शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
2
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
3
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
4
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
5
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
6
मोटो जी ८६ पॉवर 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या खिसियत आणि किंमत!
7
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल
8
आई-वडिलांस पोटगी देण्यास नकार; मुलाची तुरुंगात रवानगी!
9
Big Breaking : ट्रम्प यांनी रशियाचा राग भारतावर काढला! २५% कर लादला; दंडही जाहीर केला
10
IND vs ENG : "त्यांनी जे केलं ते समजण्यापलिकडचं" पिच क्युरेटरसोबतच्या वादावर काय म्हणाला गिल?
11
कुत्रा चावल्याने बकरीचा मृत्यू झाला, पण नंतर एक आख्ख कुटुंब रुग्णालयात दाखल झालं
12
शिक्षिकेचे सैतानी कृत्य! खराब हस्ताक्षरामुळे विद्यार्थ्याला दिले मेणबत्तीचे चटके, मालाड येथील घटना
13
सर्वसामान्यांच्या 'लालपरी'ला येणार अच्छे दिन, एसटी महामंडळाचे वर्षाला १२ कोटी रुपये वाचणार!
14
ठाणे: १८ वर्षाच्या तरुणाने खड्ड्यामुळे गमावला जीव; जीमला निघाला पण रस्त्यातच झाला अपघात
15
बाप्पा पावला! कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी ४४ अतिरिक्त विशेष ट्रेन्सची घोषणा, पाहा वेळापत्रक
16
"२६ लोकांची हत्या झाली, राजीनामा पंडित नेहरू देणार की डोनाल्ड ट्रम्प?", संजय राऊतांचे सरकारवर टीकास्त्र
17
IND vs PAK, WCL 2025 Semi Final : भारतीय खेळाडूंनी पाक विरुद्ध सेमी फायनल खेळण्यासही दिला नकार
18
पृथ्वीला स्कॅन करणार, भूकंप-त्सुनामी होण्यापूर्वीच सांगणार; ISRO चे NISAR सॅटेलाईट लॉन्च
19
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
20
भिवंडी वाडा रस्त्यावर खड्ड्याने घेतला युवकाचा बळी; संतप्त ग्रामस्थांचा रुग्णवाहिका रस्त्यावर ठेवत रास्तारोको

दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना यंदा क्रीडा गुण मिळणार; पण नियम कायम...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2021 04:17 IST

शासनाच्या निर्णयानुसार खेळांच्या विविध ११ प्रकारांमध्ये प्राविण्य मिळवलेल्या ६वी ते १०वीपर्यंतच्या जिल्हा, विभाग, राज्य, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर क्रीडा ...

शासनाच्या निर्णयानुसार खेळांच्या विविध ११ प्रकारांमध्ये प्राविण्य मिळवलेल्या ६वी ते १०वीपर्यंतच्या जिल्हा, विभाग, राज्य, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर क्रीडा स्पर्धांमध्ये

सहभाग घेणाऱ्या विद्यार्थ्यांना ५ ते २५ पर्यंत गुण दिले जातात. मात्र, इयत्ता १०मध्ये असताना त्या विद्यार्थ्याने संबंधित क्रीडा प्रकारांमध्ये सहभाग घेणे आवश्यक आहे. इयत्ता १२ मध्ये गुणांची सवलत मिळवताना त्याने १२ मध्ये क्रीडा स्पर्धांमध्ये सहभाग घेणे आवश्यक आहे. यावर्षीदेखील हाच नियम कायम आहे. सरत्या वर्षात कोरोनामुळे बहुतांश क्रीडा स्पर्धा झाल्या नाहीत. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना या स्पर्धांमध्ये सहभाग नोंदविता आला नाही. त्यामुळे या वर्षातील १०वी व १२वीच्या विद्यार्थ्यांना हा नियम अडचणीचा ठरत आहे. १५ मार्चपर्यंत यासाठी प्रस्ताव दाखल करायचे होते.

दहावी व बारावीतील विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया

कोविडमुळे यावर्षी शासकीय क्रीडा स्पर्धा होऊ शकल्या नाहीत. त्यामुळे गतवर्षीच्या क्रीडा स्पर्धेत प्राविण्यप्राप्त खेळाडूंचा स्तर लक्षात घेऊन त्यांना गुणदान करण्यात यावे व या संबंधीचे क्रीडा प्रस्ताव महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने मागवून घ्यावे आणि खेळाडूंना योग्य न्याय द्यावा.

-प्रगती दुगाणे, दहावी, पाथरी

या शैक्षणिक वर्षात शासनाच्या वतीने खेळाडूंचा भ्रमनिरास झाला आहे. गेल्या वर्षी झालेल्या क्रीडा स्पर्धांमधून प्राविण्य प्राप्त खेळाडूंना एचएससी बोर्डाने नियमाप्रमाणे गुण द्यावेत. इतर लोककलांमध्ये सहभागी असलेल्या विद्यार्थ्यांना गुण दिले जात आहेत, मग क्रीडा क्षेत्रातील विद्यार्थ्यावर अन्याय का?

- सागर भाले, दहावी, पाथरी

देशाला नवीन क्रीडाविषयक धोरण आखण्याची गरज आहे. महाराष्ट्रातून नवीन खेळाडू निर्माण होण्यासाठी जे प्रोत्साहनपर गुण त्यांना देण्यात येत होते, ते यावर्षी देण्यात येणार नाहीत. या धोरणाचा शासनाने पुन्हा विचार करून क्रीडाविषयक चांगले धोरण आखले पाहिजे. खेळाडूंना त्यांच्या हक्काचे गुण दिले पाहिजेत.

- ओमकार घनचेकर, बारावी, सोनपेठ

खेळाडूंना प्रोत्साहन दिले पाहिजे. पुस्तकातील अभ्यासाव्यतिरिक्त त्यांनी खेळामध्ये दिलेल्या योगदानाबद्दल त्यांना गुण देणे योग्य आहे. परंतु यावर्षी हे गुण देण्यात येणार नसल्याचे समजते, हा खेळाडूंवर होणारा अन्याय आहे. यामुळे खेळाडूंचे खच्चीकरण होणार आहे. शासनाने याचा विचार करावा.

- मेघा कुरडे, बारावी, सोनपेठ

दहावी, बारावीच्या परीक्षेत खेळाडूंना ग्रेस गुण न मिळाल्यास त्यांचे नुकसान होईल. शासनाने याबाबत तातडीने निर्णय घ्यावा. कोरोनामुळे यावर्षी क्रीडा स्पर्धा झाल्या नाहीत. त्यामुळे गेल्या २ वर्षात खेळाडूंनी क्रीडा क्षेत्रातील मिळविलेले यश यावर आधारित दहावी व बारावी परीक्षार्थींना ग्रेस गुण देणे आवश्यक आहे.

- गणेश माळवे, क्रीडा शिक्षक, सेलू

दरवर्षी दहावी व बारावीमधील विद्यार्थी हे क्रीडा गुण मिळावेत, यासाठी विविध क्रीडा स्पर्धांमध्ये सहभाग घेतात. यातून एक प्रकारे शारीरिक विकास घडवून येतो. यावर्षी कोरोनामुळे स्पर्धा झाल्या नसल्या तरी यापूर्वी क्रीडा स्पर्धेतील सहभाग पाहून क्रीडा गुण देणे आवश्यक आहे.

- देविदास सोन्नेकर, क्रीडा शिक्षक, सेलू