शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ८५ व्या वर्षी निधन
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकानांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
4
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
5
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
6
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
7
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
8
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
9
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
10
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
11
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
12
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
13
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
14
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
15
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
16
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
17
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
18
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
19
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
20
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

परभणी जिल्ह्यातील स्थिती :युवकांनी फिरविली स्वयंरोजगाराकडे पाठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2018 00:36 IST

शासनाने स्वयंरोजगाराच्या अनेक योजना आखल्या असल्या तरी त्याचा लाभ घेऊन घेणाºयांची संख्या मात्र बोटावर मोजण्या इतकीच आहे़

प्रसाद आर्वीकर ।लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : शासनाने स्वयंरोजगाराच्या अनेक योजना आखल्या असल्या तरी त्याचा लाभ घेऊन घेणाºयांची संख्या मात्र बोटावर मोजण्या इतकीच आहे़देशभरात अनेक सामाजिक समस्या निर्माण झाल्या आहेत़ त्यापैकीच बेरोजगारी ही एक समस्या असून, या समस्येवर उपाय करण्यासाठी वेगवेगळ्या पातळीवर प्रयत्न केले जातात़ स्वामी विवेकानंद यांची जयंती युवक दिन म्हणून साजरी केली जाते़ बेरोजगारी हा युवकांशी संदर्भात असलेला विषय असून, या बेरोजगारीवर कशा प्रकारे मात करता येईल, या दृष्टीने आजच्या दिवशी विचारमंथन होण्याची गरज आहे़ युवकांनी शिक्षण पूर्ण केल्यानंतर स्वत:चा रोजगार स्वत:च शोधून स्वयंरोजगार निर्माण केला तर हा प्रश्न बºयाच अंशी निकाली निघेल़ त्यामुळे परभणी जिल्ह्यातील बेरोजगारांची संख्या शोधण्याचा प्रयत्न केला तेव्हा ही संख्या लाखांत असल्याचे दिसून आले़तर त्या तुलनेत स्वयंरोजगार निर्माण करणाºया युवकांची संख्या मात्र शेकड्यांमध्ये असल्याचे आकडेवारीवरून दिसत आहे़ त्यामुळे आजचा युवक स्वयंरोजगार निर्मिती करण्यापेक्षा रोजगाराच्या शोधातच भटकत असल्याचे चित्र दिसत आहे़केंद्र शासनाने स्वयंरोजगारावर भर दिला आहे़ त्यातूनच कौशल्य विकास कार्यक्रम आखला आहे़ या कार्यक्रमांतर्गत विविध छोट्या मोठ्या उद्योगांचे युवकांना प्रशिक्षण देऊन त्यांना उद्योजक बनविण्याचा हेतू समोर ठेवण्यात आला़ जिल्हा कौशल्यविकास व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रातून मिळालेल्या आकडेवारीनुसार या केंद्रामार्फत युवकांना कौशल्य विकासाचे प्रशिक्षण दिले जाते़ एकूण ११८ संस्था या केंद्राशी संलग्न आहेत़ ११८ वेगवेगळ्या व्यवसायाचे प्रशिक्षण केंद्रामार्फत दिले जाते़ प्रमोद महाजन कौशल्य विकास अभियानांतर्गतही प्रशिक्षण देण्यात येते़ यावर्षी या प्रशिक्षणासाठी चांगला प्रतिसाद मिळाला आहे़ परंतु, एकूण बेरोजगारांची संख्या लक्षात घेता ही आकडेवारी कमी आहे़ प्रमोद महाजन कौशल्य विकास योजनेंतर्गत ३ हजार १७८ युवकांनी प्रशिक्षण पूर्ण केले आहे़ त्यापैकी १ हजार ८९३ युवकांना कौशल्य विकास प्रमाणपत्र प्राप्त झाले असून, त्यापैकी ७७३ युवकांनी स्वत:चा रोजगार उभा केला आहे़तर महानगरपालिकेच्या अंतर्गत राष्ट्रीय नागरी उपजिवीका अभियान राबविले जाते़ या अभियानामध्ये ५८ कोर्सेसचे प्रशिक्षण देण्यात आले आहे़ १ हजार ७४० युवकांनी हे उद्योजकता प्रशिक्षण पूर्ण केले आहे़ मात्र त्यापैकी एकाही लाभार्थ्याने स्वयंरोजगारची निर्मिती केली नाही़ त्यामुळे या आकडेवारीवरून स्वयंरोजगार निर्माण करणाºया युवकांची संख्या मात्र कमी असल्याचे दिसत आहे़जिल्ह्यातील बेरोजगारीचा प्रश्न निकाली काढण्यासाठी राष्ट्रीय युवक दिनी युवकांनी स्वयंरोजगाराची कास धरून स्वत:चा रोजगार शोधला तर देशाच्या विकासाला हातभार लागेल.५२ हजार बेरोजगारांची शासनाकडे नोंदणीशैक्षणिक सत्र पूर्ण झाल्यानंतर शासकीय नोकºया किंवा शासनाच्या योजनांमधून रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी युवकांची नोंदणी केली जाते़ ही नोंदणी आॅनलाईन पद्धतीने करावी लागते़ डिसेंबर २०१७ अखेरपर्यंत जिल्ह्यात ५२ हजार २५ बेरोजगारांनी नोंदणी केली आहे़ त्यामध्ये ३८ हजार ३२४ पुरुष आणि १३ हजार ७०१ महिलांचा समावेश आहे़ बदलत्या काळात अनेक जण ही नोंदणी करीत नाहीत़ त्यामुळे बेरोजगार युवकांचा आकडा यापेक्षा किती तरी अधिक आहे़