शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
3
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
4
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
5
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
6
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
7
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
8
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
9
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
10
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
11
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
12
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
13
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
14
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
15
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
16
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
17
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
18
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
19
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
20
पाकिस्तानी एअरलाइन्स PIAचा नवा मालक कोण होणार? 'या' कंपनीने लावली तब्बल १० लाख कोटींची बोली
Daily Top 2Weekly Top 5

ज्यांना ‘ईडी’ची भीती; तेच पक्षातून बाहेर -सुप्रिया सुळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2019 13:05 IST

कार्यकर्त्यांनी चर्चेकडे लक्ष न देता जोमाने लढावे

ठळक मुद्देराज्यात मंदी ही सरकारच्या धोरणांचा परिपाक

वसमत (जि. हिंगोली) : ईडी, सीबीआयची भीती, कारखाने, बँकांना मदतीचे आमिष दाखवून पक्षांतर घडवले जात आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात असे कधी झाले नाही. पक्षांतर करणाऱ्या सर्वांना मंत्रीपद देण्याचेही आमिष दिले जात असल्याने भाजपचे सरकार पुन्हा आलेच तर सर्व मंत्री आमचेच राहतील, असा टोला राष्ट्रवादीच्या खा. सुप्रिया सुळे यांनी लगावला. वसमत येथे आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. 

वसमत येथे त्यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी कार्यकर्ता मेळावा घेण्यात आला. महाविद्यालयीन तरूणांशीही त्यांनी संवाद साधला. राष्ट्रवादी कार्यकर्त्यांशी संवाद साधताना त्यांनी सर्व शक्तीनिशी लढा, असे आवाहन केले.  शरद पवार यांनी आजवर अन्य पक्षांचे नेते फोडले, पक्ष फोडले, त्यात व आजच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांना फोडण्याचा प्रकार यातील फरक काय, असा प्रश्न विचारला असता त्यांनी असे प्रकार शरद पवार यांनी कधी केले नाही. त्या काळात जे पक्षांतर झाले ते तत्त्वाचे राजकारण होते, असे  सांगितले. ईव्हीएमबद्दल शंका आहे, या मुद्यावर आंदोलन उभे करणार असल्याचे त्यांनी सांगितले. पक्षाचे ध्येयधोरणे जनतेपर्यंत पोहोचवा यश आपलेच आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनी चर्चेकडे लक्ष न देता जोमाने  लढावे, असे आवाहनही त्यांनी केले.

राज्यात मंदी ही सरकारच्या धोरणांचा परिपाकभाजप सरकारने राबविलेल्या चुकीच्या धोरणांमुळेच देशात आर्थिक मंदीची लाट निर्माण झाली असून त्याचा त्रास आता सर्वसामान्य नागरिकांना भोगावा लागत आहे, असा आरोप खा. सुप्रिया सुळे यांनी सोमवारी सायंकाळी येथे केला. परभणी जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. राज्यात रोजगाराचे मोठे आव्हान निर्माण झाले आहे. त्यातही बेरोजगारीचा प्रश्न अधिक चिंताजनक आहे. आज महाराष्ट्र कोणत्याच क्षेत्रात आघाडीवर नाही; परंतु, महिलांवरील अत्याचार, शेतकऱ्यांच्या आत्महत्या याबाबतीत मात्र राज्य आघाडीवर असल्याचे त्यांनी सांगितले. 

टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेसSupriya Suleसुप्रिया सुळेparabhaniपरभणी