शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तानसोबत मॅच खेळायची असेल तर पहलगाममध्ये मारला गेलेला माझा भाऊ परत आणून द्या"
2
'ऑपरेशन सिंदूरदरम्यान काँग्रेस पाकिस्तानी सैन्याच्या बाजूने होती', पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
3
"मी शिव भक्त, सर्व विष गिळून टाकतो...", पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; म्हणाले...
4
पाकिस्तानविरुद्ध खेळण्यास देशातून तीव्र विरोध, टीम इंडिया दबावात, ड्रेसिंग रूममधून आली अशी बातमी
5
हरमनप्रीत कौरनं रचला इतिहास; आता 'या' दिग्गज खेळाडूंसोबत घेतलं जाईल नाव!
6
Video - अग्निकल्लोळ! गुजरातच्या संघवी ऑर्गेनिक्स फॅक्ट्रीमध्ये भीषण आग, धुराचं साम्राज्य
7
BMW ने कार आणि बाईक्सच्या किमतीत केली मोठी कपात; तब्बल ₹१३.६ लाखांची होणार बचत...
8
सोन्याची विक्रमी झेप! आठवड्यात ३,३०० रुपयांनी महागले; चांदीचाही नवा उच्चांक, आजचा दर काय?
9
टीम इंडियाला धक्का! पाकिस्तानविरूद्धच्या सामन्याआधी शुबमन गिलच्या हाताला दुखापत, अपडेट काय?
10
Sushila Karki: 'आम्ही सत्तेचा आस्वाद घेण्यासाठी आलेलो नाही, ६ महिन्यांतच...' पंतप्रधान सुशीला कार्की 'अ‍ॅक्शन मोड'मध्ये!
11
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
12
तुमचे LPG गॅस सिलेंडरचे अनुदान बंद झाले? घरबसल्या मोबाईलवरुन करता येईल सुरू
13
अलर्ट मोड ऑन! फेस्टिव्ह सेलच्या स्वस्ताईला भुलू नका; एक चूक अन् गमवाल आयुष्यभराची कमाई
14
शेतकऱ्यांनो, दिवाळीआधी PM किसानचा २१वा हप्ता येणार का? वाचा कधी जमा होणार पैसे?
15
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
16
GST कपातीनंतर ५, १०, २० रुपयांच्या बिस्किट, चिप्सची किंमतही घटणार की…?, कंपन्यांनी दिली अशी माहिती  
17
लोकप्रिय 'दामिनी' मालिका पुन्हा येतेय प्रेक्षकांच्या भेटीला, ही अभिनेत्री मुख्य भूमिकेत, या चॅनेलवर होणार प्रसारण
18
चालकाचं नियंत्रण सुटलं अन् कार थेट उड्डाणपुलावरून खाली रेल्वे रुळावर पडली!
19
निम्न तेरणा प्रकल्पातून ७६३६ क्युसेक पाण्याचा विसर्ग, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
20
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?

अचानक वीज खंडित केल्याने एकाच दिवसात २०० विद्युत मोटारी जळाल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2017 12:17 IST

कोणतीही सूचना न देता वीजपुरवठा खंडीत केला जात असल्याने विद्युत मोटारी जळत आहेत़ तालुक्यातील जवळपास २०० मोटारी आतापर्यंत जळाल्या आहेत़ 

ठळक मुद्देमहावितरणच्या  वतीने शेतक-यांकडून वीज बिल थकबाकी वसूल करण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे़ तालुक्यात आतापर्यंत जवळपास २०० विद्युत मोटारी जळाल्या आहेत.

