शहरं
Join us  
Trending Stories
1
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
2
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
3
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
4
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
5
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
6
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
7
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
8
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
9
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
10
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
11
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?
12
"संविधान न्याय देण्यात अपयशी, राजेशाही..."; नेपाळच्या गोंधळावर मनीषा कोईरालाचे रोखठोक मत
13
विरोधकांची इच्छा पूर्ण होणार...? NDA मध्ये फुट पडणार...? "15 जागा मिळाल्या नाही तर..."; 'या' पक्षानं केली मोदींचं टेन्शन वाढवणारी 'मागणी'
14
'माझ्याकडे पैशांची कमतरता नाही; महिन्याला २०० कोटी कमवण्याची बुद्धी...', नितीन गडकरींचे वक्तव्य
15
IND vs PAK: टॉस अन् मॅचच्या निकालाचा संबंध काय..? जाणून घ्या 'या' मैदानावरचं खास कनेक्शन
16
“ह्याच जागेतून इतिहास घडविला गेला”; हर्षवर्धन सपकाळ यांची लंडन येथील आंबेडकर हाऊसला भेट
17
पितृपक्ष २०२५: ‘ही’ ५ कामे अवश्य करा, लक्ष्मी देवीची कालातीत कृपा होईल; लाभच लाभ मिळतील!
18
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना अनुकूलता, यश-प्रगती-लाभ; बुडालेले पैसे मिळतील, वचन देऊ नये!
19
शेअर असावा तर असा...! 5 दिवस अन् ₹40000 कोटींची कमाई, रिलायन्स-टीसीएसलाही टाकलं मागे; गुंतवणूकदारांना केलं मालामाल
20
सतत मोबाईलचा वापर म्हणजे मृत्यूला आमंत्रण; मेंदू आणि शरीरावर होतो जीवघेणा परिणाम

सहा हजार हेक्टरवरील तुरीचे पंचनामे होईनात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2020 04:13 IST

यावर्षीच्या खरीप हंगामात जिंतूर तालुक्यातील बोरी व परिसरातील शेतकऱ्यांनी तूर पिकाची मोठ्या प्रमाणात लागवड केली. सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्यात ...

यावर्षीच्या खरीप हंगामात जिंतूर तालुक्यातील बोरी व परिसरातील शेतकऱ्यांनी तूर पिकाची मोठ्या प्रमाणात लागवड केली. सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टी व सततच्या पावसामुळे बहुतांश पीक शेतकऱ्यांच्या हातचे गेले. मात्र, त्यानंतर ज्या शेतकऱ्यांच्या हाती हे पीक लागले आहे, त्या शेतकऱ्यांनी या पिकावर मोठ्या खर्च करून हे पीक जगवले. मात्र, काढणीच्या वेळी हे तुरीचे पीक संपूर्णपणे वाया गेले आहे. त्यामुळे संकटात सापडलेल्या बोरी कृषी मंडळांतर्गत येणाऱ्या १५९ शेतकऱ्यांनी पिकांचे पंचनामे करावेत, अशी मागणी तालुका प्रशासनाकडे दोन आठवड्यांपूर्वी केली होती. मात्र, प्रशासनाने या शेतकऱ्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष केले. दोन आठवडे उलटूनही पंचनामे करण्यास महसूल व कृषी विभागाचा एकही अधिकारी व कर्मचारी या पिकाकडे फिरकला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. प्रशासनाला नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करण्यात वेळ मिळणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.