शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली विमानतळावरील तांत्रिक समस्या पूर्णपणे दूर, विमानसेवा पुन्हा पूर्ववत; AAI ची माहिती, नेमकं घडलं काय?
2
“जमीन घोटाळाप्रकरणी अजित पवारांचा राजीनामा घेणे योग्य नाही”; भाजपा नेत्यांनी केली पाठराखण
3
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
4
अभिनेते जयवंत वाडकरांची लेक स्वामिनीचा थाटामाटात झाला साखरपुडा, कोण आहे होणारा नवरा?
5
अग्रलेख: उठो ‘पार्थ’, स्वच्छता हाच धर्म! महायुती सरकारच्या प्रतिमेवर शिंतोडे उडताहेत...
6
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
7
विशेष लेख: नक्षलमुक्त भारताकडे निर्णायक पावले पडतात, तेव्हा...
8
टीम इंडियाला मालिका विजयाची संधी! ऑस्ट्रेलियाविरुद्ध अखेरचा टी२० सामना आज
9
लेख: १०० रुपयांचे पाणी, ७०० रुपयांची कॉफी! मल्टिप्लेक्सच्या लूटमारीवर न्यायालयाची नाराजी
10
आठवडाभरात सर्व घरे जमीनदाेस्त! ठाणे-बोरीवली टनेलच्या कामाला वेग; मागाठाणेत झोपड्या हटवल्या
11
नवी मुंबईत मनसेने भरवले मतदार यादीतील बाेगस नावांचे प्रदर्शन; अमित ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन
12
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
13
एशियाटिक साेसायटीची निवडणूक अनिश्चित काळासाठी पुढे ढकलली; सदस्य मुद्द्यावरून होता गोंधळ
14
माझे नाव दोन मतदार याद्यांत असणे ही निवडणूक आयोगाची चूक- आमदार अस्लम शेख
15
अखेर ‘मुंबई क्रिकेट’च्या निवडणुकीचा मार्ग मोकळा; मुंबई उच्च न्यायालयाने याचिका निकाली काढली
16
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
17
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
18
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
19
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
20
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर

ज्यांना ‘ईडी’ची भीती; तेच पक्षातून बाहेर -सुप्रिया सुळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2019 13:05 IST

कार्यकर्त्यांनी चर्चेकडे लक्ष न देता जोमाने लढावे

ठळक मुद्देराज्यात मंदी ही सरकारच्या धोरणांचा परिपाक

वसमत (जि. हिंगोली) : ईडी, सीबीआयची भीती, कारखाने, बँकांना मदतीचे आमिष दाखवून पक्षांतर घडवले जात आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात असे कधी झाले नाही. पक्षांतर करणाऱ्या सर्वांना मंत्रीपद देण्याचेही आमिष दिले जात असल्याने भाजपचे सरकार पुन्हा आलेच तर सर्व मंत्री आमचेच राहतील, असा टोला राष्ट्रवादीच्या खा. सुप्रिया सुळे यांनी लगावला. वसमत येथे आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. 

वसमत येथे त्यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी कार्यकर्ता मेळावा घेण्यात आला. महाविद्यालयीन तरूणांशीही त्यांनी संवाद साधला. राष्ट्रवादी कार्यकर्त्यांशी संवाद साधताना त्यांनी सर्व शक्तीनिशी लढा, असे आवाहन केले.  शरद पवार यांनी आजवर अन्य पक्षांचे नेते फोडले, पक्ष फोडले, त्यात व आजच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांना फोडण्याचा प्रकार यातील फरक काय, असा प्रश्न विचारला असता त्यांनी असे प्रकार शरद पवार यांनी कधी केले नाही. त्या काळात जे पक्षांतर झाले ते तत्त्वाचे राजकारण होते, असे  सांगितले. ईव्हीएमबद्दल शंका आहे, या मुद्यावर आंदोलन उभे करणार असल्याचे त्यांनी सांगितले. पक्षाचे ध्येयधोरणे जनतेपर्यंत पोहोचवा यश आपलेच आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनी चर्चेकडे लक्ष न देता जोमाने  लढावे, असे आवाहनही त्यांनी केले.

राज्यात मंदी ही सरकारच्या धोरणांचा परिपाकभाजप सरकारने राबविलेल्या चुकीच्या धोरणांमुळेच देशात आर्थिक मंदीची लाट निर्माण झाली असून त्याचा त्रास आता सर्वसामान्य नागरिकांना भोगावा लागत आहे, असा आरोप खा. सुप्रिया सुळे यांनी सोमवारी सायंकाळी येथे केला. परभणी जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. राज्यात रोजगाराचे मोठे आव्हान निर्माण झाले आहे. त्यातही बेरोजगारीचा प्रश्न अधिक चिंताजनक आहे. आज महाराष्ट्र कोणत्याच क्षेत्रात आघाडीवर नाही; परंतु, महिलांवरील अत्याचार, शेतकऱ्यांच्या आत्महत्या याबाबतीत मात्र राज्य आघाडीवर असल्याचे त्यांनी सांगितले. 

टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेसSupriya Suleसुप्रिया सुळेparabhaniपरभणी