शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA : बुमराह-वरुण चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
4
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
5
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
6
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
7
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
8
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
9
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
10
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
11
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
12
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
13
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
14
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
15
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
16
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
17
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
18
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
19
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
20
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

स्वच्छतागृह नसल्याने जि. प. शाळेतील विद्यार्थ्यांची गैरसोय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2021 04:17 IST

शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार प्रत्येक शाळेत मुले व मुलींसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह असणे आवश्यक आहे. तशी प्रत्येक शाळांना यु डायसवर माहिती ...

शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार प्रत्येक शाळेत मुले व मुलींसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह असणे आवश्यक आहे. तशी प्रत्येक शाळांना यु डायसवर माहिती उपलब्ध करून देणे बंधनकारक करण्यात आले आहे. असे असतानाही जिल्ह्यातील अनेक शाळांमध्ये मुले व मुलींसाठी स्वच्छतागृहच उपलब्ध नसल्याचे दिसून येत आहे. जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या १ हजार १२८ शाळा आहेत. त्यापैकी मुलींसाठी १ हजार ३२ शाळांमध्ये स्वच्छतागृह आहेत. उर्वरित ९६ शाळांमध्ये स्वच्छतागृह नाहीत. मुलांसाठी ९७२ शाळांमध्ये स्वच्छतागृह आहेत. १५६ शाळांमध्ये मुलांसाठी स्वच्छतागृहच नाहीत. त्यामुळे या मुलांना नाईलाजाने उघड्यावर जावे लागत आहे.

मुलांसाठी कमी स्वच्छतागृह

जिल्ह्यात पाचवी ते आठवीच्या खासगी अनुदानित, खासगी विनाअनुदानित, जिल्हा परिषद, शासकीय अशा एकूण २ हजार १०७ शाळा आहेत. त्यापैकी १ हजार ९३९ शाळांमध्ये मुलांसाठी स्वच्छतागृह आहेत. १,६९८ शाळांमध्ये मुलांसाठी स्वच्छतागृह नाहीत, तर मुलींसाठी २ हजार १०७पैकी २ हजार १ शाळांमध्ये स्वच्छतागृह आहे. १०६ शाळांमध्ये स्वच्छतागृह नाही.

कर्मचारी नसल्याने स्वच्छतेत अडसर

जिल्ह्यातील जवळपास २ हजार शाळांमध्ये मुले व मुलींसाठी स्वच्छतागृह आहेत. यातील जिल्हा परिषदेच्या बहुतांश शाळांमध्ये कर्मचाऱ्यांची कमतरता आहे. त्यामुळे शिक्षकांना अनेक वेळा खासगी व्यक्तींकडूनच स्वच्छतागृह स्वच्छ करून घ्यावे लागते. यासाठी निधीचीही तरतूद नाही. त्यामुळे नियमित साफसफाई करण्यास या शाळांना अडचणी येत आहेत.

शासकीय शाळांचीच अधिक अडचण

जिल्ह्यातील पाचवी ते आठवीच्या २ हजार १०७पैकी जिल्हा परिषदेच्या अनेक शाळांमध्ये स्वच्छतागृह नाहीत. मुलांसाठी असलेल्या ८६.१७ टक्के शाळांमध्ये, तर मुलींसाठी असलेल्या ९१.४९ टक्के शाळांमध्ये स्वच्छतागृह आहेत. उर्वरित शाळांमध्ये स्वच्छतागृहांची अडचण आहे. मुलांसाठी असलेल्या शासकीय ८५.७१ टक्के शाळांमध्ये, तर मुलींसाठीच्या ५७.१४ टक्के शाळांमध्ये स्वच्छतागृहे नाहीत. विशेष म्हणजे नगरपालिकेच्या १०० टक्के शाळांमध्ये स्वच्छतागृहे आहेत. खासगी अनुदानित मुलांच्या शाळांमध्ये ९८.५८ टक्के, तर मुलींच्या ९९.३९ टक्के शाळांमध्ये स्वच्छतागृह आहेत. खासगी विनाअनुदानित मुलांच्या व मुलींच्या ९९.१५ टक्के शाळांमध्ये स्वच्छतागृहे आहेत. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या आणि शासकीय शाळांमध्ये स्वच्छतागृह उभारण्याची आवश्यकता आहे.