शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs WI: भारताचा कसोटी संघ जाहीर! पडीक्कलला संधी; श्रेयस अय्यर, करूण नायरला वगळले
2
शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांना योग्य भाव का मिळत नाही? नितीन गडकरी यांनी कारण सांगितले
3
'रशियाचे लष्कर कागदी वाघासारखेच'; डोनाल्ड ट्रम्प यांनी पुतीन यांना डिवचले, रशियानेही केला पलटवार
4
कारगिल युद्धावेळीही आपण पाकिस्तानसोबत..., हस्तांदोलन वादावरून शशी थरूर यांनी दिला टीम इंडियाला सल्ला
5
pune Crime: विजयने ११व्या मजल्यावरून मारली उडी, ससून रुग्णालयातील धक्कादायक घटना
6
अखेर बीएसएनएल नेटवर्क बदलणार, देशभरात या तारखेला 4G सेवा सुरु करण्याची घोषणा
7
महाराष्ट्रातल्या मनगटात इतका दम आहे म्हणून.., प्रणित मोरेची खिल्ली उडवणाऱ्यांवर भडकला डीपी
8
"मला स्वातंत्र्य हवंय"; बॉयफ्रेंडच्या मदतीने बायकोने काढला नवऱ्याचा काटा, लोकेशन सांगितलं अन्...
9
TATA Motors ला ₹२,३८,६१,६६,००,००० चं मोठं नुकसान! JLR वर सायबर हल्ला; उत्पादन थांबलं, शेअर्समध्ये मोठी घसरण
10
हृदयद्रावक! नवरात्रीत मोठी दुर्घटना; देवीच्या मंडपात अचानक पसरला करंट; २ मुलांचा मृत्यू
11
मूलबाळ नसलेल्या हिंदू महिलेच्या मृत्यूनंतर तिची संपत्ती कुणाला मिळणार?; सुप्रीम कोर्टाची टिप्पणी
12
३०० पानांमध्ये लिहिलेत बाबाचे काळे कारनामे; इंस्टिट्यूटमध्ये होता टॉर्चर चेंबर! दिल्लीत खळबळ
13
GST मध्ये आणखी कपातीचे पंतप्रधान मोदींचे संकेत; म्हणाले, "आम्ही इकडेच थांबवणार नाही..."
14
'परवानगी मिळाली नाही, १९६२ च्या युद्धात हवाई दलाचा वापर झाला असता तर...", चीनवर CDS यांचे मोठे विधान
15
Crime: स्मशानभूमीत महिलांच्या मृतदेहांसोबत...; तरुणाचे घृणास्पद कृत्य कॅमेऱ्यात कैद, पाहून नागरिक हादरले!
16
"बेबी, आय लव्ह यू, तू खूप...", स्वयंघोषित बाबा रात्रभर पाठवायचा अश्लील मेसेज, ३५ मुलींचा छळ
17
डोळ्यांत मिरची पूड ओतली, नंतर साडीने लेकाचा गळा आवळला अन्...; जन्मदात्री आई इतकी क्रूर का झाली?
18
जगातील दुसरे सर्वात श्रीमंत व्यक्ती लॅरी एलिसन ९५% संपत्ती दान करणार; काय आहे अट?
19
कमाल झाली राव! आता QR कोड नाही, तर फक्त अंगठ्याने करा पेमेंट; काय आहे ThumbPay?
20
मुंबई पोलीस कॉन्स्टेबलच्या मृत्यूचं गूढ उकललं; ४ महिन्यांनी हत्येचा खुलासा, 'त्या' पत्रावर संशय

दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना यंदा क्रीडा गुण मिळणार; पण नियम कायम...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2021 04:17 IST

शासनाच्या निर्णयानुसार खेळांच्या विविध ११ प्रकारांमध्ये प्राविण्य मिळवलेल्या ६वी ते १०वीपर्यंतच्या जिल्हा, विभाग, राज्य, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर क्रीडा ...

