शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
3
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
4
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
5
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
6
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
7
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
8
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
9
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
10
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
11
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
12
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
13
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
14
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
15
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
16
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
17
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
18
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
19
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
20
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई

परभणी जिल्ह्यातील सेलू येथील स्थिती :प्रभारी अधिकाऱ्यांवर कार्यालयांचा पदभार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2018 00:15 IST

सेलू येथील प्रमुख शासकीय कार्यालयांचा रिक्त पदाचा पदभार प्रभारींवर सोपविण्यात आला आहे. त्यामुळे ठोस निर्णय घेताना अडचणी निर्माण होत असून याचा परिणाम कामकाजावर होत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कसेलू : येथील प्रमुख शासकीय कार्यालयांचा रिक्त पदाचा पदभार प्रभारींवर सोपविण्यात आला आहे. त्यामुळे ठोस निर्णय घेताना अडचणी निर्माण होत असून याचा परिणाम कामकाजावर होत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.केंद्र व राज्य शासनाच्या विविध कल्याणकारी योजना गावापर्यंत पोहोचविण्यासाठी पंचायत समिती कार्यालयावर मोठी जबाबदारी आहे. परंतु, येथील गटविकास अधिकारी चंद्रमुनी मोडक यांची २६ जुलै २०१७ रोजी बदली झाली. त्यानंतर डी.एस. आहिरे यांच्याकडे गटविकास अधिकारीपदाचा प्रभारी पदभार सोपविण्यात आला. मे महिन्यात पी.बी. काकडे यांची नियुक्ती करण्यात आली होती. मात्र काकडे अद्यापही रुजू झाले नाहीत. त्यामुळे अनेक विकासकामे खोळंबली आहेत.कृषी विभागातील तालुका कृषी अधिकारी पदाचा पदभार अडीच वर्षापासून प्रभारी अधिकाºयांकडे सोपविण्यात आला आहे. अडीच वर्षापूर्वी तालुका कृषी अधिकारी राम रोडगे यांची जालना येथे बदली झाल्यानंतर परभणीचे मिलींद बीडबाग यांच्याकडे दोन वर्ष पदभार होता.जानेवारी महिन्यांपासून मंडळ कृषी अधिकारी आर.जी. मगर यांच्याकडे तालुका कृषी अधिकारी पदाचा अतिरिक्त पदभार सोपविण्यात आला आहे.त्याचप्रमाणे सहकार विभागातील सहाय्यक निबंधक दिलीप गौंडर यांची मे महिन्यात बदली झाली आहे. त्यांचा पदभार इतर अधिकाºयांकडे सोपविला आहे.उपजिल्हा रुग्णालयालाही रिक्त पदांची समस्या सतावत आहे. येथील वैैैद्यकीय अधीक्षकपद एक वर्षांपासून रिक्त असून, वैद्यकीय अधिकारी संजय हरबडे यांच्याकडे या पदाचा पदभार आहे. हरबडे यांनी या पदाला न्याय दिला असला तरी इतर वैद्यकीय अधिकाºयांची रिक्त पदे रिक्त असल्याने येथील रुग्णसेवेवर परिणाम होते.एकंदर तालुक्यातील महत्त्वाच्या कार्यालयात प्रभारीराज असल्याने विकासाच्या कामांवर परिणाम होत आहे. प्रभारी अधिकारी निर्णय घेण्यास विलंब करतात. त्यामुळे नागरिकांना एकाच कामांसाठी खेटा माराव्या लागतात.अधिकाºयांची नकारघंटाशैक्षणिक, सांस्कृतिक, सामाजिक शहर म्हणून ओळख असलेल्या सेलू शहरामध्ये येण्यासाठी पूर्वी अधिकारी उत्सुक असत. परंतु, काही वर्षांपासून लोकप्रतिनिधी व पदाधिकाºयांचा आक्रमक पवित्रा आणि कोणत्याही मुद्यावर टोकाचा संघर्ष होत आहे. त्यामुळे यामध्ये आपण भरडले जातोत की काय, या शक्यतेने नवीन अधिकारी सेलू येथे येण्यास उत्सुकता दाखवित नाहीत. परिणामी येथील महत्त्वाची पदे वर्षानुवर्षे रिक्त राहत आहेत.

टॅग्स :parabhaniपरभणीParbhani z pपरभणी जिल्हा परिषदState Governmentराज्य सरकारCentral Governmentकेंद्र सरकार