शहरं
Join us  
Trending Stories
1
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
2
किश्तवाड ढगफुटीत ६५ जणांचा गेला जीव, ३८ जणांची प्रकृती गंभीर; १०० अजूनही बेपत्ता
3
ठाकरे बंधू महापालिका निवडणुका एकत्र लढणार, मुंबई, ठाण्यात सत्ता; संजय राऊत यांचा दावा
4
गणेशोत्सवात मराठी गाणी वाजवा; सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीची आग्रही भूमिका
5
'पती-पत्नी संकल्पना' व्याख्येत समलैंगिकांचाही समावेश व्हावा; हायकोर्टात गिफ्ट टॅक्स नियमाविरुद्ध याचिका
6
मध्य रेल्वेवर आज रात्री, तर 'परे'वर उद्या ब्लॉक; २१ मेल-एक्स्प्रेस फेऱ्यांना फटका, काही लोकल रद्द
7
स्वतःहून घराबाहेर पडलेला पती 'ती' मागणी करू शकत नाही : कोर्ट
8
लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याला राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे का उपस्थित राहिले नाहीत? काँग्रेसने कारण दिले
9
एमबीबीएसच्या कट ऑफमध्ये घट; खुल्या प्रवर्गाची गुणवत्ता यादी ५०९ पर्यंत घसरली
10
जालना: न्यायासाठी मंत्र्याचा ताफा अडवला, मस्तवाल पोलीस अधिकाऱ्याने उडी मारून घातली लाथ; व्हिडीओ बघून येईल संताप
11
नागालँडचे राज्यपाल एल गणेशन यांचे निधन, डोक्याला दुखापत झाल्याने चेन्नईच्या रुग्णालयात झाले होते दाखल
12
धक्कादायक! आईशी प्रेमसंबंध असल्याचा संशय, मुलानं कोयत्यानं वार करत एकाला संपवले केले; दौंडमधील घटना
13
भारताची 'वंडर वुमन', ज्यांनी सैन्यातील पुरुषांना दिले प्रशिक्षण; 'मल्हार'च्या मंचावर डॉ. सीमा राव यांनी उलगडला प्रवास!
14
'स्कॅम १९९२'च्या 'हर्षद मेहता'ने अनेकदा पचवला नकार! प्रतीक गांधीने सांगितलं प्रोजेक्टमधून रिजेक्ट होण्याचं कारण, म्हणाला... 
15
हेल्थ-लाईफ इन्शुरन्स, दैनंदिन वापराच्या गोष्टी होणार स्वस्त; या गोष्टी महागणार, दिवाळीनंतर GST मध्ये मोठा बदल
16
४ तासांची भेट, एकाच खोलीतून ७००० अणुबॉम्बवर नियंत्रण; पुतिन-ट्रम्प भेटीत हायटेक सुरक्षा
17
'जरा... जरा मराठी'! गोड 'कॅडबरी'च्या तोंडी मराठीचे 'धडे'; तुम्हीही म्हणाल, खूपच भारी 
18
Agni-6 Missile : मोठी तयारी! अग्नि-६ क्षेपणास्त्र किती धोकादायक? भारत चाचणी करू शकतो, २ दिवसांचा नोटम जारी
19
पालघर: मालवाहू जहाजाची मासेमारी करणाऱ्या बोटीला धडक, चार मच्छिमार पडले समुद्रात; 15 मच्छिमारांना कुणी आणले किनाऱ्यावर?
20
बुलढाणा: जलसमाधी आंदोलन करायला गेले अन् आंदोलकच गेला वाहून; अधिकाऱ्यांसोबत कशावरून झाली बाचाबाची?

