शहरं
Join us  
Trending Stories
1
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
2
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
3
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
4
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
5
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
6
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
7
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
8
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
9
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
12
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
13
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
14
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
15
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
16
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
17
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
18
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
19
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
20
"चल पळून जाऊन लग्न करूया..." संजनानं शेअर केली लग्नाआधीची ती गोष्ट; बुमराहचा चेहराच पडला (VIDEO)

कर भरूनही सुविधा नाहीत; खानापूर भागातील नागरिकांचा मनपावर आक्रोश महामोर्चा

By मारोती जुंबडे | Updated: April 5, 2023 15:22 IST

शहरातील खानापूर भागातून हा मोर्चा मनपापर्यंत निघाला.

परभणी : खानापूर परिसरातील सर्व वसाहतींमध्ये मूलभूत सोयी- सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, या विविध मागण्यांसाठी नागरिकांनी बुधवारी महापालिकेवर आक्रोश मोर्चा काढला.

शहरातील खानापूर भागातून हा मोर्चा मनपापर्यंत निघाला. मोर्चाचे नेतृत्व किर्तीकुमार बुरांडे यांनी केले. यामध्ये खानापूर परिसरातील सर्व वसाहतीमध्ये पक्क्या नाल्या बांधून परिसरातील सार्वजनिक स्वच्छतागृह तत्काळ सुरू करावेत. छत्रपती संभाजीनगरचे रेड घेऊन तत्काळ उठवावे, खानापूर नगर येथील स्मशानभूमीचे सुशोभीकरण करण्यात यावे, या प्रमुख मागण्या प्रशासनाकडे मांडण्यात आल्या. खानापूर परिसरातील संभाजीनगर येथील रेड झोन उठविण्यात यावे, तेथे तत्काळ मूलभूत सुविधा रस्ते, नाली देण्यात यावे, परिसरातील अनुसया नगर, खानापूर गावठाण, तिरुपतीनगर, संभाजीनगर, नरसिंहनगर, श्रीकृष्णनगर, राजूरत्ननगर, पवनसुतनगर, आरोग्यनगर, श्रीहरीनगर व विविध वसाहतीत मूलभूत सुविधा मिळाल्या नाहीत. कर भरूनही या भागातील नागरिकांना सुविधा मिळत नसल्याने गैरसोय होत आहे.

खानापूर पिंगळी मुख्य रस्त्यावरील विद्युत पोल काढण्यात यावेत, खानापूर फाटा ते पिंगळी नवीन रस्त्यावरील नाल्या उंच झाल्याने पावसाळ्यात पूर्ण परिसरात तलावाचे स्वरूप होत आहे, त्याची व्यवस्था करण्यात यावी, कचरा नेण्यासाठी पाच घंटागाड्या सुरू कराव्यात, नळाच्या पाण्याचा पुरवठा तत्काळ सुरू करावा, अशा विविध मागणी करण्यात आल्या. आंदोलनात बालाजी मोहिते, माऊली काळे, जगन्नाथ जाधव, ॲड. पंडित, हंसाजी गोडबोले, शशिकांत शिंदे, गंगाराम शिंदे, सतीश शिंदे, रघुनाथ शिंदे, राजू शिंदे, गणेश राठोड, सतीश लांडे, चक्रधर शिंदे, अमोल मोहिते, विलास मोहिते, वंजारे, लक्ष्मीकांत उदावंत, कैलास आगलावे, ओंकार गिरी, अनिल जाधव यांचा समावेश होता.

टॅग्स :parabhaniपरभणीagitationआंदोलन