शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारतात शिक्षण, आरोग्य सामान्य माणसाच्या आवाक्याबाहेर गेलंय'; सरसंघचालक भागवतांनी व्यक्त केली चिंता
2
एअर इंडियामागची पीडा काही संपेना! आता लँडिंगनंतर दरवाजेच उघडले नाही; तासभर अडकून राहिले प्रवासी
3
देवदर्शनासाठी जाणारी पिकअप १०० ते १५० फूट दरीत; ३० महिला जखमी, तिघांचा मृत्यू, खेड तालुक्यातील घटना
4
भटक्या कुत्र्यांना पकडा आणि..., सर्वोच्च न्यायालयाने दिले सक्त आदेश
5
मध्य प्रदेशात भीषण अपघात, जीप आणि दुचाकीच्या धडकेत 5 जणांचा जागीच मृत्यू; नेमकं काय घडलं?
6
हत्तीजवळ जाऊन फोटो काढणे भोवले; तरुणाला पायाखाली चिरडले, पाहा धक्कादायक Video...
7
१५० सेवा, ३ कोटी प्रवासी, ७५ हजार कोटींचे उत्पन्न; ‘वंदे भारत’ची महाराष्ट्रात काय स्थिती?
8
ITR ची डेडलाईन ४५ दिवसांनी का वाढवली? १२ लाखांपर्यंतचा 'नो टॅक्स' आता नाही, पुढच्या वर्षी
9
“विद्यार्थी स्कूल व्हॅनला शासन मंजुरी, सुरक्षित वाहतुकीसह बेरोजगारांना रोजगार संधी”: सरनाईक
10
आयकर कायद्याचा चेहरामोहरा बदलणार? अर्थमंत्र्यांनी सादर केले नवे विधेयक, 'हे' मोठे बदल तुमच्यासाठी महत्त्वाचे!
11
राहुल गांधी, संजय राऊतांसह अनेक खासदार पोलिसांच्या ताब्यात; 'मतचोरी'वरून विरोधकांचा निवडणूक आयोगावर मोर्चा
12
ICC Womens World Cup 2025 : युवराज सिंगच्या साक्षीनं हरमनप्रीत कौरनं दिला शब्द; आम्ही...
13
‘काँग्रेसमुक्त भारत करण्याच्या नादात भाजपाच काँग्रेसयुक्त झाला; भाजपाकडे नेतृत्व, कार्यकर्त्यांचा अभाव,’’ हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला   
14
AUS vs SA: एकेकाळी 'मुंबई इंडियन्स'कडून खेळणाऱ्या फलंदाजांने मोडला सूर्यकुमार यादवचा विश्वविक्रम
15
“सगळीकडे हीच चर्चा, मतचोरीविरोधात जनता राहुल गांधींसोबत, संपूर्ण देश म्हणणे ऐकतोय”: काँग्रेस
16
आई दुसऱ्यांकडे काम करायची, वडील विटा उचलायचे; २२ व्या वर्षी लेक देशातील सर्वात तरुण IPS
17
VIDEO: महुआ मोईत्रा बेशुद्ध झाल्या, राहुल गांधींनी पाणी दिले; टीएमसीची आणखी महिला खासदार...
18
Viral Video: मध्यरात्री शौचालयासाठी बाहेर पडला, अचानक समोर दिसला बिबट्या, पहारेकरीसोबत असं घडलं की...
19
‘माझी पत्नी बाहेरच्या लोकांना घरी बोलावते’, व्हिडीओमध्ये सांगून पतीनं उचललं भयानक पाऊल...  
20
बर्फाळ टेकडीवर वसलाय 'हा' छोटासा देश! स्वतःचा झेंडा, ध्वज आणि पासपोर्टची सुविधा देखील उपलब्ध; तुम्हाला माहितीये का?

परभणी जिल्ह्यातील स्थिती : वीस गावांच्या भूजल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2018 23:15 IST

भूजल सर्वेक्षण विभागाने जानेवारी महिन्यात जिल्ह्यातील भूजल पातळीची निरीक्षणे नोंदविली असून, त्यात २० गावांमधील भूजल पातळी मोठ्या मोठ्या प्रमाणात घटली आहे. त्यामुळे आगामी काळात जिल्ह्यात पाण्याचा प्रश्न नागरिकांना सतावण्याची शक्यता आहे.