बोंडअळीच्या नुकसानीचे सर्वेक्षण करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2017 23:29 IST

शेतकºयांच्या तक्रारींची वाट पाहत न बसता कापूस उत्पादकांच्या बांधावर जावून बोंडअळीचे सर्वेक्षण करा, असे आदेश पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत शुक्रवारी कृषी विभागाच्या अधिकाºयांना दिले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : शेतकºयांच्या तक्रारींची वाट पाहत न बसता कापूस उत्पादकांच्या बांधावर जावून बोंडअळीचे सर्वेक्षण करा, असे आदेश पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत शुक्रवारी कृषी विभागाच्या अधिकाºयांना दिले आहेत.येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात शुक्रवारी दुपारी १ वाजता जिल्हा नियोजन समितीची बैठक घेण्यात आली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी पालकमंत्री गुलाबराव पाटील होते. यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर खा.संजय जाधव, आ.बाबाजानी दुर्राणी, आ.डॉ.राहुल पाटील, आ.विजय भांबळे, जि.प.अध्यक्षा उज्ज्वला राठोड, जिल्हाधिकारी पी. शिव शंकर, आयुक्त राहुल रेखावार, प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी प्रताप सवडे यांची उपस्थिती होती.या बैठकीत बोंडअळीने त्रस्त झालेल्या कापूस उत्पादक शेतकºयांचे सर्वेक्षण सुरु केले का, असा प्रश्न खा.जाधव, आ. दुर्राणी, आ.डॉ. पाटील, आ. भांबळे, जि.प.चे कृषी सभापती श्रीनिवास मुंडे, सदस्य श्रीनिवास जोगदंड यांनी उपस्थित केला. तेव्हा कृषी अधिकारी बाळासाहेब शिंदे यांनी माझ्याकडे मानवत व परभणी तालुक्यातील २० शेतकºयांच्या तक्रारी आल्या आहेत. त्यापैकी परभणी तालुक्यातील किन्होळा व बोरवंड बु. येथे भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी केली आहे, असे उत्तर दिले. इतर ठिकाणच्या तक्रारी आल्या नसल्याचे त्यांनी सांगितले. या उत्तराने पालकमंत्र्यांसह उपस्थित लोकप्रतिनिधी संतापले. शेतकºयांनी तक्रार केली तरच तुम्ही सर्वेक्षण करणार आहात का, असा प्रतिप्रश्न केला. त्यानंतर पालकमंत्री पाटील यांनी कापूस उत्पादकांच्या बांधावर जाऊन सर्वेक्षण करा, असे आदेश दिले. त्यानंतर नियोजन समितीच्या सदस्या अरुणा काळे यांनी आदिवासी उपाययोजना क्षेत्राबाहेरील योजनांसाठी २ कोटी ५५ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. परंतु, अद्यापपर्यंत खर्च झालेला नाही, असा प्रश्न उपस्थित केला. त्यावर प्रकल्प अधिकारी यांनी कृषी व संलग्न सेवा, ग्रामीण विकासासाठी विशेष कार्यक्रम, सामूहिक सेवा, मागासवर्गीय कल्याण आदी विभागाकडून प्रस्तावच प्राप्त झालेले नाहीत.जि.प.च्या कृषी विभागाला पाच वेळेस स्मरणपत्र देण्यात आलेले आहे. तरीही प्रस्ताव पाठविण्यात आले नाहीत, असे उत्तर दिले. त्यानंतर आ. भांबळे, सदस्या काळे, शालिनीताई राऊत व लोकप्रतिनिधींनी हिंगोली जिल्ह्याला ओटीएसपीसाठी मोठ्या प्रमाणात निधी मिळतो. परंतु, परभणी जिल्ह्याला केवळ अडीच कोटीवर समाधान मानावे लागत आहे. या योजनेअंतर्गत निधी वाढवून मिळण्यासाठी जिल्हा नियोजन समितीचा ठराव घ्यावा, असे सांगितले. त्यानंतर आ. भांबळे यांनी जिंतूर, सेलू तालुक्यातील महावितरणच्या कामासंदर्भात प्रश्न उपस्थित केला. त्यावर अधीक्षक अभियंता यशवंत कांबळे यांनी या तालुक्यातील कामे प्रगतीपथावर आहेत. ते लवकरच पूर्ण करण्यात येतील, असे आश्वासन दिले. त्यानंतर खा. जाधव यांनी पालम तालुक्यातील जांभूळबेट या पर्यटनस्थळाकडे जाणाºया पालम- सोमेश्वर रस्त्याचा प्रश्न उपस्थित केला. त्यावर सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी पार्डीकर यांनी निधी खर्च करण्यासाठी कमी कालावधी मिळाल्यामुळे हा निधी खर्च करण्यात आलेला नाही, असे सांगितले. त्यानंतर खा. जाधव, आ. पाटील, मनपा सदस्य सुनील देशमुख यांनी जिल्हा क्रीडा संकुलनात खेळण्यासाठी येणाºया खेळाडूंकडून शुल्क आकारु नये, अशी मागणी केली. त्यावर जिल्हा क्रीडाधिकारी चंद्रशेखर साखरे यांनी खेळाडूंकडून नाममात्र शुल्क आकारण्यात येत आहे. या शुल्कातून उपलब्ध होणारा निधी दुरुस्तीसाठी खर्च करण्यात येत आहे. त्यामुळे दुरुस्तीसाठी दुसरे उत्पन्न नसल्याने हे शुल्क आकारण्यात येत आहे, असे सांगितले.यावर उपस्थित लोकप्रतिनिधी चांगलेच संतापले. खेळाडूंऐवजी इतर मार्गाने निधी उपलब्ध करावा. मात्र खेळाडूंकडून शुल्क आकारु नये, असे आदेश दिले. यावेळी पीकविमा, खरीप पीक कर्ज, जिंतूर तालुक्यातील वस्सा, कुपटा येथील पाणीपुरवठा योजना, महावितरणची दुरुस्तीची कामे, पाणीटंचाईचे आराखडे, जलयुक्त शिवार इ. विषय चर्चेला घेण्यात आले.