शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

पाथरी तालुक्यातील 21 ग्रामपंचायतीमध्ये मनरेगावर एक छदामही खर्च नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2018 13:52 IST

तालुक्यातील तब्बल 21 ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात मनरेगाचे यंत्रणा आणि ग्रामपंचायत स्तरावर एकही काम सुरू नाही अशी धक्कादायक माहिती उघड झाली आहे. 

- विठ्ठल भिसेपाथरी (परभणी ) : महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेवर शासन भर देत आहे. असे असताना तालुक्यातील तब्बल 21 ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात मनरेगाचे यंत्रणा आणि ग्रामपंचायत स्तरावर एकही काम सुरू नाही अशी धक्कादायक माहिती उघड झाली आहे. 

विषेश म्हणजे 2018 - 19 या वर्षात या ग्रा प आणि इतर कार्यान्वित यंत्रणेकडे कामाचा सेल्फच उपलब्ध नाही, पर्यायाने गेल्या सहा महिण्यात या गाव कार्यक्षेत्रात योजनेवर छदाम ही खर्च झाला नसल्याची धक्कादायक बाब निदर्शनास अली आहे. त्यामुळे योजनेच्या कामाकडे प्रशासकीय यंत्रणा किती उदासीन आहे ही बाब दिसून येते. 

महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेअंतर्गत केंद्र शासनाने विविध 29 प्रकारच्या कामाचा समावेश केला आहे, तसेच अकरा कलमी कार्यक्रम ही हाती घेतला आहे, दर वर्षी 15 ऑगस्ट च्या ग्रामसभेत पुढील वर्षी च्या कामाचे आराखडे आणि लेबर बजेट तयार केले जातात, मात्र वास्तवात हे नियोजन कागदावर राहत असल्याचे चित्र दिसून येत आहे. 

मनरेगा योजने अंतर्गत 50 टक्के कामे यंत्रणा स्तर आणि 50 टक्के कामे जिल्हा परिषद स्तरावर म्हणजेच ग्रा प स्तरावर केली जातात.मागील काही वर्षात ग्राप स्तरावर बहुतांश कामे सिंचन विहिरीची घेतली जात आहेत.ग्राप कढूनही त्याच कामाची मागणी होत आहे.यंत्रणा स्तरावर शेत रस्ते, नालासरळीकर , वृक्ष लागवड, विहीर पुनर्भरण , शेततळी, तुती लागवड या कामाचा समावेश आहे.यंत्रणा स्तरावर सार्वजनिक बांधकाम विभाग, कृषी विभाग, सामाजिक वनीकरण विभाग, रेशीम कार्यालय या विभागा मार्फत कामे केली जातात.

मात्र, तालुक्यातील मनरेगा योजनेच्या कामात या सर्वच यंत्रणा उदासीन असल्याचे दिसून येत आहे.त्यामुळे 21 गावात मनरेगा योजनेचे एकही यंत्रणेचे काम सुरू नाही. गावात मजुरांना रोजगार उपलब्ध होत नसल्याने त्यांचे स्थलांतर वाढले आहे. सध्या तालुक्यात दुष्काळी स्थिती असल्याने या गावात मनरेगाची  कामे सुरु करण्याची मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.

गावांची यादी : 

टॅग्स :parabhaniपरभणीgovernment schemeसरकारी योजनाfundsनिधी