शहरं
Join us  
Trending Stories
1
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
2
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
3
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
4
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
5
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
6
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
7
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
8
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
9
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
10
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
11
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
12
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
13
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
14
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
15
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
16
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
17
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
18
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
19
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
20
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!

अचानक वीज खंडित केल्याने एकाच दिवसात २०० विद्युत मोटारी जळाल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2017 12:17 IST

कोणतीही सूचना न देता वीजपुरवठा खंडीत केला जात असल्याने विद्युत मोटारी जळत आहेत़ तालुक्यातील जवळपास २०० मोटारी आतापर्यंत जळाल्या आहेत़ 

ठळक मुद्देमहावितरणच्या  वतीने शेतक-यांकडून वीज बिल थकबाकी वसूल करण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे़ तालुक्यात आतापर्यंत जवळपास २०० विद्युत मोटारी जळाल्या आहेत.

जिंतूर (परभणी) : महावितरणच्या वतीने जिंतूर तालुक्यात वीज वसुली मोहीम हाती घेण्यात आली आहे. यात कोणतीही सूचना न देता वीजपुरवठा खंडीत केला जात असल्याने विद्युत मोटारी जळत आहेत़ तालुक्यातील जवळपास २०० मोटारी आतापर्यंत जळाल्या आहेत़ 

महावितरणच्या  वतीने शेतक-यांकडून वीज बिल थकबाकी वसूल करण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे़ येलदरी ३३ केव्ही अंतर्गत २२ गावे येतात़ आठ दिवसांपासून ही मोहीम सुरू आहे़ ज्या शेतक-यांनी वीज बिल भरले नाही, अशा शेतक-यांची वीज जोडणी तोडली जात आहे़ येलदरी, सावळी, केहाळ, घडोळी, चिंचखेडा, आमदरी, खोलगाडगा, मुरूमखेडा, हिवरखेडा, गणेशनगर, साईनगर तांडा, इटोली, ब्रह्मवाडी, तांदूळवाडी, लिंबाळा येथील वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे़ वीजपुरवठा खंडित करताना शेतक-यांना कोणतीही सूचना दिली जात नाही़ शेतक-यांचे विद्युतपंप आॅटोमॅटिक आहेत़ त्यामुळे वीज बिल भरणा केल्यानंतर विद्युत जोडणी करताना दोन फेज  टाकले जात आहेत़ त्यामुळे आॅटोमॅटिक विद्युत मोटारी जळत आहेत़ तालुक्यात आतापर्यंत जवळपास २०० विद्युत मोटारी जळाल्या आहेत. विद्युत मोटार दुरुस्तीसाठी एका शेतक-याला ४ ते ५ हजार रुपयांचा खर्च येत आहे़ यामुळे शेतक-यांचे आतापर्यंत लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे़ 

१ कोटी ७० लाखांची थकबाकी येलदरी ३३ केव्ही केंद्राअंतर्गत केवळ १३१ कृषी पंपधारक असल्याची नोंद महावितरणकडे आहे़ प्रत्यक्षात हा आकाडा हजारांच्या घरात आहे़ ३३ केव्ही केंद्राअंतर्गत किती विद्युत रोहित्र आहेत? याची माहिती महावितरणकडे नाही़ शेतक-यांकडे १ कोटी ७० लाखांची थकबाकी दाखविली आहे़ परंतु, या केंद्रामध्ये दोन वर्षांपासून केवळ एकच आॅपरेटर आहे. त्यामुळे दुरुस्ती देखभालीचे काम करण्यासाठी कर्मचा-यांची कमतरता आहे़ विजेचा दाब नेहमी कमी जास्त होत असल्याने त्याचा फटका शेतक-यांना बसत आहे़ 

रबी हंगामाची चिंतासध्या रबी हंगामासाठी शेतकरी मशागत करीत आहेत़ काही प्रमाणात पाणी उपलब्ध असल्याने पाणी देण्याचे नियोजन केले आहे. परंतु, महावितरणच्या कारवाईमुळे रबी हंगामाला मुकावे लागते की काय? याची चिंता शेतक-यांना लागली आहे. येलदरी येथील ३३ केव्ही केंद्राअंतर्गत कृषीपंप जळाल्याबाबत आपण चौकशी करून कार्यवाही करू.- डब्ल्यू़ यू़ नगराळे, कार्यकारी अभियंता, विभाग-२

नुकसान भरपाई द्यावी़महावितरणने वीज पुरवठा खंडित करण्याची मोहीम हाती घेतली आहे़ कोणतीही पूर्व सूचना दिली नसल्याने शेतक-यांचे कृषीपंप जळाले आहेत़ या सर्व प्रकाराला महावितरण जबाबदार आहे. योग्य ती कारवाई करून शेतक-यांना नुकसान भरपाई द्यावी़- सुंदरराव चव्हाण, माजी सभापती

कारवाई करावी.महावितरणच्या बेजबाबदार कारभारामुळे २०० ते ३०० मोटारी जळाल्या आहेत़ याची गंभीर दखल घेऊन योग्य ती कारवाई करावी.- भगवानराव म्हाळणकर, शेतकरी हिवरखेडा