शहरं
Join us  
Trending Stories
1
आता बिगुल वाजणार! "४ आठवड्यांच्या आत..."; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबद्दल SC चा महत्त्वाचा निकाल
2
माझाही पक्ष आहे, भाजपाने विचारलेही नाही, राहुल गांधींनी सन्मानाची वागणूक दिली: महादेव जानकर
3
महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका महायुती एकत्र लढणार का? CM फडणवीस म्हणाले...
4
मॉकड्रिलमुळे ताज्या झाल्या भारत-पाकिस्तान युद्धाच्या आठवणी; १९६५ आणि १९७१च्या युद्धावेळी काय घडलेलं?
5
"पहलगाम हल्ल्याच्या तीन दिवस आधी पंतप्रधान मोदींना पाठवला होता गुप्तचर अहवाल"; मल्लिकार्जुन खरगेंचा मोठा दावा
6
Cashless Treatment Scheme: अपघातातील जखमींवर होणार कॅशलेस उपचार, नवी योजना लागू; केंद्राने काढली अधिसूचना
7
बाजार पुन्हा घसरला! बँक ऑफ बडोदाला मोठा धक्का; 'या' सेक्टरमधील शेअर्सही विखुरले
8
भारत-पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत LRAD यंत्रणा सज्ज, हल्ल्याची तात्काळ मिळणार सूचना
9
उशीर झाल्याने परीक्षा हुकली, नैराश्यातून विद्यार्थ्याचा आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांनी वाचवले प्राण
10
'राम तेरी गंगा मैली'मधील मंदाकिनीच्या भूमिकेसाठी 'रामायण'मधील सीतेनं दिलेलं ऑडिशन, पण...
11
"पाय खूप सुजतात, नीट जेवणही नशिबात नसतं"; केदारनाथच्या पिठ्ठूची डोळे पाणावणारी गोष्ट
12
Gold Price 6 May: लग्नसराईच्या हंगामापूर्वी सोन्याच्या दरात मोठी तेजी, खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याचा लेटेस्ट दर
13
'या' ५८ देशांत भारतीयांना व्हिसा फ्री प्रवेश! विमान पकडा आणि थेट परदेशात उतरा, यादीत अनेक सुंदर देश
14
नाशिक बोगस शालार्थ आयडी प्रकरण : 'त्या' शिक्षक, अधिकाऱ्यांची झाडाझडती
15
जम्मू-काश्मीरमध्ये भीषण अपघात; पूंछ जिल्ह्यात बस उलटली, दोघांचा मृत्यू तर 35 जखमी
16
हार्दिक पांड्या IPL मध्ये खेळतोय, दुसरीकडे त्याची Ex पत्नी नताशा काय करतेय? Photo Viral
17
तृतीयपंथीवर चौघांकडून लैंगिक अत्याचार; मोबाईलवर काढला व्हिडिओ, १ लाख मागितले
18
१०० वर्षांनी अद्भूत योग: ८ राशींना लॉटरी, सुख-सोयींचा काळ; पद-पैसा वृद्धी, शेअर बाजारात नफा!
19
पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या स्मृतीस्थळ विकासासाठी ६८१ कोटींचा आराखडा; CM फडणवीसांची चौंडीत घोषणा
20
Soniya Bansal : "मला वास्तवासोबत..."; बिग बॉस फेम अभिनेत्रीने सोडली इंडस्ट्री, निवडला अध्यात्माचा मार्ग

परभणी जिल्ह्यातील स्थिती :युवकांनी फिरविली स्वयंरोजगाराकडे पाठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2018 00:36 IST

शासनाने स्वयंरोजगाराच्या अनेक योजना आखल्या असल्या तरी त्याचा लाभ घेऊन घेणाºयांची संख्या मात्र बोटावर मोजण्या इतकीच आहे़

