शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
2
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
3
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
4
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
5
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
6
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
7
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
8
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
9
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
10
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
11
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
12
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
13
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
14
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
15
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
16
लोकसभेत असं काय घडलं की अमित शाह यांच्या सुरक्षेसाठी धावले मार्शल? विधेयकाची प्रतही फाडली गेली!
17
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
18
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
19
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
20
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव

कर भरूनही सुविधा नाहीत; खानापूर भागातील नागरिकांचा मनपावर आक्रोश महामोर्चा

By मारोती जुंबडे | Updated: April 5, 2023 15:22 IST

शहरातील खानापूर भागातून हा मोर्चा मनपापर्यंत निघाला.

परभणी : खानापूर परिसरातील सर्व वसाहतींमध्ये मूलभूत सोयी- सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, या विविध मागण्यांसाठी नागरिकांनी बुधवारी महापालिकेवर आक्रोश मोर्चा काढला.

शहरातील खानापूर भागातून हा मोर्चा मनपापर्यंत निघाला. मोर्चाचे नेतृत्व किर्तीकुमार बुरांडे यांनी केले. यामध्ये खानापूर परिसरातील सर्व वसाहतीमध्ये पक्क्या नाल्या बांधून परिसरातील सार्वजनिक स्वच्छतागृह तत्काळ सुरू करावेत. छत्रपती संभाजीनगरचे रेड घेऊन तत्काळ उठवावे, खानापूर नगर येथील स्मशानभूमीचे सुशोभीकरण करण्यात यावे, या प्रमुख मागण्या प्रशासनाकडे मांडण्यात आल्या. खानापूर परिसरातील संभाजीनगर येथील रेड झोन उठविण्यात यावे, तेथे तत्काळ मूलभूत सुविधा रस्ते, नाली देण्यात यावे, परिसरातील अनुसया नगर, खानापूर गावठाण, तिरुपतीनगर, संभाजीनगर, नरसिंहनगर, श्रीकृष्णनगर, राजूरत्ननगर, पवनसुतनगर, आरोग्यनगर, श्रीहरीनगर व विविध वसाहतीत मूलभूत सुविधा मिळाल्या नाहीत. कर भरूनही या भागातील नागरिकांना सुविधा मिळत नसल्याने गैरसोय होत आहे.

खानापूर पिंगळी मुख्य रस्त्यावरील विद्युत पोल काढण्यात यावेत, खानापूर फाटा ते पिंगळी नवीन रस्त्यावरील नाल्या उंच झाल्याने पावसाळ्यात पूर्ण परिसरात तलावाचे स्वरूप होत आहे, त्याची व्यवस्था करण्यात यावी, कचरा नेण्यासाठी पाच घंटागाड्या सुरू कराव्यात, नळाच्या पाण्याचा पुरवठा तत्काळ सुरू करावा, अशा विविध मागणी करण्यात आल्या. आंदोलनात बालाजी मोहिते, माऊली काळे, जगन्नाथ जाधव, ॲड. पंडित, हंसाजी गोडबोले, शशिकांत शिंदे, गंगाराम शिंदे, सतीश शिंदे, रघुनाथ शिंदे, राजू शिंदे, गणेश राठोड, सतीश लांडे, चक्रधर शिंदे, अमोल मोहिते, विलास मोहिते, वंजारे, लक्ष्मीकांत उदावंत, कैलास आगलावे, ओंकार गिरी, अनिल जाधव यांचा समावेश होता.

टॅग्स :parabhaniपरभणीagitationआंदोलन