शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
3
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
4
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
5
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
6
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
7
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
8
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
9
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
10
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
11
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
12
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
13
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
14
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
15
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
16
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
17
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
18
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
19
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
20
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
Daily Top 2Weekly Top 5

परभणी शहरातील स्थिती :महसूल विभागाच्या जमिनीवरील अतिक्रमणाकडे अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2018 00:27 IST

शहरातील महसूल विभागाच्या जमिनीवर मोठ्या प्रमाणात खाजगी व्यक्तींनी अतिक्रमण केले असताना ही अतिक्रमणे हटविण्याकडे या विभागाच्या अधिकाºयांना वेळ मिळत नसल्याने शासकीय जमिनी धोक्यात आल्या आहेत़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : शहरातील महसूल विभागाच्या जमिनीवर मोठ्या प्रमाणात खाजगी व्यक्तींनी अतिक्रमण केले असताना ही अतिक्रमणे हटविण्याकडे या विभागाच्या अधिकाºयांना वेळ मिळत नसल्याने शासकीय जमिनी धोक्यात आल्या आहेत़शहरात विविध ठिकाणी महसूल विभागाच्या मालकीच्या जमिनी आहेत़ विशेषत: प्रशासकीय इमारतीच्या परिसरातील जमिनीवर दिवसेंदिवस अतिक्रमण वाढत आहे़ चार वर्षापूर्वी तत्कालीन जिल्हाधिकारी एस़पी़ सिंह यांनी या परिसरातील अतिक्रमणे हटवून महसूलच्या जमिनी ताब्यात घेतल्या होत्या़ सिंह यांची बदली झाल्यानंतर या जमिनीकडे एकाही महसूल विभागाच्या अधिकाºयांचे लक्ष गेले नाही़ परिणामी आता या परिसरातील जमिनींवर पक्के बांधकाम करून अतिक्रमण करण्यात आले आहे़ शिवाय मोकळ्या जागेवरही अतिक्रमण झाले आहे़या संदर्भात जिल्हाधिकारी पी़ शिव शंकर यांच्याकडे तक्रारीही करण्यात आल्या होत्या़ त्यावेळी शिव शंकर यांनी परभणीचे तहसीलदार विद्याचरण कडवकर यांना कारवाई करण्याचे आदेश दिले होते; परंतु, कडवकर यांना या प्रकरणी कारवाई करण्यास वेळच मिळालेला नाही़ परिणामी या भागातील जमिनींवर दिवसेंदिवस अतिक्रमण वाढू लागले आहे़शासकीय दस्ताऐवजात फेरबदलाचा प्रयत्नआज घडीला महसूल विभागाच्या जमिनी या मोक्याच्या ठिकाणी असल्यामुळे या जमिनीची बाजारभावाप्रमाणे कोट्यवधी रुपयांची किंमत आहे़ त्यामुळे या जमिनीवर अनेकांचा डोळा आहे़ त्यामुळेच काहींना हाताशी धरून शासकीय दस्ताऐवजांमध्ये फेरबदल करण्याचा प्रयत्नही सुरू असल्याची चर्चा शहरात होताना दिसून येत आहे़ त्यामुळे या शासकीय जमिनीचे अस्तित्वच धोक्यात आले आहे़ त्यामुळे जिल्हाधिकाºयांना या प्रकरणी वैयक्तीक लक्ष घालून कारवाई करावी लागणार आहे़ अन्यथा शहरातील इतर ठिकाणच्या मनपाच्या जमिनीवर ज्या प्रकारे कब्जा करण्यात आला, तसाच काहीसा प्रकार महसूलच्या जमिनीबाबतही होण्याची शक्यता आहे़वक्फ बोर्डाच्या जमिनीवरही अतिक्रमणशहरात वक्फ बोर्डाची मोठ्या प्रमाणात जमीन आहे़ या जमिनीवरही सद्यस्थितीत मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले आहे़ वक्फ बोर्डाच्या औरंगाबाद येथील कार्यालयास या जमिनीकडे पाहण्यास वेळ मिळत नाही़ चार वर्षापूर्वी वक्फ बोर्डाच्या जमिनीवरील अतिक्रमण हटविण्याची कारवाई करण्यात आली होती़ परंतु, नंतर ही मोहीम बारगळली़

टॅग्स :parabhaniपरभणीEnchroachmentअतिक्रमण