शासनाच्या निर्णयानुसार खेळांच्या विविध ११ प्रकारांमध्ये प्राविण्य मिळवलेल्या ६वी ते १०वीपर्यंतच्या जिल्हा, विभाग, राज्य, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर क्रीडा स्पर्धांमध्ये

सहभाग घेणाऱ्या विद्यार्थ्यांना ५ ते २५ पर्यंत गुण दिले जातात. मात्र, इयत्ता १०मध्ये असताना त्या विद्यार्थ्याने संबंधित क्रीडा प्रकारांमध्ये सहभाग घेणे आवश्यक आहे. इयत्ता १२ मध्ये गुणांची सवलत मिळवताना त्याने १२ मध्ये क्रीडा स्पर्धांमध्ये सहभाग घेणे आवश्यक आहे. यावर्षीदेखील हाच नियम कायम आहे. सरत्या वर्षात कोरोनामुळे बहुतांश क्रीडा स्पर्धा झाल्या नाहीत. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना या स्पर्धांमध्ये सहभाग नोंदविता आला नाही. त्यामुळे या वर्षातील १०वी व १२वीच्या विद्यार्थ्यांना हा नियम अडचणीचा ठरत आहे. १५ मार्चपर्यंत यासाठी प्रस्ताव दाखल करायचे होते.

दहावी व बारावीतील विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया

कोविडमुळे यावर्षी शासकीय क्रीडा स्पर्धा होऊ शकल्या नाहीत. त्यामुळे गतवर्षीच्या क्रीडा स्पर्धेत प्राविण्यप्राप्त खेळाडूंचा स्तर लक्षात घेऊन त्यांना गुणदान करण्यात यावे व या संबंधीचे क्रीडा प्रस्ताव महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने मागवून घ्यावे आणि खेळाडूंना योग्य न्याय द्यावा.

-प्रगती दुगाणे, दहावी, पाथरी

या शैक्षणिक वर्षात शासनाच्या वतीने खेळाडूंचा भ्रमनिरास झाला आहे. गेल्या वर्षी झालेल्या क्रीडा स्पर्धांमधून प्राविण्य प्राप्त खेळाडूंना एचएससी बोर्डाने नियमाप्रमाणे गुण द्यावेत. इतर लोककलांमध्ये सहभागी असलेल्या विद्यार्थ्यांना गुण दिले जात आहेत, मग क्रीडा क्षेत्रातील विद्यार्थ्यावर अन्याय का?

- सागर भाले, दहावी, पाथरी

देशाला नवीन क्रीडाविषयक धोरण आखण्याची गरज आहे. महाराष्ट्रातून नवीन खेळाडू निर्माण होण्यासाठी जे प्रोत्साहनपर गुण त्यांना देण्यात येत होते, ते यावर्षी देण्यात येणार नाहीत. या धोरणाचा शासनाने पुन्हा विचार करून क्रीडाविषयक चांगले धोरण आखले पाहिजे. खेळाडूंना त्यांच्या हक्काचे गुण दिले पाहिजेत.

- ओमकार घनचेकर, बारावी, सोनपेठ

खेळाडूंना प्रोत्साहन दिले पाहिजे. पुस्तकातील अभ्यासाव्यतिरिक्त त्यांनी खेळामध्ये दिलेल्या योगदानाबद्दल त्यांना गुण देणे योग्य आहे. परंतु यावर्षी हे गुण देण्यात येणार नसल्याचे समजते, हा खेळाडूंवर होणारा अन्याय आहे. यामुळे खेळाडूंचे खच्चीकरण होणार आहे. शासनाने याचा विचार करावा.

- मेघा कुरडे, बारावी, सोनपेठ

दहावी, बारावीच्या परीक्षेत खेळाडूंना ग्रेस गुण न मिळाल्यास त्यांचे नुकसान होईल. शासनाने याबाबत तातडीने निर्णय घ्यावा. कोरोनामुळे यावर्षी क्रीडा स्पर्धा झाल्या नाहीत. त्यामुळे गेल्या २ वर्षात खेळाडूंनी क्रीडा क्षेत्रातील मिळविलेले यश यावर आधारित दहावी व बारावी परीक्षार्थींना ग्रेस गुण देणे आवश्यक आहे.

- गणेश माळवे, क्रीडा शिक्षक, सेलू

दरवर्षी दहावी व बारावीमधील विद्यार्थी हे क्रीडा गुण मिळावेत, यासाठी विविध क्रीडा स्पर्धांमध्ये सहभाग घेतात. यातून एक प्रकारे शारीरिक विकास घडवून येतो. यावर्षी कोरोनामुळे स्पर्धा झाल्या नसल्या तरी यापूर्वी क्रीडा स्पर्धेतील सहभाग पाहून क्रीडा गुण देणे आवश्यक आहे.

- देविदास सोन्नेकर, क्रीडा शिक्षक, सेलू