दुसरी वेळ

ठळक मुद्देमराठवाडा एक्स्प्रेस पाऊणतास थांबलीरेल्वे फाटकावर वाहनांच्या रांगा

मानवत (जि. परभणी) : तालुक्यातील मानवत रोड रेल्वे स्थानकावर रविवारी सकाळी ८ वाजेच्या सुमारास सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्याने तब्बल पाऊणतास धर्माबाद- मनमाड मराठवाडा एक्स्प्रेस स्थानकाबाहेरच थांबविण्यात आली. तीन दिवसांमध्ये सिग्नल यंत्रणेत बिघाड होण्याची ही दुसरी घटना आहे. वारंवार सिग्नल यंत्रणेत बिघाड होत असल्याने प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.

मानवत शहरापासून ८ कि.मी. आणि पाथरी शहरापासून १५ कि.मी. अंतरावर असलेल्या मानवत रोड रेल्वे स्थानकाचा वापर दोन्ही तालुक्यातील प्रवाशांना होतो. दररोज हजारो प्रवासी या स्थानकावरुन प्रवास करतात. मात्र मागील तीन दिवसांपासून सिग्नल यंत्रणेत बिघाड होण्याचे प्रकार वारंवार घडत असल्याने प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. परभणीहून निघालेली धर्माबाद-मनमाड रेल्वे मानवत रोड रेल्वेस्थानकाजवळ आली. बिघाड झाल्याने स्थानकापासून ५०० मीटर अंतरावर सिग्नलच्या बाहेर ही गाडी थांबवावी लागली. सिग्नल यंत्रणेतील बिघाड दुरुस्त करण्यासाठी ४५ मिनिटे लागला. त्याचा फटका प्रवाशांना सहन करावा लागला. अगोदरच एक तास उशिराने धावत असलेली मराठवाडा एक्सप्रेस मानवत रोड रेल्वे स्थानकावरून ४५ मिनिटे उशिराने पुढील प्रवासाला निघाली. तीन दिवसांपूर्वीही नांदेड-दौंड या  रेल्वेतील प्रवाशांनाही  बिघाडाचा सामना करावा लागला.

उड्डाण पुलाचे काम संथ गतीने : राष्ट्रीय महामार्गावर मानवत-परभणी दरम्यान बायपास मार्ग तयार केला जात आहे. या मार्गामुळे परभणीचे अंतर २ ते अडीच कि.मी.ने कमी होणार आहे. मात्र उड्डाण पुलाचे काम संथ गतीने सुरू असल्याने वाहनचालक मानवत रोडकडून प्रवास करतात. या मार्गावरील रेल्वे फाटक दिवसभरात ३५ ते ४० वेळा बंद राहते. त्यामुळे रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या रांगा लागत आहेत. त्यामुळे उड्डाणपुलाचे काम गतीने पूर्ण करावे, अशी मागणी होत आहे. 

रेल्वे फाटकही एक तास बंदयंत्रणेत बिघाड झाल्याने राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६१ वरील रेल्वे फाटक बिघाड दुरुस्त होईपर्यत बंद ठेवले जाते. त्यामुळे वाहनचालकांंना फाटकावर ताटकळत थांबावे लागते. येथील रेल्वे फाटकाचे कनेक्शन सिग्नल यंत्रणेशी असल्याने मानवत स्थानकावरून आलेली रेल्वे पुढील स्थानकाकडे निघाल्यास रेल्वे स्थानकापासून ५०० मीटर अंतराच्या पुढे गेल्यानंतर फाटक आपोआप उघडते. मात्र बिघाडाच्या काळात हे फाटक बंद राहत असल्याने त्याचा फटका रेल्वे प्रवाशांसह राष्ट्रीय माहामार्गावरील प्रवाशांनाही सहन करावा लागत आहे.

टॅग्स :railwayरेल्वेparabhaniपरभणीpassengerप्रवासी