प्रसाद आर्वीकर ।लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : शासनाने स्वयंरोजगाराच्या अनेक योजना आखल्या असल्या तरी त्याचा लाभ घेऊन घेणाºयांची संख्या मात्र बोटावर मोजण्या इतकीच आहे़देशभरात अनेक सामाजिक समस्या निर्माण झाल्या आहेत़ त्यापैकीच बेरोजगारी ही एक समस्या असून, या समस्येवर उपाय करण्यासाठी वेगवेगळ्या पातळीवर प्रयत्न केले जातात़ स्वामी विवेकानंद यांची जयंती युवक दिन म्हणून साजरी केली जाते़ बेरोजगारी हा युवकांशी संदर्भात असलेला विषय असून, या बेरोजगारीवर कशा प्रकारे मात करता येईल, या दृष्टीने आजच्या दिवशी विचारमंथन होण्याची गरज आहे़ युवकांनी शिक्षण पूर्ण केल्यानंतर स्वत:चा रोजगार स्वत:च शोधून स्वयंरोजगार निर्माण केला तर हा प्रश्न बºयाच अंशी निकाली निघेल़ त्यामुळे परभणी जिल्ह्यातील बेरोजगारांची संख्या शोधण्याचा प्रयत्न केला तेव्हा ही संख्या लाखांत असल्याचे दिसून आले़तर त्या तुलनेत स्वयंरोजगार निर्माण करणाºया युवकांची संख्या मात्र शेकड्यांमध्ये असल्याचे आकडेवारीवरून दिसत आहे़ त्यामुळे आजचा युवक स्वयंरोजगार निर्मिती करण्यापेक्षा रोजगाराच्या शोधातच भटकत असल्याचे चित्र दिसत आहे़केंद्र शासनाने स्वयंरोजगारावर भर दिला आहे़ त्यातूनच कौशल्य विकास कार्यक्रम आखला आहे़ या कार्यक्रमांतर्गत विविध छोट्या मोठ्या उद्योगांचे युवकांना प्रशिक्षण देऊन त्यांना उद्योजक बनविण्याचा हेतू समोर ठेवण्यात आला़ जिल्हा कौशल्यविकास व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रातून मिळालेल्या आकडेवारीनुसार या केंद्रामार्फत युवकांना कौशल्य विकासाचे प्रशिक्षण दिले जाते़ एकूण ११८ संस्था या केंद्राशी संलग्न आहेत़ ११८ वेगवेगळ्या व्यवसायाचे प्रशिक्षण केंद्रामार्फत दिले जाते़ प्रमोद महाजन कौशल्य विकास अभियानांतर्गतही प्रशिक्षण देण्यात येते़ यावर्षी या प्रशिक्षणासाठी चांगला प्रतिसाद मिळाला आहे़ परंतु, एकूण बेरोजगारांची संख्या लक्षात घेता ही आकडेवारी कमी आहे़ प्रमोद महाजन कौशल्य विकास योजनेंतर्गत ३ हजार १७८ युवकांनी प्रशिक्षण पूर्ण केले आहे़ त्यापैकी १ हजार ८९३ युवकांना कौशल्य विकास प्रमाणपत्र प्राप्त झाले असून, त्यापैकी ७७३ युवकांनी स्वत:चा रोजगार उभा केला आहे़तर महानगरपालिकेच्या अंतर्गत राष्ट्रीय नागरी उपजिवीका अभियान राबविले जाते़ या अभियानामध्ये ५८ कोर्सेसचे प्रशिक्षण देण्यात आले आहे़ १ हजार ७४० युवकांनी हे उद्योजकता प्रशिक्षण पूर्ण केले आहे़ मात्र त्यापैकी एकाही लाभार्थ्याने स्वयंरोजगारची निर्मिती केली नाही़ त्यामुळे या आकडेवारीवरून स्वयंरोजगार निर्माण करणाºया युवकांची संख्या मात्र कमी असल्याचे दिसत आहे़जिल्ह्यातील बेरोजगारीचा प्रश्न निकाली काढण्यासाठी राष्ट्रीय युवक दिनी युवकांनी स्वयंरोजगाराची कास धरून स्वत:चा रोजगार शोधला तर देशाच्या विकासाला हातभार लागेल.५२ हजार बेरोजगारांची शासनाकडे नोंदणीशैक्षणिक सत्र पूर्ण झाल्यानंतर शासकीय नोकºया किंवा शासनाच्या योजनांमधून रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी युवकांची नोंदणी केली जाते़ ही नोंदणी आॅनलाईन पद्धतीने करावी लागते़ डिसेंबर २०१७ अखेरपर्यंत जिल्ह्यात ५२ हजार २५ बेरोजगारांनी नोंदणी केली आहे़ त्यामध्ये ३८ हजार ३२४ पुरुष आणि १३ हजार ७०१ महिलांचा समावेश आहे़ बदलत्या काळात अनेक जण ही नोंदणी करीत नाहीत़ त्यामुळे बेरोजगार युवकांचा आकडा यापेक्षा किती तरी अधिक आहे़