शहरं
Join us  
Trending Stories
1
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधुबद्दलही बरंच बोलले
2
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
3
ठाकरे बंधुंमधील दादर, शिवडीचा तिढा अखेर सुटला, मोठ्या भावासाठी धाकट्याने घेतले झुकते माप
4
महापालिका निवडणूक २०२६ : प्रस्तावच नाही; काँग्रेस-'वंचित'ची युती होणार की नाही? गोंधळ कायम 
5
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
6
खळबळजनक! सकाळी एन्काऊंटर, संध्याकाळी फरार; पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला आरोपी
7
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
8
पहाटे ५ ची वेळ, उर्फी जावेद घाबरलेल्या अवस्थेत पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली; नक्की काय घडलं?
9
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
10
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
11
आठ कोटी, बारा पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
12
८ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा ३,२८,००० रुपये फिक्स व्याज! ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्टाची 'खास' भेट
13
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
14
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
15
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
16
२०२५चे शेवटचे पंचक: ५ दिवस अशुभ, पण ‘ही’ कामे करणे शुभ; दोष लागणार नाही, नेमके काय टाळावे?
17
Bigg Boss Marathi: लावणी डान्सरला 'बिग बॉस मराठी'ची ऑफर? म्हणाली- "मला त्यांच्याकडून मेल आलाय..."
18
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
19
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, न्याय विभागाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
20
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
Daily Top 2Weekly Top 5

यामुळे होतोय शेतकऱ्यांवर अन्याय; येड्या बाभळीच्या झुडपात लावलंय पर्जन्यमापक यंत्र

By मारोती जुंबडे | Updated: August 25, 2022 16:04 IST

वस्तुनिष्ठ पावसाच्या नोंदीला फाटा बसत असून याचा मोठा फटका सावंगी म्हाळसा मंडळातील २० गावाच्या शेतकऱ्यांना बसत आहे

येलदरी (परभणी ) : पावसाच्या अचूक नोंदी व्हाव्यात यासाठी लाखो रुपये खर्च करत शासकीय पर्जन्यमापक यंत्र बसविण्यात आले. यावरून अतिवृष्टी व पावसाचा अचूक अंदाज घेण्यात येतो. तसेच या नोंदीवरून दुष्काळ व सुकाळ जाहीर करण्यात येतो. मात्र जिंतूर तालुक्यातील सांवगी म्हाळसा येथील शासकीय पर्जन्यमापक यंत्र येड्या बाभळीच्या काटेरी झुडपात गेल्याने पावसाळ्यात पडणाऱ्या पावसाची योग्य नोंद होत नाही. त्यामुळे २०हून अधिक गावांतील शेतकरी शासनाच्या अतिवृष्टीच्या निकषात बसत नसल्याने शेतकऱ्यांवर मोठा अन्याय होत आहे.

जिंतूर तालुक्यातील सावंगी म्हाळसा येथे २० ते २५ गावांसाठी एकच ऑनलाइन पर्जन्यमापक यंत्र असून, पाऊस मोजण्याची शासनाची यंत्रणा आहे. महावेध या पोर्टलवर येणाऱ्या आकडेवारीवरूनच जिल्ह्यातील पर्जन्यमापन निश्चित केले जाते. त्यामुळे गेल्या तीन- चार वर्षांपासून कृषी आणि महसूल दोन्ही विभागांकडून पर्जन्यमापनाचे काम केले जात नसून, मोजमापही ‘रामभरोसेच’ असल्याचे चित्र आहे. महसूल मंडळांचा पाऊस यापूर्वी पर्जन्यमापक यंत्रात पडलेल्या पावसाच्या पाण्यावरून निश्चित केला जात होता. महसूल अथवा कृषी विभागाचे कर्मचारी याची नोंद घेऊन वरिष्ठ कार्यालयात पाठवित होते. मात्र, मॅन्युअली आणि तांत्रिक पद्धती यातील आकडेवारीत मोठ्या प्रमाणात तफावत येत असल्याचे गतवर्षी निदर्शनास आलेले आहे. त्यामुळे एका खासगी कंपनीकडून जिल्ह्याच्या महसूल मंडळाच्या ठिकाणी आधुनिक पर्जन्यमापक बसविले आहेत. त्याची आकडेवारी महावेध या पोर्टलवर जाते. तेथून ऑनलाइन पद्धतीने त्या-त्या तालुक्यात पाहायला मिळते.

सावंगी म्हाळसा हे एक मंडळ आहे. येथे एक ऑनलाइन पर्जन्यमापक यंत्र बसवलेले आहे. मात्र या यंत्रावरून आजूबाजूच्या २० ते २५ गावांत पडलेला पाऊस अंदाजे धरल्या जात आहे. त्यामुळे जेथे यंत्र बसवलेले आहे. त्या ठिकाणी कमी पाऊस झाला असल्यास इतर गावच्या ठिकाणी अतिवृष्टी झाली तरीदेखील त्या गावात कमी पाऊस झाल्याची नोंद सरकार दप्तरी होत असल्यामुळे शेतकरी विमा संरक्षण, शासनाची विविध अनुदान यापासून वंचित राहत आहेत. महसूल मंडळाची गावे ५ ते २० किलोमीटरवर आहेत. असे असतानाही महसूल गावनिहाय मोजमाप केले जात नाही. त्यामुळे शासनाचे पर्जन्यमापन हा प्रकार काहीसा अजब असल्याचे चित्र आहे. त्यातच जे शासकीय पर्जन्यमापक यंत्र बसविण्यात आले. ते पूर्णपणे येड्या बाभळीच्या झुडपात अडकल्याचे दिसून येते. त्यामुळे शेतकऱ्यांवर मोठा अन्याय होत आहे.

२० गावांतील शेतकऱ्यांवर होतोय अन्यायजिंतूर तालुक्यातील सावंगी म्हाळसा मंडळांतर्गत पडणाऱ्या अतिवृष्टीची योग्य नोंद होत नसल्याने शेतकऱ्यांना मोठा फटका बसत असून, हे ऑनलाइन पर्जन्यमापक यंत्र पूर्णपणे दुर्लक्षित झाले आहे. या परिसरात होत असलेल्या अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना शासनाच्या विविध योजनांपासून मुकावे लागत आहे. याकडे शासनाने तत्काळ लक्ष देऊन सावंगी म्हाळसा मंडळातील सर्व गावे अतिवृष्टीमध्ये समाविष्ट करावीत, अशी मागणी सावंगी म्हाळसा, केहाळ, सावळी, हिवरखेडा, मुरूमखेडा, किन्ही, घडोळी, मानकेश्वर आदी गावांतील शेतकऱ्यांनी केली आहे.

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरीparabhaniपरभणीRainपाऊस