शहरं
Join us  
Trending Stories
1
Russia Ukrain War : डोनाल्ड ट्रम्प युक्रेनचे दोन तुकडे करणार? क्रिमिया अन् दोन मोठी शहरे रशियाला मिळणार
2
आभाळ फाटले! मुखेड तालुक्यातील सहा गावांत पाणी शिरले; बेपत्ता १२ जणांचा शोध सुरु
3
Mumbai Rain Alert: मुंबईत रेड अलर्ट; तीन ते चार तासात 'अतिमुसळधार' कोसळणार, शाळांना सुट्टी जाहीर
4
School Holiday: मुंबईत शाळांना सुट्टी जाहीर, पाणी साचल्याने अनेक ठिकाणी वाहतूक ठप्प; ४८ तासांसाठी रेड अलर्ट जारी
5
Video: टोलनाक्यावरील कर्मचारी की गुंड; लष्कराच्या जवानावर तुटून पडले, खांबाला बांधून दांडक्याने मारले
6
चेकच्या मागच्या बाजूला सही का करतात? ९०% लोकांना या प्रश्नाचे उत्तर माहित नसणार
7
‘मत चोरी’चा वाद वाढला, विरोधक मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात महाभियोग प्रस्ताव आणण्याच्या तयारीत 
8
Technology: ATM मधून पैसे काढल्यानंतर तुमचा PIN सुरक्षित राहतो का? 'अशी' घ्या काळजी!
9
Asia Cup India Squad : गंभीरनं 'फिल्डिंग' लावली तर गिल खेळणार; नाहीतर... आगरकर हे ३ मोठे निर्णय घेणार?
10
धक्कादायक! रणथंभोर व्याघ्र प्रकल्पात पर्यटकांची गाडी अचानक पडली बंद आणि मग...
11
श्रावणातला शेवटचा आठवडा; 'या' दिशेला लावा बेलाचे झाड, घरात धन, समृद्धी, पैसा येईल अपार
12
"सिनेमाच्या नावाखाली अभिनेते मजा..." कमी वयाच्या अभिनेत्रींसोबत काम करण्यावर आर माधवनचं भाष्य
13
सतर्क राहा: कोकण, पश्चिम महाराष्ट्रात १८-१९ ऑगस्टला मुसळधार पाऊस; कुठे-कुठे 'रेड अलर्ट'?
14
अहिल्यानगरमध्ये फर्निचरच्या दुकानात अग्नितांडव; अख्खं कुटुंब संपलं, दोन चिमुकल्यांसह पाच जणांचा मृत्यू
15
भाडे देऊन लाखोंचे नुकसान की EMI देऊन घर खरेदी करावे? ५० लाखांच्या घराचं आर्थिक गणित समजून घ्या
16
फ्लॉप शोचा सिलसिला संपेना! अन् म्हणे; सलमानचा पाक संघ आशिया कपमध्ये टीम इंडियासमोर हिट ठरेल
17
Apple नं ट्रम्प आणि चीनला दाखवला ठेंगा; भारतात आणखी एका प्रकल्पातून सुरू केलं iPhone चं उत्पादन
18
Home Remedy: महागडी हेअर ट्रीटमेंट सोडा, ५० रुपयांत लांबसडक, घनदाट, काळेभोर केस मिळवा 
19
जन्माष्टमीच्या मिरवणुकीतील रथ विजेच्या तारांना चिकटला, शॉक लागून ५ जणांचा मृत्यू, केंद्रीय मंत्र्यांचा सुरक्षा रक्षकही जखमी 
20
'सिटी ऑफ ड्रीम्स'नंतर प्रिया बापटचा पुन्हा 'तो' सीन, अभिनेत्री सुरवीन चावलासोबत लिपलॉक

यामुळे होतोय शेतकऱ्यांवर अन्याय; येड्या बाभळीच्या झुडपात लावलंय पर्जन्यमापक यंत्र

By मारोती जुंबडे | Updated: August 25, 2022 16:04 IST

वस्तुनिष्ठ पावसाच्या नोंदीला फाटा बसत असून याचा मोठा फटका सावंगी म्हाळसा मंडळातील २० गावाच्या शेतकऱ्यांना बसत आहे

येलदरी (परभणी ) : पावसाच्या अचूक नोंदी व्हाव्यात यासाठी लाखो रुपये खर्च करत शासकीय पर्जन्यमापक यंत्र बसविण्यात आले. यावरून अतिवृष्टी व पावसाचा अचूक अंदाज घेण्यात येतो. तसेच या नोंदीवरून दुष्काळ व सुकाळ जाहीर करण्यात येतो. मात्र जिंतूर तालुक्यातील सांवगी म्हाळसा येथील शासकीय पर्जन्यमापक यंत्र येड्या बाभळीच्या काटेरी झुडपात गेल्याने पावसाळ्यात पडणाऱ्या पावसाची योग्य नोंद होत नाही. त्यामुळे २०हून अधिक गावांतील शेतकरी शासनाच्या अतिवृष्टीच्या निकषात बसत नसल्याने शेतकऱ्यांवर मोठा अन्याय होत आहे.

जिंतूर तालुक्यातील सावंगी म्हाळसा येथे २० ते २५ गावांसाठी एकच ऑनलाइन पर्जन्यमापक यंत्र असून, पाऊस मोजण्याची शासनाची यंत्रणा आहे. महावेध या पोर्टलवर येणाऱ्या आकडेवारीवरूनच जिल्ह्यातील पर्जन्यमापन निश्चित केले जाते. त्यामुळे गेल्या तीन- चार वर्षांपासून कृषी आणि महसूल दोन्ही विभागांकडून पर्जन्यमापनाचे काम केले जात नसून, मोजमापही ‘रामभरोसेच’ असल्याचे चित्र आहे. महसूल मंडळांचा पाऊस यापूर्वी पर्जन्यमापक यंत्रात पडलेल्या पावसाच्या पाण्यावरून निश्चित केला जात होता. महसूल अथवा कृषी विभागाचे कर्मचारी याची नोंद घेऊन वरिष्ठ कार्यालयात पाठवित होते. मात्र, मॅन्युअली आणि तांत्रिक पद्धती यातील आकडेवारीत मोठ्या प्रमाणात तफावत येत असल्याचे गतवर्षी निदर्शनास आलेले आहे. त्यामुळे एका खासगी कंपनीकडून जिल्ह्याच्या महसूल मंडळाच्या ठिकाणी आधुनिक पर्जन्यमापक बसविले आहेत. त्याची आकडेवारी महावेध या पोर्टलवर जाते. तेथून ऑनलाइन पद्धतीने त्या-त्या तालुक्यात पाहायला मिळते.

सावंगी म्हाळसा हे एक मंडळ आहे. येथे एक ऑनलाइन पर्जन्यमापक यंत्र बसवलेले आहे. मात्र या यंत्रावरून आजूबाजूच्या २० ते २५ गावांत पडलेला पाऊस अंदाजे धरल्या जात आहे. त्यामुळे जेथे यंत्र बसवलेले आहे. त्या ठिकाणी कमी पाऊस झाला असल्यास इतर गावच्या ठिकाणी अतिवृष्टी झाली तरीदेखील त्या गावात कमी पाऊस झाल्याची नोंद सरकार दप्तरी होत असल्यामुळे शेतकरी विमा संरक्षण, शासनाची विविध अनुदान यापासून वंचित राहत आहेत. महसूल मंडळाची गावे ५ ते २० किलोमीटरवर आहेत. असे असतानाही महसूल गावनिहाय मोजमाप केले जात नाही. त्यामुळे शासनाचे पर्जन्यमापन हा प्रकार काहीसा अजब असल्याचे चित्र आहे. त्यातच जे शासकीय पर्जन्यमापक यंत्र बसविण्यात आले. ते पूर्णपणे येड्या बाभळीच्या झुडपात अडकल्याचे दिसून येते. त्यामुळे शेतकऱ्यांवर मोठा अन्याय होत आहे.

२० गावांतील शेतकऱ्यांवर होतोय अन्यायजिंतूर तालुक्यातील सावंगी म्हाळसा मंडळांतर्गत पडणाऱ्या अतिवृष्टीची योग्य नोंद होत नसल्याने शेतकऱ्यांना मोठा फटका बसत असून, हे ऑनलाइन पर्जन्यमापक यंत्र पूर्णपणे दुर्लक्षित झाले आहे. या परिसरात होत असलेल्या अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना शासनाच्या विविध योजनांपासून मुकावे लागत आहे. याकडे शासनाने तत्काळ लक्ष देऊन सावंगी म्हाळसा मंडळातील सर्व गावे अतिवृष्टीमध्ये समाविष्ट करावीत, अशी मागणी सावंगी म्हाळसा, केहाळ, सावळी, हिवरखेडा, मुरूमखेडा, किन्ही, घडोळी, मानकेश्वर आदी गावांतील शेतकऱ्यांनी केली आहे.

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरीparabhaniपरभणीRainपाऊस