शहरं
Join us  
Trending Stories
1
"सात भारतीय विमानं पाडली...!"; संयुक्त राष्ट्रांच्या मंचावर खोटारड्या शाहबाज शरीफ यांची नुसती 'फेका-फेक'
2
फुल-ऑन ड्रामा! संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत नेतन्याहू भाषणाला येताच अनेक देशांचं 'वॉकआउट'
3
आशिया कप फायनल आधी ICC कडून सूर्यकुमार यादव याच्यावर कारवाई; PCB नं केली होती तक्रार
4
"त्या डोंगरेला निलंबित करा, माझं नाव खराब करता"; वाहतूक कोंडीवरुन एकनाथ शिंदे अधिकाऱ्यांवर संतापले
5
ठरलं, ८-९ ऑक्टोबरला PM मोदी महाराष्ट्रात येणार; CM फडणवीस म्हणाले, “नवी मुंबई विमानतळ...”
6
“राऊतांनी खासदारकीचा एक महिन्याचा पगार दिला असता तर आभार मानले असते”; कुणी केली खोचक टीका?
7
"रशियन सैन्यात जावू नका, तुमच्या जीवाला धोका"; सरकारने दिला इशारा, म्हणाले, "२७ भारतीय..."
8
या एसयूव्हीचं फक्त नावच काफी...! विक्रीच्या बाबतीत पुन्हा ठरली नंबर-1; 38% मार्केट केला एकटीनं 'कॅप्चर'
9
भारताच्या दिग्गज डिफेंस कंपनीला थेट इस्रायलमधून मिळाली मोठी ऑर्डर, अशी आहे शअरची स्थिती
10
VIDEO: बापरे... चिमुरड्याने बसल्या बैठकीला कचाकचा खाल्ल्या हिरव्या मिरच्या, नेटकरीही थक्क
11
कोण आहेत अरुणाचल प्रदेशात पंतप्रधान मोदींचं स्वागत करणाऱ्या या 'डॅशिंग' IAS अधिकारी? सोशल मीडियावर होतायत व्हायरल!
12
“६०० कोटींचा फंड, लोक मरत होते, पण एक पैसा खर्च केला नाही”; CM फडणवीसांचा ठाकरेंवर हल्लाबोल
13
MPSC Exam 2025: विद्यार्थ्यांच्या मागणीला यश, एमपीएससी परीक्षा पुढे ढकलली! आयोगाकडून नवीन तारीख जाहीर
14
IND vs PAK : भारत-पाक लढाई अन् 'गन' सेलिब्रेशनचा वाद! पाकिस्तानी फलंदाजानं घेतलं धोनी-कोहलीचं नाव
15
'मोदी-पुतीन यांच्यात चर्चा नाही, नाटो प्रमुख खोटं बोलताहेत'; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटलं, "बोलताना जरा..."
16
सोयाबीन शेतकऱ्यांना प्रतिहेक्टरी ५० हजार मदत द्या; विजय वडेट्टीवारांचे कृषिमंत्र्यांना पत्र
17
"मंत्र्यांच्या दौऱ्यामुळे सरकारचे पंचनाम्याऐवजी राजशिष्टाचाराकडे लक्ष"; शरद पवारांनी शासनाला दिला सल्ला
18
VIDEO: पाकिस्तानच्या मंत्र्यांची 'आंतरराष्ट्रीय' फजिती, AI वर भाषण देताना अनेक उच्चार चुकले
19
“ओबीसी आरक्षण टिकवण्यासाठी आम्ही प्रयत्नांची पराकाष्ठा करणार आहोत, विजय मिळवणार”: छगन भुजबळ
20
PM मोदींशी १ तास नेमकी काय चर्चा झाली? CM फडणवीसांनी दिली सगळी माहिती; म्हणाले, “कर्जमाफी...”

परभणी जिल्ह्यातील स्थिती : वीस गावांच्या भूजल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2018 23:15 IST

भूजल सर्वेक्षण विभागाने जानेवारी महिन्यात जिल्ह्यातील भूजल पातळीची निरीक्षणे नोंदविली असून, त्यात २० गावांमधील भूजल पातळी मोठ्या मोठ्या प्रमाणात घटली आहे. त्यामुळे आगामी काळात जिल्ह्यात पाण्याचा प्रश्न नागरिकांना सतावण्याची शक्यता आहे.

पातळीने टंचाईत भरलोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : भूजल सर्वेक्षण विभागाने जानेवारी महिन्यात जिल्ह्यातील भूजल पातळीची निरीक्षणे नोंदविली असून, त्यात २० गावांमधील भूजल पातळी मोठ्या मोठ्या प्रमाणात घटली आहे. त्यामुळे आगामी काळात जिल्ह्यात पाण्याचा प्रश्न नागरिकांना सतावण्याची शक्यता आहे.भूजल सर्वेक्षण विभागाच्या वतीने दर वर्षी टप्प्या-टप्प्याने भूजल पातळीची नोंद घेतली जाते. जिल्ह्यातील ८६ निरीक्षण विहिरींच्या नोंदी घेतल्या जातात. या विहिरींची पाणी पातळी आणि मागील पाच वर्षांतील सरासरी पाणी पातळी याची तुलना करुन भूजल पातळीतील घट अथवा वाढीचा निष्कर्ष काढला जातो. जानेवारी महिन्यात या विभागाने निरीक्षण विहिरींच्या नोंदी घेतल्या असून, त्यात ८६ पैकी २० गावांतील विहिरींच्या पाणी पातळीत घट झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे या गाव परिसरातील भूजल पातळीतही घट झाल्याने पाण्याचे स्त्रोत आटत असल्याचेच दिसत आहे.भूजल सर्वेक्षण विभागाने परभणी तालुक्यातील १४ गावांतील निरीक्षण विहिरींची नोंद घेतली असून, त्यात नांदापूर येथील विहिरीची पाणी पातळी ०.२० मीटरने खोल गेली आहे. त्याचप्रमाणे मुरुंबा या गावात ४.६६ मीटरने पाणी पातळीत घट झाली आहे. असोला येथे ३.५० मीटर आणि नांदगाव बु. येथे ४.८३ मीटरने भूजल पातळी घटली आहे.पूर्णा तालुक्यातील ६ गावांमधील भूजल पातळीची नोंद घेण्यात आली. त्यात कात्नेश्वर येथील भूजल पातळी ५.७४ मीटरने घटली आहे. सेलू तालुक्यातील तीन गावांच्या भूजल पातळीत घट झाली आहे. त्यामध्ये म्हाळसापूर गावची भूजल पातळी ३.३० मीटरने, ढेंगळी पिंगळगाव ०.७४ मीटर आणि शिंदे टाकळी या गावाची पातळी ३.०४ मीटरने घटली आहे. मानवत तालुक्यात नरळद या गावात ०.८२ मीटरची घट आहे. गंगाखेड तालुक्यातील तीन गावांच्या भूजल पातळीत घट नोंदविण्यात आली आहे.त्यात खळी ४.४२, महातपुरी ०.०६ आणि डोंगर पिंपळा गवात ०.०८ मीटरची घट आहे. पालम तालुक्यात फरकंडा या गावची पातळी १.३४ मीटरने घटली आहे़ जिंतूर तालुक्यामध्ये १९ निरीक्षण विहिरींची नोंद घेण्यात आली़ त्यात ७ विहिरींच्या पाणी पातळीत घट झाली आहे़ बामणी बु़ येथे १़१२, कवडा येथे १़५०, कोलपा ०़९०, धानोरा १़५८, अंबरवाडी ०़१०, असेगाव १़७६ आणि दुधगाव येथे १़४२ मीटरने पाणी पातळी घटली आहे़जानेवारी महिन्यातील हा अहवाल असून, आता उन्हाळ्यातील दोन महिने ओलांडले असल्याने भूजल पातळीत यापेक्षाही अधिक घट झाल्याने ग्रामीण भागात टंचाईचे संकट तीव्र होत आहे़कात्नेश्वर : परिसरात सर्वाधिक घट४मागील पाच वर्षाच्या भूजल पातळीची तुलना करता यावर्षी जानेवारी महिन्यात घेतलेल्या भूजल पातळीच्या नोंदीमध्ये पूर्णा तालुक्यातील कात्नेश्वर या एकाच गावात भूजल पातळी सर्वाधिक खोल गेली आहे़ ५़७४ मीटरने या ठिकाणी भूजल पातळीत घट आहे़ पाच वर्षांच्या सरासरीनुसार कात्नेश्वर येथील भूजल पातळीत ९़२६ मीटरवर होती तर ती यावर्षीच्या जानेवारी महिन्यात १५ मीटरपर्यंत खोल गेली आहे़ अशीच परिस्थिती परभणी तालुक्यातील नांदगाव या गावाची आहे़ मागील पाच वर्षामध्ये ८़५७ मीटरपर्यंत असलेली भूजल पातळी यावर्षी मात्र १३़४० मीटरपर्यंत खोल गेली आहे़ तर परभणी तालुक्यातीलच मुरुंबा या गावात ५ वर्षांमध्ये सरासरी १२़३४ मीटरवर जाणारी भूजल पातळी यावर्षी मात्र १७ मीटरवर पोहचली आहे़ त्यामुळे ४़६६ मीटरची घट झाली आहे़ भूजल पातळीत होत असलेल्या घटीमुळे पाण्याचा प्रश्न तीव्र होत चालला आहे़

टॅग्स :Waterपाणीparabhaniपरभणी