शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

परभणी जिल्ह्यात १२५ शेतकºयांच्या वर्षभरात आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2018 00:26 IST

सरत्या वर्षात जिल्ह्यामध्ये १२५ शेतकºयांच्या आत्महत्या झाल्या असून त्यापैकी ८५ आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबियांना शासनाने तत्काळ मदतीचे धनादेश वितरित केले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : सरत्या वर्षात जिल्ह्यामध्ये १२५ शेतकºयांच्या आत्महत्या झाल्या असून त्यापैकी ८५ आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबियांना शासनाने तत्काळ मदतीचे धनादेश वितरित केले आहेत.सततची नापिकी आणि कर्जबाजारीपणा यामुळे जिल्ह्यामध्ये शेतकºयांच्या आत्महत्या होत आहेत. दोन वर्षापूर्वी दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्यामुळे शेतकरी आत्महत्येचे प्रमाण वाढले होते. मात्र मागील वर्षी बºयापैकी पाऊस झाला. खरीप आणि रब्बी हंगामात उत्पन्नही मिळाल्याने शेतकºयांच्या आत्महत्या घटतील, अशी अपेक्षा होती. मात्र शेतकºयांच्या पाठीमागील संकटांचे सत्र कमी होत नसल्याचेच दिसून आले. कधी पावसाचा ताण तर कधी शेतमालाला भाव न मिळाल्याने शेतकरी अडचणीत सापडले होते. वर्षाच्या शेवटी शेवटी तर बोंडअळीमुळे सर्वच कापूस उत्पादक शेतकºयांना आर्थिक फटका सहन करावा लागला.नैसर्गिक आणि प्रशासकीय अशा दोन्ही बाजुने जिल्ह्यतील बळीराजा त्रस्त झाला होता. त्यामुळे सरत्या वर्षातही शेतकºयांच्या आत्महत्यांचे प्रमाण कमी होण्याऐवजी वाढतच गेले. संपूर्ण वर्षभरात १२५ शेतकºयांनी मृत्यूला कवटाळले आहे. शेतकरी आत्महत्या झाल्यानंतर प्रशासनाच्या वतीने या आत्महत्याप्रकरणात बैठक घेऊन १ लाख रुपयापर्यंतची तातडीची मदत देण्याचा निर्णय घेतला जातो. वर्षभरात झालेल्या १२५ शेतकरी आत्महत्यापैकी ८५ आत्महत्याग्रस्त कुटुंबियांना प्रति कुटुंब १ लाख या प्रमाणे ८५ लाख रुपयांची मदत देण्यात आली आहे.९ प्रकरणे प्रलंबितजिल्ह्यात झालेल्या शेतकरी आत्मत्येच्या प्रकरणांपैकी ९ प्रकरणे अजूनही प्रलंबित आहेत. या प्रकरणांवर प्रशासन लवकरच बैठक घेऊन निर्णय देणार आहे. त्यात डिसेंबर महिन्यात ९ शेतकºयांच्या आत्महत्या झाल्या होत्या. त्यापैकी एक शेतकरी आत्महत्या प्रशासनाने अपात्र ठरविली असून उर्वरित ८ प्रकरणे प्रलंबित ठेवले आहेत. तसेच आॅगस्ट महिन्यात १५ शेतकºयांनी आत्महत्या केल्या होत्या. त्यापैकी १२ शेतकरी कुटुंबियांना तातडीने मदत देण्यात आली. दोन प्रकरणे अपात्र ठरविण्यात आली. तर एक प्रकरण प्रलंबित आहे. त्यामुळे प्रलंबित असलेल्या ९ प्रकरणांवर येत्या दोन दिवसांत निर्णय होण्याची शक्यता आहे.३१ प्रकरणे ठरविली अपात्रशेतकºयांची आत्महत्या झाल्यानंतर जिल्हा प्रशासनातील अधिकारी या शेतकºयांच्या आत्महत्येचा कारणांचा शोध घेतात. कर्जबाजारीपणा, नापिकी या कारणांमुळेच शेतकºयांनी आत्महत्या केली असेल तर त्या शेतकºयाच्या वारसदारास १ लाख रुपयांची तातडीची मदत दिली जाते. जिल्ह्यात १२५ शेतकरी आत्महत्येची प्रकरणे झाली आहेत. त्यापैकी ८५ प्रकरणांमध्ये शेतकरी कुटुंबांना आर्थिक मदत देण्यात आली. तर ३१ प्रकरणे अपात्र ठरविण्यात आली आहेत.योजनांचाही शासन देणार लाभ२०१७ या वर्षात आत्महत्या केलेल्या शेतकºयांच्या वारसांना शासनाने आर्थिक मदत तर दिलीच आहे. शिवाय २०१२ पासून जिल्ह्यामध्ये ४१३ शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबियांचे सर्व्हेक्षणही प्रशासनाने काही दिवसांपूर्वी केले. या सर्व्हेक्षणात शेतकºयांच्या आत्महत्येनंतरच हे कुटुंब कसे जगत आहे, शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबियांना आणखी मदतीची आवश्यकता आहे का? याचा अभ्यास करुन शासकीय योजनांचा लाभ दिला जाणार आहे.मे महिन्यात सर्वाधिक शेतकरी आत्महत्या२०१७ या वर्षात मे महिन्यामध्ये सर्वाधिक १७ शेतकºयांनी आत्महत्या केल्या आहेत. आॅगस्ट, सप्टेंबर या दोन महिन्यात प्रत्येकी १५, मार्चमध्ये १३, आॅक्टोबर महिन्यात १२, एप्रिल आणि नोव्हेंबर महिन्यात प्रत्येकी ७, फेब्रुवारी महिन्यात ६, जानेवारी महिन्यात ५ तर डिसेंबर महिन्यात ७ शेतकºयांनी कर्जबाजारीपणा व नापिकीला कंटाळून आत्महत्या केल्या. एका वर्षात आत्महत्याग्रस्त शेतकºयांची संख्या सव्वाशेवर पोहचल्याने शेतकºयांची मन:स्थिती किती नाजुक झाली आहे, याची प्रचिती येते.