पातळीने टंचाईत भरलोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : भूजल सर्वेक्षण विभागाने जानेवारी महिन्यात जिल्ह्यातील भूजल पातळीची निरीक्षणे नोंदविली असून, त्यात २० गावांमधील भूजल पातळी मोठ्या मोठ्या प्रमाणात घटली आहे. त्यामुळे आगामी काळात जिल्ह्यात पाण्याचा प्रश्न नागरिकांना सतावण्याची शक्यता आहे.भूजल सर्वेक्षण विभागाच्या वतीने दर वर्षी टप्प्या-टप्प्याने भूजल पातळीची नोंद घेतली जाते. जिल्ह्यातील ८६ निरीक्षण विहिरींच्या नोंदी घेतल्या जातात. या विहिरींची पाणी पातळी आणि मागील पाच वर्षांतील सरासरी पाणी पातळी याची तुलना करुन भूजल पातळीतील घट अथवा वाढीचा निष्कर्ष काढला जातो. जानेवारी महिन्यात या विभागाने निरीक्षण विहिरींच्या नोंदी घेतल्या असून, त्यात ८६ पैकी २० गावांतील विहिरींच्या पाणी पातळीत घट झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे या गाव परिसरातील भूजल पातळीतही घट झाल्याने पाण्याचे स्त्रोत आटत असल्याचेच दिसत आहे.भूजल सर्वेक्षण विभागाने परभणी तालुक्यातील १४ गावांतील निरीक्षण विहिरींची नोंद घेतली असून, त्यात नांदापूर येथील विहिरीची पाणी पातळी ०.२० मीटरने खोल गेली आहे. त्याचप्रमाणे मुरुंबा या गावात ४.६६ मीटरने पाणी पातळीत घट झाली आहे. असोला येथे ३.५० मीटर आणि नांदगाव बु. येथे ४.८३ मीटरने भूजल पातळी घटली आहे.पूर्णा तालुक्यातील ६ गावांमधील भूजल पातळीची नोंद घेण्यात आली. त्यात कात्नेश्वर येथील भूजल पातळी ५.७४ मीटरने घटली आहे. सेलू तालुक्यातील तीन गावांच्या भूजल पातळीत घट झाली आहे. त्यामध्ये म्हाळसापूर गावची भूजल पातळी ३.३० मीटरने, ढेंगळी पिंगळगाव ०.७४ मीटर आणि शिंदे टाकळी या गावाची पातळी ३.०४ मीटरने घटली आहे. मानवत तालुक्यात नरळद या गावात ०.८२ मीटरची घट आहे. गंगाखेड तालुक्यातील तीन गावांच्या भूजल पातळीत घट नोंदविण्यात आली आहे.त्यात खळी ४.४२, महातपुरी ०.०६ आणि डोंगर पिंपळा गवात ०.०८ मीटरची घट आहे. पालम तालुक्यात फरकंडा या गावची पातळी १.३४ मीटरने घटली आहे़ जिंतूर तालुक्यामध्ये १९ निरीक्षण विहिरींची नोंद घेण्यात आली़ त्यात ७ विहिरींच्या पाणी पातळीत घट झाली आहे़ बामणी बु़ येथे १़१२, कवडा येथे १़५०, कोलपा ०़९०, धानोरा १़५८, अंबरवाडी ०़१०, असेगाव १़७६ आणि दुधगाव येथे १़४२ मीटरने पाणी पातळी घटली आहे़जानेवारी महिन्यातील हा अहवाल असून, आता उन्हाळ्यातील दोन महिने ओलांडले असल्याने भूजल पातळीत यापेक्षाही अधिक घट झाल्याने ग्रामीण भागात टंचाईचे संकट तीव्र होत आहे़कात्नेश्वर : परिसरात सर्वाधिक घट४मागील पाच वर्षाच्या भूजल पातळीची तुलना करता यावर्षी जानेवारी महिन्यात घेतलेल्या भूजल पातळीच्या नोंदीमध्ये पूर्णा तालुक्यातील कात्नेश्वर या एकाच गावात भूजल पातळी सर्वाधिक खोल गेली आहे़ ५़७४ मीटरने या ठिकाणी भूजल पातळीत घट आहे़ पाच वर्षांच्या सरासरीनुसार कात्नेश्वर येथील भूजल पातळीत ९़२६ मीटरवर होती तर ती यावर्षीच्या जानेवारी महिन्यात १५ मीटरपर्यंत खोल गेली आहे़ अशीच परिस्थिती परभणी तालुक्यातील नांदगाव या गावाची आहे़ मागील पाच वर्षामध्ये ८़५७ मीटरपर्यंत असलेली भूजल पातळी यावर्षी मात्र १३़४० मीटरपर्यंत खोल गेली आहे़ तर परभणी तालुक्यातीलच मुरुंबा या गावात ५ वर्षांमध्ये सरासरी १२़३४ मीटरवर जाणारी भूजल पातळी यावर्षी मात्र १७ मीटरवर पोहचली आहे़ त्यामुळे ४़६६ मीटरची घट झाली आहे़ भूजल पातळीत होत असलेल्या घटीमुळे पाण्याचा प्रश्न तीव्र होत चालला आहे़

टॅग्स :Waterपाणीparabhaniपरभणी