शहरं
Join us  
Trending Stories
1
५ जूनलाच केलेली मोठ्या विमान अपघाताची भविष्यवाणी; अ‍ॅस्ट्रो शर्मिष्ठाची पोस्ट होतेय व्हायरल... 
2
Ahmedabad Plane Crash : सुनील तटकरे यांच्या कुटुंबातील व्यक्ती एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर...
3
Ahmedabad Plane Crash: विमानाने टेक ऑफ केले अन् काही वेळात क्रॅश झाले; त्या ८ मिनिटांत नेमके काय झाले?
4
"माझ्या मुलाने दुसऱ्या मजल्यावरून मारली उडी अन्...! ज्या वस्तिगृहावर विमान कोसळलं तेथेच जेवणासाठी गेला होता"
5
अहमदाबाद विमान अपघातावर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, बिलावल भुट्टो म्हणाले...
6
Air India Plane Crash: अनेकांचे गेले जीव, आतापर्यंत १०० जणांचे मृतदेह मिळाले! विमान पडले तेव्हा वसतिगृहात होते ५० विद्यार्थी
7
Ahmedabad Plane Crash Live Updates: "हे दुःख शब्दांत सांगता येणार नाही", एअर इंडिया विमान अपघातावर मोदींची प्रतिक्रिया
8
Ahmedabad Plane Crash: कोणती अशी २ कारणे, ज्यामुळं टेकऑफ घेताच प्लेन क्रश होऊ शकतं?; तज्ज्ञांनी सांगितले
9
विजय रुपाणींचा विमानात बसलेला फोटो समोर आला; पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादकडे रवाना 
10
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत २० मेडिकल विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची भीती
11
Ahmedabad Plane Crash : "माझी वहिनी लंडनला जात होती, १ तासातच मला..."; अपघातानंतर कुटुंबीयांची रुग्णालयात धाव
12
डॉक्टरांच्या वसतिगृहावर कोसळलं एअर इंडियाचं विमान, इमारतीवर अडकलेला दिसला प्लेनचा मागचा भाग
13
MAYDAY कॉल म्हणजे काय?, तो तीन वेळाच का देतात? अहमदाबादहून 'टेक ऑफ'नंतर पायलटने दिलेल्या 'त्या' कॉलबद्दल...
14
भारतातील सर्वात आव्हानात्मक विमानतळ, लँडिंग-टेक ऑफ करताना पायलटचाही हात कापतो
15
Ahmedabad Plane Crash: अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर्सची यादी आली समोर; दोन मराठी नावे, खासदार तटकरेंच्या नातेवाईकांचा समावेश
16
अहमदाबाद विमान अपघात : मृतांच्या कुटुंबियांना किती पैसे मिळतील? जाणून घ्या कायदा काय सांगतो!
17
Plane Crash Incident: पायलटकडे केवळ एका मिनिटाचाच वेळ होता, पण..., एअर इंडियाच्या विमान अपघाताचे कारण समोर आले
18
Air India Plane Crash: विमानातून प्रवास करणारे कोण? भारतीय आणि परदेशी नागरिक किती होते?
19
मेडिकल कॉलेजचे डॉक्टर मेसमध्ये जेवण करत होते, तेवढ्यात...; २० इंटर्न डॉक्टरांच्या मृत्यूची भीती व्यक्त
20
जोरदार आवाज, सगळीकडे धूर अन् समोर मृतदेहांचा खच; प्रत्यक्षदर्शींनी विमान अपघातावेळी काय पाहिलं?

परभणी जिल्ह्यातील सेलू येथील स्थिती :प्रभारी अधिकाऱ्यांवर कार्यालयांचा पदभार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2018 00:15 IST

सेलू येथील प्रमुख शासकीय कार्यालयांचा रिक्त पदाचा पदभार प्रभारींवर सोपविण्यात आला आहे. त्यामुळे ठोस निर्णय घेताना अडचणी निर्माण होत असून याचा परिणाम कामकाजावर होत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कसेलू : येथील प्रमुख शासकीय कार्यालयांचा रिक्त पदाचा पदभार प्रभारींवर सोपविण्यात आला आहे. त्यामुळे ठोस निर्णय घेताना अडचणी निर्माण होत असून याचा परिणाम कामकाजावर होत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.केंद्र व राज्य शासनाच्या विविध कल्याणकारी योजना गावापर्यंत पोहोचविण्यासाठी पंचायत समिती कार्यालयावर मोठी जबाबदारी आहे. परंतु, येथील गटविकास अधिकारी चंद्रमुनी मोडक यांची २६ जुलै २०१७ रोजी बदली झाली. त्यानंतर डी.एस. आहिरे यांच्याकडे गटविकास अधिकारीपदाचा प्रभारी पदभार सोपविण्यात आला. मे महिन्यात पी.बी. काकडे यांची नियुक्ती करण्यात आली होती. मात्र काकडे अद्यापही रुजू झाले नाहीत. त्यामुळे अनेक विकासकामे खोळंबली आहेत.कृषी विभागातील तालुका कृषी अधिकारी पदाचा पदभार अडीच वर्षापासून प्रभारी अधिकाºयांकडे सोपविण्यात आला आहे. अडीच वर्षापूर्वी तालुका कृषी अधिकारी राम रोडगे यांची जालना येथे बदली झाल्यानंतर परभणीचे मिलींद बीडबाग यांच्याकडे दोन वर्ष पदभार होता.जानेवारी महिन्यांपासून मंडळ कृषी अधिकारी आर.जी. मगर यांच्याकडे तालुका कृषी अधिकारी पदाचा अतिरिक्त पदभार सोपविण्यात आला आहे.त्याचप्रमाणे सहकार विभागातील सहाय्यक निबंधक दिलीप गौंडर यांची मे महिन्यात बदली झाली आहे. त्यांचा पदभार इतर अधिकाºयांकडे सोपविला आहे.उपजिल्हा रुग्णालयालाही रिक्त पदांची समस्या सतावत आहे. येथील वैैैद्यकीय अधीक्षकपद एक वर्षांपासून रिक्त असून, वैद्यकीय अधिकारी संजय हरबडे यांच्याकडे या पदाचा पदभार आहे. हरबडे यांनी या पदाला न्याय दिला असला तरी इतर वैद्यकीय अधिकाºयांची रिक्त पदे रिक्त असल्याने येथील रुग्णसेवेवर परिणाम होते.एकंदर तालुक्यातील महत्त्वाच्या कार्यालयात प्रभारीराज असल्याने विकासाच्या कामांवर परिणाम होत आहे. प्रभारी अधिकारी निर्णय घेण्यास विलंब करतात. त्यामुळे नागरिकांना एकाच कामांसाठी खेटा माराव्या लागतात.अधिकाºयांची नकारघंटाशैक्षणिक, सांस्कृतिक, सामाजिक शहर म्हणून ओळख असलेल्या सेलू शहरामध्ये येण्यासाठी पूर्वी अधिकारी उत्सुक असत. परंतु, काही वर्षांपासून लोकप्रतिनिधी व पदाधिकाºयांचा आक्रमक पवित्रा आणि कोणत्याही मुद्यावर टोकाचा संघर्ष होत आहे. त्यामुळे यामध्ये आपण भरडले जातोत की काय, या शक्यतेने नवीन अधिकारी सेलू येथे येण्यास उत्सुकता दाखवित नाहीत. परिणामी येथील महत्त्वाची पदे वर्षानुवर्षे रिक्त राहत आहेत.

टॅग्स :parabhaniपरभणीParbhani z pपरभणी जिल्हा परिषदState Governmentराज्य सरकारCentral Governmentकेंद्र सरकार