शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

मानवतमध्ये रेल्वे सिग्नल यंत्रणेत बिघाडाने वाहतूक खोळंबली; वारंवारच्या बिघाडाने प्रवासी संतप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2020 13:42 IST

सिग्लन यंत्रणेतील बिघाडाची तीन दिवसांतील दुसरी वेळ

ठळक मुद्देमराठवाडा एक्स्प्रेस पाऊणतास थांबलीरेल्वे फाटकावर वाहनांच्या रांगा

मानवत (जि. परभणी) : तालुक्यातील मानवत रोड रेल्वे स्थानकावर रविवारी सकाळी ८ वाजेच्या सुमारास सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्याने तब्बल पाऊणतास धर्माबाद- मनमाड मराठवाडा एक्स्प्रेस स्थानकाबाहेरच थांबविण्यात आली. तीन दिवसांमध्ये सिग्नल यंत्रणेत बिघाड होण्याची ही दुसरी घटना आहे. वारंवार सिग्नल यंत्रणेत बिघाड होत असल्याने प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.

मानवत शहरापासून ८ कि.मी. आणि पाथरी शहरापासून १५ कि.मी. अंतरावर असलेल्या मानवत रोड रेल्वे स्थानकाचा वापर दोन्ही तालुक्यातील प्रवाशांना होतो. दररोज हजारो प्रवासी या स्थानकावरुन प्रवास करतात. मात्र मागील तीन दिवसांपासून सिग्नल यंत्रणेत बिघाड होण्याचे प्रकार वारंवार घडत असल्याने प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. परभणीहून निघालेली धर्माबाद-मनमाड रेल्वे मानवत रोड रेल्वेस्थानकाजवळ आली. बिघाड झाल्याने स्थानकापासून ५०० मीटर अंतरावर सिग्नलच्या बाहेर ही गाडी थांबवावी लागली. सिग्नल यंत्रणेतील बिघाड दुरुस्त करण्यासाठी ४५ मिनिटे लागला. त्याचा फटका प्रवाशांना सहन करावा लागला. अगोदरच एक तास उशिराने धावत असलेली मराठवाडा एक्सप्रेस मानवत रोड रेल्वे स्थानकावरून ४५ मिनिटे उशिराने पुढील प्रवासाला निघाली. तीन दिवसांपूर्वीही नांदेड-दौंड या  रेल्वेतील प्रवाशांनाही  बिघाडाचा सामना करावा लागला.

उड्डाण पुलाचे काम संथ गतीने : राष्ट्रीय महामार्गावर मानवत-परभणी दरम्यान बायपास मार्ग तयार केला जात आहे. या मार्गामुळे परभणीचे अंतर २ ते अडीच कि.मी.ने कमी होणार आहे. मात्र उड्डाण पुलाचे काम संथ गतीने सुरू असल्याने वाहनचालक मानवत रोडकडून प्रवास करतात. या मार्गावरील रेल्वे फाटक दिवसभरात ३५ ते ४० वेळा बंद राहते. त्यामुळे रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या रांगा लागत आहेत. त्यामुळे उड्डाणपुलाचे काम गतीने पूर्ण करावे, अशी मागणी होत आहे. 

रेल्वे फाटकही एक तास बंदयंत्रणेत बिघाड झाल्याने राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६१ वरील रेल्वे फाटक बिघाड दुरुस्त होईपर्यत बंद ठेवले जाते. त्यामुळे वाहनचालकांंना फाटकावर ताटकळत थांबावे लागते. येथील रेल्वे फाटकाचे कनेक्शन सिग्नल यंत्रणेशी असल्याने मानवत स्थानकावरून आलेली रेल्वे पुढील स्थानकाकडे निघाल्यास रेल्वे स्थानकापासून ५०० मीटर अंतराच्या पुढे गेल्यानंतर फाटक आपोआप उघडते. मात्र बिघाडाच्या काळात हे फाटक बंद राहत असल्याने त्याचा फटका रेल्वे प्रवाशांसह राष्ट्रीय माहामार्गावरील प्रवाशांनाही सहन करावा लागत आहे.

टॅग्स :railwayरेल्वेparabhaniपरभणीpassengerप्रवासी