जिंतूर (परभणी) : महावितरणच्या वतीने जिंतूर तालुक्यात वीज वसुली मोहीम हाती घेण्यात आली आहे. यात कोणतीही सूचना न देता वीजपुरवठा खंडीत केला जात असल्याने विद्युत मोटारी जळत आहेत़ तालुक्यातील जवळपास २०० मोटारी आतापर्यंत जळाल्या आहेत़ 

महावितरणच्या  वतीने शेतक-यांकडून वीज बिल थकबाकी वसूल करण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे़ येलदरी ३३ केव्ही अंतर्गत २२ गावे येतात़ आठ दिवसांपासून ही मोहीम सुरू आहे़ ज्या शेतक-यांनी वीज बिल भरले नाही, अशा शेतक-यांची वीज जोडणी तोडली जात आहे़ येलदरी, सावळी, केहाळ, घडोळी, चिंचखेडा, आमदरी, खोलगाडगा, मुरूमखेडा, हिवरखेडा, गणेशनगर, साईनगर तांडा, इटोली, ब्रह्मवाडी, तांदूळवाडी, लिंबाळा येथील वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे़ वीजपुरवठा खंडित करताना शेतक-यांना कोणतीही सूचना दिली जात नाही़ शेतक-यांचे विद्युतपंप आॅटोमॅटिक आहेत़ त्यामुळे वीज बिल भरणा केल्यानंतर विद्युत जोडणी करताना दोन फेज  टाकले जात आहेत़ त्यामुळे आॅटोमॅटिक विद्युत मोटारी जळत आहेत़ तालुक्यात आतापर्यंत जवळपास २०० विद्युत मोटारी जळाल्या आहेत. विद्युत मोटार दुरुस्तीसाठी एका शेतक-याला ४ ते ५ हजार रुपयांचा खर्च येत आहे़ यामुळे शेतक-यांचे आतापर्यंत लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे़ 

१ कोटी ७० लाखांची थकबाकी येलदरी ३३ केव्ही केंद्राअंतर्गत केवळ १३१ कृषी पंपधारक असल्याची नोंद महावितरणकडे आहे़ प्रत्यक्षात हा आकाडा हजारांच्या घरात आहे़ ३३ केव्ही केंद्राअंतर्गत किती विद्युत रोहित्र आहेत? याची माहिती महावितरणकडे नाही़ शेतक-यांकडे १ कोटी ७० लाखांची थकबाकी दाखविली आहे़ परंतु, या केंद्रामध्ये दोन वर्षांपासून केवळ एकच आॅपरेटर आहे. त्यामुळे दुरुस्ती देखभालीचे काम करण्यासाठी कर्मचा-यांची कमतरता आहे़ विजेचा दाब नेहमी कमी जास्त होत असल्याने त्याचा फटका शेतक-यांना बसत आहे़ 

रबी हंगामाची चिंतासध्या रबी हंगामासाठी शेतकरी मशागत करीत आहेत़ काही प्रमाणात पाणी उपलब्ध असल्याने पाणी देण्याचे नियोजन केले आहे. परंतु, महावितरणच्या कारवाईमुळे रबी हंगामाला मुकावे लागते की काय? याची चिंता शेतक-यांना लागली आहे. येलदरी येथील ३३ केव्ही केंद्राअंतर्गत कृषीपंप जळाल्याबाबत आपण चौकशी करून कार्यवाही करू.- डब्ल्यू़ यू़ नगराळे, कार्यकारी अभियंता, विभाग-२

नुकसान भरपाई द्यावी़महावितरणने वीज पुरवठा खंडित करण्याची मोहीम हाती घेतली आहे़ कोणतीही पूर्व सूचना दिली नसल्याने शेतक-यांचे कृषीपंप जळाले आहेत़ या सर्व प्रकाराला महावितरण जबाबदार आहे. योग्य ती कारवाई करून शेतक-यांना नुकसान भरपाई द्यावी़- सुंदरराव चव्हाण, माजी सभापती

कारवाई करावी.महावितरणच्या बेजबाबदार कारभारामुळे २०० ते ३०० मोटारी जळाल्या आहेत़ याची गंभीर दखल घेऊन योग्य ती कारवाई करावी.- भगवानराव म्हाळणकर, शेतकरी हिवरखेडा